Skip to main content

काकांचा खेळ निराळा रे भाई, काकांचा खेळ निराळा !!

काकांचा खेळ निराळा रे भाई, काकांचा खेळ निराळा !! 

काकांनी काहीही न करता मीडियाला हाताशी धरून, कंड्या पीकवून, अजित दादांचा सुरू असलेला खेळ संपवून, त्यांच्याकडे असलेल्या आणि जमा होत असलेल्या किंवा जमा होऊ शकणाऱ्या पाठिंब्याची वाताहत केली आहे. भाजपा समर्थक (कुंपणावरचे), शेणके, राऊत गँग,  कॉगी सह सर्वांना चार दिवस झुल्यावर झुलवून, दादांची उडती पतंग मस्तपैकी कापली आहे.

आता दादांना जायचंय असेल तर, दोन पाच खास समर्थक घेऊन, बाहेर पडून, राजीनामा देऊन, पुन्हा निवडून यावं लागेल, किंवा 2024 पर्यंत थांबावं लागेल  यातून दुसरा एक निशाणा साधला तो म्हणजे ताईंच पक्षाध्यक्ष होण्याचं काम सुलभ करून दिलं. शेवटी एक लक्षात घ्या, ते देखील एक वडील आहेत आणि जे बाळासाहेबांनी केलं व करवून घेतलं, त्याप्रमाणे आपली राजकीय वारसदार म्हणून आपली कन्या ताईंची कायम स्वरूपी  सोय लावून दिली आहे. 

अब देखो आगे कूछ दिनोमे, काका स्वतःच बाजूला होऊन, ताईना पक्षाध्यक्ष करतील आणि सर्व आमदार पदाधिकारी मुकाट्याने पाठिंबा देतील. दादांना एकतर, पाठींबा द्यावा लागेल किंवा दुसरा राज ठाकरे व्हावं लागेल. आपलं हे साध्य काकांनी या एका खेळीत मस्तपैकी साधलं आहे. हवा दादांची निर्माण केली, किती आमदार खरच तयार होतात, किती जणांना जायची इच्छा निर्माण होते, ते तपासण्यासाठी त्यांनी एक लोण कढी सोडून दिली की, निर्णय आमदारांचा असेल, मी काही बोलणार नाही. 

जितके गाफील होते, ते बोलून, हालचाल करून, नोंदवून घेतले. आता त्यांची बरोबर हजेरी होईल आणि पक्षात दादा अलगदपणे एकटे पाडले जातील. ताईंचं सिंहासन मजबूत करण्यासाठी इतकी वर्ष पोसलेले पत्रकार व्यवस्थित कामाला लावून, अनेक हेतू साध्य करून घेतले. जे बोलले ते दुधखुळे निघाले. त्यात अजून एक गोष्ट साधली, ती म्हणजे अशी काही थाप उठवून दिली की, किती खुळचट भाजपा समर्थक आपल्याच नेत्यांची जाहीर नालस्ती करून, टीका करतात, त्याचा खेळ सुद्धा बघितला.

हुशार निघाले ते दोनच, फडणवीस आणि शिंदे. दादांचा मार्ग सध्यातरी, पुरता बंद करून टाकलाय. म्हणूनच त्यांना माघार घेऊन, मी राष्ट्रवादी सोडणार नाही हे जाहीर करावं लागलं. किंवा त्यांच्याकडून तसं वदवून घेतलं गेलं. 

आता खरे दोनच गडी आणि एकच गोष्ट बाकी आहे. 

गडी दोन काका आणि फडणवीस आणि बाकी गोष्ट म्हणजे सुप्रीम निर्णय.

फिर आखरी खेला होबे !! 

©® संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/०४/२०२३

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...