Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८५ (विवाह सोहळा १३)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८५ (विवाहसोहळा १३) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
सर्वत्र हर्ष उल्हास आणि नृत्य गायन सुरू झाले. 

कृष्णाने रुक्मिणीस वरले आणि अवघ्या जीवांचे जीव मोकळे झाले. मग करी कंकण बांधण्याचा विधी पार पडला. कंकणातील अर्धा धागा स्रीभाग लक्ष्मीस्वरूप आणि अर्धा धागा पुरुषभाग म्हणजे नारायणस्वरूप आहे हे पुरोहितांनी प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाना समजावून सांगितले. कृष्णाने ते मनोभावे ऐकून पुरोहितांना नमन केले. देवकीने रुक्मिणी साठी दिलेले पितांबर वस्त्र कृष्णाने रुक्मिणीस भेट केले. शुद्धमतीने कृष्णाला विविध वस्त्रे देऊन गौरविले. 

मिळालेली नवीन वस्त्रे नेसून कृष्ण रुक्मिणी पुनः विवाहस्थानी आले. यानंतर लज्जाहोम अर्थात लाह्याहोम या विधीसाठी पुरोहितांनी कृष्णाला , रुक्मिणीला उचलून घेऊन,  बोहल्यावर होमहवनासाठी होमकुंड तयार आहे तेथवर, यावे असे सांगितले. या बरोबर सर्व नर विशेषतः नारी काही लज्जित झाल्या, काही हसू लागल्या, काही म्हणाल्या आता कृष्ण अडकला. या वर कृष्ण म्हणाला 

"लाजायचे व हसायचे काही कारण नाही ज्याप्रमाणे आता मी तीचा अर्धभाग आणि ती माझी अर्धांगी आहे त्यानुसार आता तिचे क्षेम पाहणे माझे कर्तव्य ठरते. म्हणून गरज पडेल तिथे तिचा भार मला उचलता यावा अशी मनाची तयारी व्हावी या हेतूने शास्त्रकर्त्यांनी ह्या विधीचा समावेश केला असेल. 

त्याचप्रमाणे सर्व समर्पण करून वडीलांच्या घरचे तेथेच सोडून तन मन आत्मा या सर्व अर्पित करून ती माझी व्हावी म्हणून हा होम.  माझ्यावीण ही आता एक पाऊलही टाकणार नाही म्हणून उचलून घेणे. आता माझे नाम हा तिचा धर्म आणि तिच्यासाठी जगणे हा माझा धर्म. यासाठी हा  होम." 

इतके बोलून कृष्णाने रुक्मिणीस उचलून घेतले. त्यासरशी रुक्मिणी लज्जित झाली आणि ते पाहून उपस्थित सर्व नरनारी पुन्हा हसायला लागले. अर्थातच कृष्ण रुक्मिणी दोघांनीही याचा आनंद घेतला. होम यथास्थित सुसंपन्न झाला. नन्तर कानपीळीचा विधी करण्यासाठी रुक्मिणीच्या चार भावांना बोलावण्यात आले. परंतु रुक्मिचा अनुभव बघता चारही बंधू पुढे येण्यास धजावत नव्हते. कृष्णाने त्यांना आश्वस्त करून बहुवस्त्रे व अलंकार देऊन सन्मानित केलं आणि त्यांच्या मनातील भीती दूर केली. कानपीळीचा सोहळा यथास्थित पार पडला.

पुढील सूनमुख पाहण्याच्या  विधी साठी पुरोहितांनी शुद्धमतीला वरमाई देवकी हिस घेऊन येण्यास सांगितले. वरमाईला अर्थात देवकीला, जगतपालक कृष्ण जीच्या उदरी जन्मला त्या मातेला, आणावयास अति हर्षाने शुद्धमती निघाली. तिचे उपकार अतिथोर आणि तिची कुस परमपावन कारण तिच्या उदरी जगताचा कल्याणकर्ता आणि शुद्ध मतीचा जामात जन्मला होता. म्हणून स्वतः शुद्धमती विडा दक्षिणा घेऊन निघाली, वरमाईच्या मंदिरी. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२७/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...