Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

भोग आणि ईश्वर ९१

भोग आणि ईश्वर  ९१   आज आपण आत्मबलशक्ती म्हणजे काय त्याचा विचार करूया. ज्यावेळी देह गर्भात असतो त्यावेळी तो मातेच्या उदरात स्थानापन्न असताना, त्याची सुरक्षा माता स्वतः करतेच, पण त्या गर्भाची आत्मबलशक्ती त्याचं मुख्य रक्षण करते. म्हणूनच काही काही गर्भ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, त्या परिस्थितीला टक्कर देऊन, या जगाला पाहतात. अश्या जीवांना संपूर्ण आयुष्य त्या आत्मबल शक्तीचा लाभ होतो आणि जन्मतः प्राप्त आत्मबलशक्ती त्यांना आयुष्यभर देहाने सशक्त आणि मनाने कणखर राखते.  अश्या व्यक्ती कोणत्याही संकटात डगमगताना वा बावरलेल्या अथवा संकटाला भ्यायलेल्या दिसणार नाहीत. अश्या काहींना जन्मजात आत्मबलशक्ती प्राप्त असते, अर्थातच ती पूर्वसुकृतानेच. आत्मबलशक्ती म्हणजे अंतरात्म्याची जागृत अवस्था, ज्यायोगे, आत्म्याचं देह, मन, बुद्धी यांच्यावर स्वनियंत्रण प्राप्त असतं आणि त्यांना सदोदित एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवतो.  कोणतंही काम सुरू करताना त्यांना त्याची माहिती असो वा नसो किंवा जाण असो वा नसो, पण ते न भिता वा न घाबरता त्यात झोकून  देतात. कदाचित अपयश आलं तरी, खचून न जाण्याची वृत्...

भोग आणि ईश्वर ९०

भोग आणि ईश्वर  ९०    सर्व सिद्धात्मे हे नित्य निरंतर आणि अखंड चैतंयशक्तीच्या रुपात या भूमंडळी वावरत असतात आणि ज्यावेळी साधकांच्या, साधनेमध्ये व्यत्यय अथवा बाधा आणणारी संकटं, उभी राहतात त्या त्यावेळी, सद्गुरू इष्टरूपाने येऊन, साधकांना मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखतात आणि पुन्हा साधनामार्गात आणतात. याचा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे.  प्रश्न हा आहे की साधना करतात, त्या सर्वांना, गुरू असतीलच असं नाही. पण मग ज्यांना सद्गुरू नाहीत किंवा ज्यांनी व्यावहारिक अर्थाने सद्गुरू केले नाहीत किंवा ज्यांना अजून सद्गुरुकृपा झाली नाही त्यांचं काय. यावर जरा विचार करू. साधनेच्या मार्गात असलेले साधक आणि एकलव्याचा मार्ग अनुसरून कोणा सिद्ध महात्म्यांना आपले गुरू कल्पून त्यांच्या तारक वा नाममंत्राचा जाप करणारे अनेक असतील. साधक हा साधना सुरू केल्यानंतर वा केल्यापासून त्या नामाशी वा सिद्धमंत्राशी जोडला जातो वा जोडला गेलेला असतो. साधनेची प्रामाणिकता आणि त्याच्या तरंगलहरींचा जोर हा साधनेच्या नित्य अनित्यतेवर अवलंबून असतो. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे आपली काया वाचा व मन यांनी केलेली प्रत्येक कृ...

भोग आणि ईश्वर ८९

भोग आणि ईश्वर  ८९    क्षमायाचना आणि प्रार्थना या नित्य उपासनेचा भाग केल्यानंतर, आपण आज विचार करूया की, कर्ममार्गी माणसाला नित्य नामसारणात असताना आणि चालताना काय काय साध्य होतं किंवा कशी कशी सिद्ध होऊ शकते. मुळात या जगात आपण आलो ज्या उद्देशाने किंवा धाडले गेलो ज्या उद्देशांसाठी, त्यांच्या पूर्ततेसाठी लागणारी सर्व सिद्धता मानवाला दिली आहे का. आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि मोक्षप्राप्ती वा मुक्तीसाठी मन, देह, बुद्धी, जाण या सर्व गोष्टी प्रत्येक जीवाला दिल्या आहेत. मी व्यावहारिक बुद्धीबद्दल बोलत नाही. या गोष्टींचं प्रमाण कमीअधिक असेल, पण इंद्रियांना नियंत्रित करून, वामामार्गी न होता, अध्यात्म मार्गावर वाटचाल करायला लागणारी, मुख्य यंत्रसामग्री पंचमहाभूतरुप देह, ज्ञानेंद्रिय,  त्या ज्ञानेंद्रियांना ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठी मेंदू, त्यामध्ये जाणिवा जागृत होऊन त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, सुक्ष्मातील सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून, त्याचा योग्यायोग्य विचार करून बुद्धीला चालना देणारं, मन आणि या सर्वांमागे कार्य करणारी चेतनाशक्ती म्हणजे ईश्वरी अंश असलेला आत्मा.  या सर्...

भोग आणि ईश्वर ८८

भोग आणि ईश्वर  ८८    आपण जाणतेपणी वा अजाणतेपणी, याजन्मी वा गतजन्मांत घडलेल्या, स्मरणात असलेल्या वा विस्मरणातील प्रमाद किंवा चुका यांच्याबद्दल चर्चा करूया. माणूस हा विचारशील आणि कृतिशील प्राणी आहे. बाकी सर्व प्राण्यात आणि मानवात हाच मुख्य भेद आहे, विचार आणि कृती.  तरीसुद्धा जाणूनबुजून वा अजाणतेपणी कर्म करत असताना, माणसाच्या हातून चुका, क्वचितप्रसंगी प्रमाद घडतात. हे सर्वसामान्य लोकांबाबत आपण बोलत आहोत. जे प्रमाद म्हणजे गुन्हे मुद्दामहून बुद्धियुक्त स्थितीत करतात, त्यांचा आता नको विचार करायला. आपण अश्या अनेक चुका जीवन जगताना करतोच करतो. कुणी जर नाही म्हणत असेल तर खात्रीने सांगतो की, तो त्यांचा भ्रम आहे.  अश्या चुका, जश्या या जन्मी असोत वा आधीच्या जन्मातल्या असोत, पण कर्म केल्यानंतर त्याचं फलित भोगणं हे ओघानेच आलं. बर कर्मफलाच्या सिद्धांताने कोणतं फल कधी समोर येईल हे अज्ञात आहे, गूढ आहे. म्हणजे आनंदात एखाद्या मागील चुकांचं फलित समोर येणं हे नित्य आहे. आनंदावर विरजण ज्याला म्हणूया ते. बर भोग भोगून संपवायची मानसिक तयारी जरी केली, तरीसुद्धा, किती कधीपासून आणि कधीपर्यं...

भोग आणि ईश्वर ८७

भोग आणि ईश्वर  ८७ कालच्या मुदतठेव आणि कर्ज या तर्कानंतर काही प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. मुळात ही गोष्ट आपल्याला आता जाणवते. ही जाणीव महत्वाची आहे. कारण ही जाणीव आपल्याला थोडी गोंधळात टाकते. ती जाणीव आधी नव्हती ते खूप छान होतं. अज्ञानात सुख होतं. आता जाणीव झाल्यावर गोंधळ वाढला. कसा तो बघा. एक म्हणजे मी ज्यावेळी सुख उपभोगत असतो, त्यावेळी आता हा विचार येईल की ही मुदतठेव मोडून घेतलेला आनंद आहे  आणि दुःख भोगत असताना आपण ही कर्जाची परतफेड करत आहोत अशी भावना येणं म्हणजे मूळ सुखात आनंदाची आणि दुःखात वेदनेची भावना आली तरी विचित्र मनःस्थिती होऊ शकते. अजून एक प्रश्न निर्माण होतो की, माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे आणि विधात्यानेच विचार भाव भावना हे देऊन ते व्यक्त करण्याची बुद्धी व शक्ती दिली आहे. मग नक्की काय योग्य आणि काय अयोग्य. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की, या सर्व जाणिवा भगवंताने, आत्ममार्गी होऊन, स्व जाणून, त्या स्वचा अर्थात आत्म्याचा उद्धार करण्यासाठी दिलेलं आहे. त्या विचारांचा, विचारांच्या ताकदीचा, बुद्धीचा, वापर आपण स्व आणि ईश्वर हे जाणून घेण्यासाठी दिलेली शक्ती किंवा वरदान ...

भोग आणि ईश्वर ८६

भोग आणि ईश्वर  ८६    आयुष्यात घडणाऱ्या घटना या नियतीचा संकेत असतो. प्रारब्धाच्या वाटेवर चालताना आणि संचिताची ठेव पुढे नेताना माणूस नित्य नवीन कर्म करतच असतो. प्रत्येक कर्म अर्थातच एक मुदतठेव/फिक्स डिपॉझिट किंवा तारणकर्ज / लोन तयार करतं. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या कर्जाची परतफेड किंवा ठेवीचा परतावा समजावा.  आता नियतीच्या संकेताकडे वळूया. वरचा परिच्छेद नीट ध्यानात घेतला तर एक लक्षात येईल की, ज्या ज्यावेळी सुखकारक वा आनंददायी घटना घडतात, त्या त्यावेळी आपण एखादी मुदतठेव सोडवून वापरली आणि ज्या ज्यावेळी आपल्या आयुष्यात वाईट, दुःखकारक, नकारात्मक घटना घडतात, त्या त्यावेळी आपण एखादं कर्ज परत केलं हे नक्की समजावं. आता हा विचार अजून खोलात जाऊन बघूया. आपल्याला चांगले मित्र मिळतात, चांगले सहृद नातेवाईक मिळतात म्हणजेच आपल्या ठेवीच्या खजिन्यातून काही ठेव आपणच वापरून ती ठेव मोडली. म्हणजेच आपला ठेवीचा साठा त्या प्रमाणात कमी झाला.  याउलट आपल्या वाईट, चुकीची, टीका व निंदा करणारी, आपले दोष दाखवणारी, आपल्याला समजून न घेणारी माणसं भेटली आणि त्यांनी आपल्याला त्रास, ताप, दुःख, अश...

भोग आणि ईश्वर ८५

भोग आणि ईश्वर  ८५     खरतर नामाची स्वतःची शक्ती अपरिमित आहे. नाम स्वयंभू आहे. नाम घेणारा नाम घेता घेता नामाची शक्ती आणि ऊर्जा अनुभवू शकतो किंवा नामाचा जोर वाढत गेला की, त्याच्या अफाट ताकदीचा परिचय नामसाधकाला यायला लागतो. जसजशा प्रारब्धाच्या लाटा ओसरू लागतात, तसतसा नामाच्या ऊर्जेचा प्रत्यय यायला सुरवात होते. हे सर्व नित्य आणि जीव ओतून नाम घेणाऱ्याला अनुभवायला मिळतं. तरीसुद्धा एक सर्वसामान्य परिस्थिती जी अनुभवास येते ती म्हणजे नामात चित्त एकाग्र होत नाही, नाम घेताना विचार भरकटतात, मन चलबिचल होतं, बरेचदा नाम घेतानासुद्धा क्रोध अनावर होतो, एखादि घडलेली गोष्ट आठवून, मन सुन्न,उदास वा खिन्न होतं, एखादी दुःखद घटना आठवून, त्याच भावात मन हरवून जातं, अनेकदा आपण केलेल्या चुका, रागाच्या भरात घडलेल्या गोष्टी आठवून, अपार खिन्नता वा न्यूनता येते, कधी याउलट आनंदाचे प्रसंग आठवून मन सुखावतं.  यासारख्या अनेक गोष्टी घडून मनात वेगवेगळे भाव उत्पन्न होतात, ज्याच्यामुळे नामात मन एकाग्र न होता, मन विविध भावात प्रसरण पावत. त्याला अनेक अंकुर फुटतात. कदाचित वर दिलेले सुख, दुःख, आनंद समाधान,...

भोग आणि ईश्वर ८४

भोग आणि ईश्वर  ८४    सुक्ष्मरुप आत्मा आणि निर्गुण निराकार मन यांच्या संगतीत बुद्धी एकाग्र करून चित्तात, नामाचा दीप लावल्यानंतर, अखंड आनंद आणि आनंद अनुभव करावा, इतकं त्यात हरवून जाता आलं पाहिजे. या नामाचा जप करण्याचं भान सुद्धा नसावं, इतकं ते आतून, नैसर्गिक, श्वासासोबत आलं पाहिजे. म्हणजे नाम घेता कामा नये, तर ते आलं पाहिजे. कारण मी नाम घेतो ही भावनासुद्धा अहंकार निर्माण करू शकते. म्हणूनच म्हणतानासुद्धा नाम येतं म्हणावं घेतो म्हणू नये.  कारण ते येण्याची सद्बुद्धी सुद्धा भगवंत आणि सद्गुरू कृपेने प्राप्त होते. मायेचा प्रभाव इतका जोरदार असतो की, एखादी साधी किंवा अत्यंत दुःखद किंवा सुखद घटनासुद्धा ह्या बुद्धीला फिरवून, नाम घेण्यापासून परावृत्त करू शकते. मुळातच आपण भोग किंवा सुख या दोन्हीपैकी कोणत्याही स्थितीत असू, अशावेळी मन आणि मनातील विचार यांसह बुद्धीला एक प्रकारचा पडदा पडतो. त्यातुन बाहेर येऊन किंवा त्या स्थितीला रोखून, देहाला नाम  घेण्याची बुद्धी, ईश्वरीकृपा आणि त्या ईश्वरीकृपेचा परिणाम म्हणूनच, साध्य झालेली गुरुकृपा, यामुळे होते. आपल्या स्थितीतून व अवस्थेतून बाह...

भोग आणि ईश्वर ८३

भोग आणि ईश्वर  ८३     कालच्या भगवंताच्या उत्तराच्या विचारात, मन शांत केल्यावर, त्याच शांततेत काही काळ तसच बसून, त्या विचारांचं चिंतन व मंथन करताना काही गोष्टी जाणवल्या. खरच भगवंताने बुद्धी दिली देहात अर्थात स्थूलरूपात, आत्मा सुक्ष्मरूपात आणि मन दिलं या दोन्ही स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडण्यासाठी. विचार करा जीवनाचा प्रवास कर्मफल भोगत असताना भोगाकडून भोगमुक्तीकडे वाटचाल आहे.  भोग हे कर्मफलाचं साक्षात प्राप्त रूप अर्थात स्थूल कर्माचं स्थूल फलस्वरूपात प्रकटीकरण आहे. पण मायेच्या प्रभावात  केलेल्या सर्व कर्माच्या परिणामात जे प्राप्त होईल ते अनेक रुपात समोर येतं.  तो स्थूल परिणाम अनेक प्रकाराने आपल्या समोर येतो आणि आपण त्या परिणामांच्या प्रभावाने, अजून वाहवत जाऊन, या सागरात पूर्ण अडकून जातो. जन्म जन्मांतरीच्या या स्थूल देहरुप भोग चक्रातून जाताना, कधीही हा विचार येत नाही की मी इथे का?. आपल्या मनात नेहमी विचार येतो मी इथे कसा?. जर का हा विचार आला की कळेल हा संघर्ष सर्व स्थूलरूप देहातून सुरू होतो आणि युगेयुगे जन्मजन्म स्थुलातच सुरू राहतो. पण भगवंत तर निर्गुण आहे ...

भोग आणि ईश्वर ८२

भोग आणि ईश्वर  ८२    कालच्या लेखाला अनुसरून चिंतन करताना, मन बुद्धी आणि आत्मा यांच्या संगमाबद्दल विचार करता करता, ध्यान कधी लागलं समजलं नाही. ध्यानात वा कल्पनेत असताना,  मनातच घर करून असलेल्या ईश्वराशी संवाद साधता आला. त्यात जे विचार आले, ते प्रत्यक्ष लिहिण्यापेक्षा तो संवाद मुक्तकाव्यमय करून मांडण्याची कल्पना डोक्यात आली आणि ती त्वरित अंमलात आणली.  तेच  ईश्वराशी मनात संवाद साधताना आलेले विचार पुढे मांडत आहे. त्याचा मतितार्थ उद्या विचारात घेऊ.  भक्त : तू मला दिसत नाहीस मान्य, पण मी तर तुला दिसतो ना, कसल्या परीक्षा घेतोस, कर्मफलाच्या एकदाच सांगून टाक , तुला अनंत अडचणींच्या विळख्यातून , मार्ग काढ़ायचाय, एकट्याला अनेक जन्मांची बीजं रोवल्येस तू , त्याचाच माग काढत फिरायचय , आणि समजुन घ्यायचय स्वतःच, स्वतःला आणि सांगून गेलायस तू गीतेत, कोणत्या कर्माचं फलित, कधी समोर येईल, ते मीही जाणत नाही तू भोग, अनंत राशी पापांच्या, तूच निर्माण केलेल्या, तुझ्याच कर्माने, रस्ता तुझा, तूच आखलेला, तुझ्याचसाठी पण तू दिलयस सोडून मला, हा रस्ता, चाल आता स्वतःच , आणि हे पण म्हणालास...

भोग आणि ईश्वर ८१

भोग आणि ईश्वर  ८१    खूपवेळा आपल्याला एखादं काम करायचं असतं. निर्णय खरतर बुद्धी मन आणि आत्मा मिळून घेतात. शरीर आणि मन बुद्धीच्या सहाय्याने त्याची अंमलबजावणी करतात. सरकारी किंवा खाजगी कार्यालयात प्रत्येक खात्यात काही कर्मचारी, एक नायक यांचा मिळून एक संघ असतो. अगदी खेळात सुद्धा संघ असतोच असतो. अगदी एकट्याने खेळायच्या खेळातसुद्धा तोखेळाडू, त्याचा प्रशिक्षक, खेळाचं त्याचं सामान, सराव व तयारी, त्याची तंदुरुस्ती हा एकप्रकारे संघ आहे.  म्हणजेच संघ आणि संघाचा ताळमेळ यांच्यावर बरेच निर्णय व त्याची अंमलबजावणी अवलंबून असते. एखादा ढेपळला किंवा पूर्ण क्षमतेने काम करत नसेल किंवा तंदुरुस्तीचा प्रश्न असेल, तर संघ पूर्ण एकाग्रतेने काम करणार नाही. म्हणजे शारीरिक क्षमता, मानसिक शक्ती, बौद्धिक संपदा ( त्या त्या कामाला लागणारी), या त्रयीच्या मागे अंतरात्म्याची साथ असायला हवी, तर कोणतंही कार्य सिद्ध होऊ शकतं.  मनाच्या तयारीत, जिद्ध चिकाटी, नेट कणखरपणा शरीराची सुदृढता, कार्यासाठी आवश्यक बुद्धी ( संघ असेल तर अनेक जणांची एकत्रितपणे कार्य करणारी बुद्धी) आणि या सर्वांचा समतोल साधून देणारा...

भोग आणि ईश्वर ८०

भोग आणि ईश्वर  ८०    आठवणींचा मागोवा घेणं थांबवून, त्या जशा येतील तशाच जातील हा विचार डोक्यात ठेवून, मुख्य म्हणजे त्यांचा गुंता होऊ न देता, मनातील विचारांचा ओघ कमी करत, किंवा त्यातील चांगला विचार घेऊन पुढे जात, मनाला एका शांत स्थानकावर आणायचं. हे जाणीवपूर्वक करत असतानाच, आपला नामस्मरणाचा ध्यास नित्य सुरूच ठेवायचा.  ध्यास म्हणजे काय. ध्येयाकड़े जाण्याची आस म्हणजे ध्यास, ध्येयाशी आसक्त होण्याची आस, ध्येयासाठी प्रत्येक श्वास म्हणजे ध्यास. एखाद्या गोष्टीसाठी माणूस ज्यावेळी स्वतःला झोकून देतो आणि नित्य त्याच गोष्टीचा विचार करतो, त्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणतात. ध्येय जितकं शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक तितकं त्याच्या प्राप्तीसाठी झटणं उत्तम आहे आणि त्याचा ध्यास श्रेयस्कर असतो.  ध्येयवेडा माणूस प्रसंगी तहानभूक विसरून आपले कष्ट सुरू ठेवतो. भौतिक जगतात माणूस आयुष्यात अनेक ध्येयं निश्चित करतो आणि त्यांच्या पाठलागासाठी तारुण्यातील  आयुष्याचे मौल्यवान क्षण वेचतो आणि त्या ध्येयाला मिळवण्यात यशस्वी होतो. यात गैर काहीच नाही. पण हीच ध्येयासक्ती अध्यात्मिक पातळीवर ...

भोग आणि ईश्वर ८१

भोग आणि ईश्वर  ८१    खूपवेळा आपल्याला एखादं काम करायचं असतं. निर्णय खरतर बुद्धी मन आणि आत्मा मिळून घेतात. शरीर आणि मन बुद्धीच्या सहाय्याने त्याची अंमलबजावणी करतात. सरकारी किंवा खाजगी कार्यालयात प्रत्येक खात्यात काही कर्मचारी, एक नायक यांचा मिळून एक संघ असतो. अगदी खेळात सुद्धा संघ असतोच असतो. अगदी एकट्याने खेळायच्या खेळातसुद्धा तोखेळाडू, त्याचा प्रशिक्षक, खेळाचं त्याचं सामान, सराव व तयारी, त्याची तंदुरुस्ती हा एकप्रकारे संघ आहे.  म्हणजेच संघ आणि संघाचा ताळमेळ यांच्यावर बरेच निर्णय व त्याची अंमलबजावणी अवलंबून असते. एखादा ढेपळला किंवा पूर्ण क्षमतेने काम करत नसेल किंवा तंदुरुस्तीचा प्रश्न असेल, तर संघ पूर्ण एकाग्रतेने काम करणार नाही. म्हणजे शारीरिक क्षमता, मानसिक शक्ती, बौद्धिक संपदा ( त्या त्या कामाला लागणारी), या त्रयीच्या मागे अंतरात्म्याची साथ असायला हवी, तर कोणतंही कार्य सिद्ध होऊ शकतं.  मनाच्या तयारीत, जिद्ध चिकाटी, नेट कणखरपणा शरीराची सुदृढता, कार्यासाठी आवश्यक बुद्धी ( संघ असेल तर अनेक जणांची एकत्रितपणे कार्य करणारी बुद्धी) आणि या सर्वांचा समतोल साधून देणारा...

नामाविण दुजे नाही सत्य जाणा

नामाविण दुजे नाही सत्य जाणा नामचिया पायी मन झिजवाना नाम सदा घ्यावे नाम श्वास व्हावे नामाचेच व्हावे नाम जिवा भावे नामाची गोडी मनी लागूद्याना नामचिया पायी मन झिजवाना ||१|| देह जन्मला वाढला जगी समर्थ जाहला इतुके होता, दुःखाला पाहता भयभीत झाला  सुखदुःख सारे कर्मबद्ध जाणा नामचिया पायी मन झिजवाना ||२|| भोग भोगताना मनी संदेह येई परतुनी काय मम जीवनी  हे काटे पायातुनी प्रारब्धाचे भोग गतकर्मात जाणा नामचिया पायी मन झिजवाना ||३|| मना  व्यथा चिंता होई मना आनंद प्राप्ती होई मना सुखदुःख सर्वकाही प्रतिसादातून प्राप्त होई जलावरील तरंग तैसेच हे जाणा नामचिया पायी मन झिजवाना ||४|| मन पालटोनी जाई  मन संचित पुढे नेई रागद्वेष अपमानही साठवून पुढे नेई परिणाम याचा वृत्तीत जाणा नामचिया पायी मन झिजवाना ||५|| सापडे ना काही हाती जाता जन्म शून्य हाती संचित जे येई तुझ्या हाती भोगणे हीच त्याची प्राप्ती खेळ सोडा हा, एक नाम घ्याना नामचिया पायी मन झिजवाना ||६|| नामासाठी उरलेला जन्म घालवा क्षण क्षण वेचून नामसखा जोडे जे मन  नित्य आनंद तो सुदिन कर्मबंधनाची तुटे शृंखला, जाणा नामचिया पायी मन झिजवाना ||...

भोग आणि ईश्वर ७९

भोग आणि ईश्वर  ७९    नामाच्या मार्गात पुढे जाताना खरतर, मार्ग सहज व सोप्पा असायला हवा. त्यावर वाटचाल करताना अडचणीच्या गोष्टी सहजी उलगडल्या पाहिजेत. पण सहसा असं घडताना दिसत नाही. त्यातील एक महत्वाचं कारण, माझ्या मते, आपल्या आठवणींचा जुडगा, जो आपण नेहमी डोक्यात आणि मनात बाळगतो आणि मनात त्याचा कुठेतरी पाठलाग करतो, तो नामस्मरण करताना आड येत असावा किंवा येतो. जुडगा यासाठी म्हटलं की, जुडग्यात अनेक चाव्या नित्य लागणाऱ्या आणि नेहमी न लागणाऱ्या, या आपण जवळ बाळगतो. म्हणून आठवणींचा जुडगा हा शब्द त्यासाठी वापरला. कारण त्या चावीच्या जुडग्याप्रमाणे याही जुडग्यात आपण अनेक आठवणी, काही हव्याश्या, पण बऱ्याचश्या नको असलेल्या, या साठवून, त्यांचं ओझं मनासोबत घेऊन फिरत असतो. त्यांचं वर्गीकरण व पृथक्करण करून त्यांचं नित्य विश्लेषण करून टिकाऊ व टाकाऊ अश्या दोन भागात त्यांचं वाटप करावं.   टिकाऊ म्हणजे ज्या आठवून, आता इथून पुढे मन विचलित न होता, त्यातून आनंद, उत्साह आणि सकारात्मक भावभावना हाती लागतील, अश्या सर्वच आठवणी येतात. या मर्मबंधात विशेष करून बालपणीच्या सुखकर आणि मन प्रसन्न व प्रफ...

भोग आणि ईश्वर ७८

भोग आणि ईश्वर  ७८    गेल्या भागापर्यंत आपण हे पाहिलं की मन स्वस्थ बसू शकत नाही.  त्याला काही ना काही खाद्य हे लागतं. हे जर असं आहे तर मग मनाला नित्य सकारात्मक, उच्च विचारांचं आणि सत्शीलपणे राहण्याचं विचाररूप खाद्य आणि चिंतनरुप नैवेद्य का देऊ नये. नैवेद्य शब्दाने जरा आश्चर्य वाटलं असेल. पण खर आहे. मन ही अशी गोष्ट आहे की तीच नराचा नारायण आणि नराचा रावण करू शकते. म्हणजेच नीट मार्ग  धरून जेंव्हा तेच मन देह आणि आत्मा यांचा संयोग घडवून आणतं, त्यावेळी त्या देहातील आत्मा हा श्रीकृष्णाचा सखा अर्जुन, श्रीरामाचा सखा हनुमंत, विभीषण, सुग्रीव होतो  आणि ज्यावेळी तेच मन विकारी आणि वासनेत मग्न होऊन अंतरात्म्याला विसरतं आणि देहाच्या साथीने काम क्रोध अहं आणि वृथा दुराभिमान यांच्या अग्नीत रममाण होतं, त्यावेळी तेच मन रावण, कंस, जरासंध कर्ण आणि दुर्योधन होतं. आपण या दोन्ही आत्यंतिक पातळीवर जाऊ शकणार वा जाणार नसलो तरीही आपण जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनात स्वतःलाच जखडून पुन्हा पुढील जन्मी याच विचारात जन्म घालवू की, हा भोग माझ्या नशिबी का. म्हणूनच या सर्वातून वेळीच बाहेर पडून, देहभोग...

अथर्वशीर्ष विश्लेषण

आज माघी गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्षातील एका श्लोकाचं विश्लेषण.  त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव:स्वरोम्।।६।। गणपती अथर्वशीर्षातील हा सहावा श्लोक. श्रीगणेशाची महती आणि व्याप्ती सांगणारा हा श्लोक, समस्त विश्वात श्रीगणेश हा कोणकोणत्या रुपात व स्वरूपात वास करत आहे, त्याचं वर्णन, यात श्रीगणकऋषींनी केलेलं आहे, जे अथर्वशीर्षाचे रचयिता आहेत.  श्रीगणेशाची प्रार्थना व अर्चना करताना, दोन्ही कर जोडून प्रार्थनापूर्वक, विनम्र भावाने, भक्त श्रीगणेशाकडे पाहतो आणि श्रीगणेशाला म्हणतो की, हे विश्वरूप परमात्मा श्रीगणेशा, तू स्वतःच श्रीब्रम्हारुप होऊन ब्रह्मस्वरूपात ब्रह्मलोकी वास करतोस. अर्थात तूच या विश्वाचा रचयिता याअर्थी पिता आहेस. तूच श्रीविष्णुरुप धारण करून समस्त जगताला आधार देऊन सृष्टीला नित्य आपल्या लीलांनी संकट व असुरमुक्त करून सुख प्रदान करतोस, त्याअर्थी तू सृष्टीचा कर्ता धर्ता आहेस. श्रीगणेशपूरणात श्रीगणेशाला सृष्टीचा आद्य कल्पून त्यातून त्रिदेव निर्माण झाले, अशी मांडणी करण्यात आली आहे आणि म्हणून या स...

भोग आणि ईश्वर ७७

भोग आणि ईश्वर  ७७    खरतर आपण पूर्ण विचारहिन वा विचाररहित होऊ शकत नाही. कारण ध्यान धारणा आणि समाधी अवस्थेतील त्या खूप पुढच्या पायऱ्या आहेत. आधीच्या अनेक पायऱ्या चढत चढत पुढे गेल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा आपण विचार करू शकतो. त्यातील पहिला आणि सुरवातीचा टप्पा म्हणजे गैरमार्गी, चुकीचे आणि त्याज्य व त्रासदायक विचार बाजूला सारून त्याजागी दुसरा चांगला विचार स्थापित करणं.  त्यासाठीच ज्यावेळी आपण मुद्दामहून वा अहेतुक शांत बसलेले असतो, कुठेही, घरी, गाडीत वा अन्य ठिकाणी, त्यावेळी येणाऱ्या विचारांचा विचार करावा. म्हणजे काहीक्षण त्या विचारांचं निरीक्षण करावं. त्यातून जाणवेल की, काही विचार टाकाऊ आहेत, काही सोडून पुढे गेलं तरी चालण्यासारखं आहे आणि काही विचार मंथनास योग्य आहेत.  अश्या मंथनास योग्य विचारांना धरून, त्यांचा हात हातात घेऊन पुढे जायचं. अर्थात त्या विचारांचं चिंतन करायचं.  मुळात चिंतन म्हणजे काय तर एक विचार मनात धरून त्यामागे मनाला विचार करायला लावणं. ज्यातून मन त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करतं आणि आपल्याला त्यातून ऊर्जा मिळते. म्हणनूच त्या विचारांच्या खोलात शिरू...

भोग आणि ईश्वर ७६

भोग आणि ईश्वर  ७६    मन हे दुधावरच्या सायीसारखं असतं. म्हणजे कसं, तर,  ज्यावेळी आपल्याला ती साय चहात किंवा कॉफीमध्ये दूध ओतताना नको असते त्यावेळी ती हमखास पुढे येऊन चहात पडणार  आणि ज्यावेळी ती हवी असते त्यावेळी ती मागे मागे जाणार. मनही तसच आहे. ज्यावेळी आपल्याला एकाग्रता हवी असते त्यावेळी ते चळवळ वा अनेक विचारात आपल्याला गुरफटून टाकणार. पण मग मन आपल्याला कसं काय साथ देणार, मदत करणार.  या सर्वांचाच विचार करून समर्थांनी मनाचे श्लोक लिहून चंचल, अस्थिर, वाऱ्यासम मनाला समजवण्याचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. पण हे कसं साध्य होईल, तर मन या अदृश्य पण अस्तित्वात असलेल्या वारुचे दोन साथीदार आहेत बुद्धी आणि आत्मा. बुद्धी जसं मनाचं ऐकण्याचं कार्य करते त्याचप्रमाणे बुद्धी ही, मनाला समजावून सांगण्याचं कार्य करते. कसं. तर आपण खूप वेळा वाचतो की राग आला तर तो शांत करायला एक ते दहा किंवा त्याच्यापुढे शंभरपर्यंत आकडे मोजावे, म्हणजे राग शांत होतो. यात मन हे त्याक्षणी क्रोधीत असतं, मग आकडे कोण मोजणार, तर बुद्धी आणि आत्मा याक्षणी वा त्यावेळी बुद्धीला चेतना देणार अर्थात जेणेकरून...

भोग आणि ईश्वर ७५

भोग आणि ईश्वर  ७५     आज सलग पंचाहत्तर दिवस एका विषयाचा धागा धरून लिहीत आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोजचं लेखन रोज करून पोस्ट करत आहे. मधल्या काळात एकवीस जानेवारीला मी माझं घर डोंबिवलीहून बदलापूरला शिफ्ट केलं.  माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि माझे गृहमंत्री अर्थात सौ प्राजक्ता हिच्या अमूल्य सहकार्याने हे सदर शिफ्टिंगच्या व त्यानंतरच्या त्रासातसुद्धा मी अखंड लिहू शकलो आणि आज सलग पंच्याहत्तरावा दिवस आहे. किंबहुना तिच्या साथीशिवाय इतकं लेखन, गेली पाच सहा वर्षे, करत राहणं शक्य झालं नसतं हे नक्की. त्यामुळे ती अमूल्य अशी 'मम' साथीदार आहे या सर्वांच्या मागे. अर्थात यात वाचकांचं सहकार्य , या विषयावरही निष्ठा, प्रतिक्रियेतून मिळणारं अद्भुत प्रेम याचंही मोल करता येणं अशक्य आहे. त्यामुळे या सर्वांचेच आभार मानून विषयाकडे वळूया.  गेल्या भागात आपण शेवट विकल्पावर येऊन थांबलो. मुळात एखादी गोष्ट निष्ठेने, ध्येय योजून आणि सातत्याने करायची ठरवली की, खरतर त्यात विकल्प यायला नको. विकल्प म्हणजे मी असं मानतो की, एखादी गोष्ट न करण्यासाठी आ...

भोग आणि ईश्वर ७४

भोग आणि ईश्वर  ७४    देह आहे मन बुद्धी आत्मा, ज्ञानेंद्रिय , सर्व आहे. म्हणजे मोबाईल आहे सिम आहे डेटा चालू केला की, नेट अर्थात ईश्वरी कृपेचा ओघ अखंड सुरू होईल अशी व्यवस्था आहे. पण हा लाभ होतो आहे याची काही खात्री देता येईल का, असा एक प्रश्न मनात येतो की हे एकमार्गीच आहे म्हणजे फक्त इकडून आपण करत राहायचं आणि समोरून ईश्वरी कृपा, अनुकंपा,प्रेरणा यांचा स्रोत वा झरा कधी येईल का.  आपण असा विचार करूया की आपण मोबाईल चालू केला, त्याला चार्ज केला त्याचं नेटवर्क चालू केलं आणि डेटा सुरू झाला. मनात काही योजून आपण त्यात काही समाजमाध्यम शोधून त्यावर थोडी मुशाफिरी केली आणि पुन्हा डेटा बंद करून मोबाईल ठेवून दिला. डेटा बंद झाल्यावर त्यावर काहीही संदेश येणं बंदच होणार हे ओघानेच आलं. यात काही फार शास्त्र किंवा तर्क करायची गरज नाही. पण इथे आपल्याला माहीत नाही की नेटवर्क कुठे आहे, कधी व केंव्हा मिळेल, त्याचे सिग्नल पकडले जातील का, ते आपल्याला कळतील का , नाही कळले तर काय. या सर्वांसाठी मोबाईलमध्ये संदेश प्राप्त करून, त्याचं पृथक्करण करणारी व्यवस्था, सॉफ्टवेअर्स आणि चिप्स असतात. ज्या प्रोग्...

भोग आणि ईश्वर ७३

भोग आणि ईश्वर  ७३    ईश्वरी संदेश प्राप्त करण्यासाठी आणि त्याद्वारे उन्नत्ती करून घेण्यासाठीची व्यवस्था आणि त्याचा मोबाईलच्या व्यवस्थेशी संबंध आपण पाहिला. यात एक महत्वाचा मुद्दा, जो आज घेणार आहे, कालच एका वाचकांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिक्रियेत केला, तो म्हणजे या मोबाईल आणि मोबाईलच्या नेटवर्कचा वापर करून मोबाईलचे सर्व व्यवहार हाताळणारं सिम कार्ड म्हणजेच या देहातील आत्मा. या अत्म्याशिवाय देह म्हणजे सिमकार्ड शिवाय मोबाईल. म्हणजे नेटवर्क नाही आणि काहीही साध्य होणार नाही. अशी कल्पना करा की, मोबाईल आहे, सर्व व्यवस्था आहे, पण सिमकार्डच घातलं नाही, तर नेटवर्क येणार कसं. कारण सिमकार्ड नसेल तर बोलणं, संदेश पाठवणं आणि समाजमाध्यमांचा वापर करणं सर्वच ठप्प. म्हणजे आत्म्याशिवाय देह, काही उपयोगाचा नाही, नष्ट करणं गरजेचं असतं. आता आत्मा दिसत नाही, पण पंचप्राणरहित तोच देह, जो एका क्षणापर्यंत जिवंत होता आणि सर्व चलनवलन सुरळीत होतं, किंवा तो माणूस जिवंत असल्याचं कळत होतं, ते एका क्षणात संपतं. एक अजब, गूढ गुह्य व्यवस्था विधात्याची. बरं मानवी व्यवस्थेसारखी सिमकार्ड बदलण्याची कोणतीही व्य...

भोग आणि ईश्वर ७२

भोग आणि ईश्वर  ७२    कालचच उदाहरण जरा पुढे नेऊ आणि अजून खोलात जाऊन विचार करूया, बघू काय सापडतय का. मुख्य संगणकाला जोडलेले उपसंगणक हे विविध शक्ती रुप देव आहेत आणि ते मुख्य संगणकाकडून आज्ञा घेऊन व अधिकार घेऊनच कार्य करतात. त्या मुख्य संगणकाकडूनच अर्थात श्रीमहाविष्णूंकडून सर्व अधिकार व शक्ती प्राप्त करून सर्व देवाचं आपापल्या क्षेत्रातील कार्य चालतं. यात सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांसह समस्त ब्रह्मांड समाविष्ट आहे. प्रत्येकजण त्या मुख्य संगणकाशीच जोडला गेला आहे. आता आपण नवीन कार्यप्रणालीवर चालणारे लॅपटॉप वापरतो, त्याच्या योगे कार्य करतो. आधुनिक तंत्रात मोबाईल सुद्धा वापरतो. किंबहुना आता ऑफिसमध्ये सुद्धा आणि ऑफिसबाहेरसुद्धा मोबाईलवर काम हे नित्य झालेलं आहे. या लॅपटॉप आणि मोबाइलला संदेश अर्थात सिग्नल आंतरजाल अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून मिळतात. सर्व व्यवहार हे याच माध्यमातून होतात. त्यामुळे या इंटरनेटच्या कार्यक्षमतेचं महत्व आपण सर्व आज जाणून आहोत.  याच प्रणालीचा अनेक युगांपूर्वीपासून विधात्याने उपयोग करून मानवी देह निर्माण केला. शरीर म्हणजे मोबाईल, मेंदू म्हणजे ती महत्वाच...

भोग आणि ईश्वर ७१

भोग आणि ईश्वर  ७१    काल विस्ताराने सर्व विश्लेषण केल्यानंतरही प्रश्नाचा वा शंकेचा एक भाग  शिल्लक राहतो. आज त्यावर विचार करूया. सर्व देव हे तत्वतः श्रीमहाविष्णू यांच्याकडूनच अधिकार प्राप्त करून, त्यांच्याच माया योगात कार्य करून सृष्टीच्या चलनात आपला सहभाग देतात. त्या अधिकारान्वये प्राप्त सिद्धी अथवा शक्तीचा यथासांग उपयोग करून भक्तांचा प्रतिपाळ आपल्या शक्तीने व क्षमतेने करतात. त्यांना त्या त्या अधिकारातील अमर्याद शक्ती प्राप्त असते. ज्यायोगे ते त्या त्या शक्तीचे दाता, धाता अर्थात त्या अर्थाने विधाता संबोधले जाणं क्रमप्राप्त आहे. पण हे शक्तीचं हस्तांतरण हे कायमस्वरूपी असल्यामुळे त्यांना त्या कार्याची इष्टदेवता हा मान व सन्मान उचितपणे दिला गेला व जातो. याचकारणाने श्रीगणेश ही बुद्धीची, देवता गणली जाते.  पण असा अधिकार हा फक्त त्या शक्तीपूरता मर्यादित नसल्यामुळे इतर अनेक सिद्धी त्या इष्टदेवतेला ज्ञात असतात. किंबहुना बाह्यांगाने ते स्वरूप मूळ श्रीविष्णु रूपापासून भिन्न असलं वा प्रकट झालं असलं तरी अंतर्यामी ते श्रीविष्णु स्वरूपाशी एकरूप असतंच. एक उदाहरण घेऊन याचा खोलात ...

भोग आणि ईश्वर ७०

भोग आणि ईश्वर  ७०    आता या सर्वांचा विशिष्ट नाम, अथवा विशिष्ट देवाचीच स्तुती अथवा स्मरण आणि त्याच्या योगे त्याच्याकडून प्राप्त कृपारूप शक्तीशी काय संबंध आहे हे आता पाहू. एक गोष्ट ध्यानात घ्या की प्रत्येक देव हे एका विशिष्ट शक्तीचं प्रतिकात्मक प्रकटीकरण आहे. म्हणजे जसं गणेश बुद्धी आणि सिद्धी, देवी शक्तीस्वरूप, इत्यादी. मुळात भगवान श्रीविष्णूं यांनी चराचरसृष्टी आणि ब्रह्मांड निर्माण करण्याआधी ब्रम्हलोक आणि  ब्रम्हा व कैलासलोक आणि शंकर यांची निर्मिती स्वये केली आणि त्यांना काही विशिष्ट कार्यस्वरूप शक्ती आणि अधिकार दिले. त्या अधिकारांच्या सहाय्याने दोन्ही देवांनी अनेक असुर दानव दैत्य यांसह मानवालासुद्धा अनेक वरदान दिले. त्यांच्या आधाराने त्या त्या जीवांनी त्याचा सदुपयोग वा दुरुपयोग केला.  ज्या ज्यावेळी अश्या दैत्य, दानव व असुर यांनी त्याचा उन्माद करून जगताला त्रस्त करून क्लेश, पीडा, दुःख, दैन्य देण्यास सुरुवात केली आणि यासर्वांचा कडेलोट होऊन परिस्थितीवश मानव आणि त्रैलोकांसह समस्त ब्रह्मांड भयभीत आणि त्राही त्राही झालं, त्या त्यावेळी भगवान विष्णूंनी, या तापदायक जीवा...

Communist and Naxalite mentality, Techniques, Modi and WE, the Patriots !!

  Communist and Naxalite mentality, Techniques, Modi and WE, the Patriots !! What is currently going on across the country and around the world, is a typical technique, used in the same way all over the world today. This means that this method of propaganda, pressure and brainwashing is now being implemented extensively, all over the world, holding many people by the hand and pouring huge sums of money, targeting  a certain percentage of voters in India. By systematically pursuing their treasonous agenda, holding certain individuals by the hand, covering them with the veil of social worker, giving them awards like Magsese to gain their respect in the society, persuading people through them, brainwashing them, and confusing them, if that is not possible. The work of taking it forward has been going on for the last several years. It was happening in a covert way. By introducing all the key people in that network as social representatives, by raising them, through self-esta...

कम्युनिस्ट आणि नक्षली मेंटॅलिटी, तंत्र, मोदी आणि आपण!!

कम्युनिस्ट आणि नक्षली मेंटॅलिटी, तंत्र, मोदी आणि आपण!! सध्या जे चालू आहे देशभरात आणि जगभरात, त्यात एक टिपिकल तंत्र, आज संपूर्ण जगातून एकाच पद्धतीने वापरलं जातंय. याचाच अर्थ ही प्रचार , दबाव आणि बुद्धिभेदाची पद्धती, आता व्यापक प्रकारे, संपूर्ण जगभरातील, अनेक लोकांना हाताशी धरून आणि प्रचंड पैसा ओतून भारतातील काही विशिष्ट टक्के मतदाराला गृहीत धरून राबवलं जात आहे.  आपला देशद्रोहाचा अजेंडा छुप्या पद्धतीने राबवून, काही विशिष्ट व्यक्तींना हाताशी धरून, त्यांना समाजसेवकाचा बुरखा घालून, त्यांना समाजात मानमरातब मिळण्यासाठी मॅगसेसे सारखी अवॉर्डस त्यांना देऊन, त्यांच्या माध्यमातून लोकांचं मन वळवणं, बुद्धिभेद करणं, आणि ते शक्य न झाल्यास मनात गोंधळ निर्माण करून आपल्या देशाविरुद्धचा अजेंडा पद्धतशीरपणे पुढे नेण्याचं काम गेली कित्येक वर्षे राबवलं जात आहे. ते छुप्या पद्धतीने होत होतं. त्या  जाळ्यातील सर्व मुख्य लोकांना सामाजिक प्रतिनिधी म्हणून पेश करून, त्यांना, स्वतःच स्थापन केलेल्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभं करून, त्यांचा पपेट म्हणून वापर करून, आपला नक्षली कार्यक्रम व्यवस्थित राबवणं ...