Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८१ (विवाह सोहळा ९)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८१(विवाहसोहळा ९)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
सर्व वऱ्हाडी मंडळी जमू लागली., मुहूर्ताची घटिका समीप येत चालली तसा पुरोहितांनी गलबला सुरू केला. इकडे कृष्णाच्या स्थानावरून सर्व मंडळी कृष्ण,देवकी, वसुदेव, एका बाजूला दुसऱ्या बाजूला सुभद्रा रेवती आणि श्रीबलराम वऱ्हाड घेऊन विवाह मंडपाकडे निघाले.  

वाद्यांचा गजर सुरू झाला. भेरी, तुतारी, सनई चौघडे, ढोल ताशे मंजिरे वाजू लागले. सर्वजण वाजत गाजत नाचत मंडपा कडे निघाले. भीमक स्वतः मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वांचं स्वागत करतात. सर्व मंडळी विवाहस्थानी जमा झाली. इकडे सौभाग्याची सर्व तयारी जसं हळद कुंकू धणे जिरे आणून ठेवलं आहे. 

पुरोहितांनी मंत्रोच्चाराने विधींना सुरुवात केलेली आहे. सर्व मंडपाचं लक्ष आता केंद्रस्थान आहे. जिथे जगजेठी आणि त्यांची होणारी पत्नी यांच्या विवाहाचे धार्मिक कार्य संपन्न होणार आहे. नित्य होमहवन इत्यादी विधी पार पडल्यानंतर पुरोहित मुख्य विवाह विधींची तयारी करत आहेत. कृष्णासह सर्वांना आता रुक्मिणीच्या येण्याची प्रतीक्षा आहे. पुरोहितांनी सांगितले आणि रुक्मिणीला घेऊन मामा निघाले.मुख्य मंडपात रुक्मिणी आली आणि तीचं रूप पाहून सर्व चराचर थक्क झाले. 

स्वये श्रीपती मोहून फक्त पहात आहे, समाधिस्थ होऊन, त्याचा पुतळा झालाय. या मोहक रुपाला पाहून कृष्ण चारी धाम , तिन्ही लोक , सप्त स्वर्ग, सप्त पाताळ यांसह समस्त ब्रह्मांड भुलला. निजरूपास भुलला. त्याची ही अवस्था पाहूंन सुभद्रा आणि रेवती कौतुकाने रुक्मिणीकडे पहात आहेत आणि त्याही मोहून गेल्या. कृष्ण मोहरून गेला. रुक्मिणी रूप पाहून.

गौर वर्ण , विशाल नयन , भव्य भाल, सुकुमार तनू, कृष्णाला मोहित करण्यासाठी नेत्री अंजन घातलंय , सुरेख भुवया, सरळ नासिका, भाळी बहुत तेज, श्रीमुखी प्रभा, सरळ  बाहू, अंगुली नाजूक मोठ्या आणि त्यातील आठही अंगुष्ठया बहुमोल हिरेजडित.  त्यातच एक कृष्णमुद्रिका, नाकात मोतीजडीत नथ , माथ्यावर सुवर्ण जाळीचा दागिना, कपाळी कुंकूम टिळ, कोमल आणि सुरेख तळवे व तळहात. क्षिरोदक पाटोळा नसलेला आहे, त्यावर रत्नजडित सुवर्ण मेखला आहे आणि सुनिळ कांचोळी,  गळ्यात मोत्याची पदके, सर आणि माळा आहेत. हातात रत्नांचे कंकण, दंडाला सुवर्ण वाकी, पायातील नुपूर पाहून आणि त्यांच्या तेजाने स्वतः मदन स्तंभित आणि स्तिमित आहे. 

या सर्व गोंधळात कृष्णाकडील पुरोहित विधी सुरू करावयास विसरले म्हणून भीमक राजांच्या पुरोहितांनी विधींना सुरवात केली.

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२३/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...