Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८०(विवाह सोहळा ८)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८०(विवाहसोहळा ८)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
भोजनोत्तर सर्वांना विडे देऊन तृप्त करण्यात आले. कृष्णाच्या सवे भोजन केलेले यादव आत्मिक तृप्तीचा आनंद घेऊन निजसुखावर संतोष पावले. सर्व यादव त्यासोबत असलेले सर्व प्रजाजन,  आचार्यगण अन्य अतिथी कोणीही जेवताना बास वा पुरे हा शब्दप्रयोग केला नाही. कारण भोजन इतके स्वादिष्ट होते की प्रत्येक नवीन पदार्थ आधीच्या पदार्थांची चव विसरायला लावत होता. आधीच्या पदार्थाची तृप्ती पुढील पदार्थ पुसत असल्याकारणे प्रत्येकाला एक जिन्नस संपताना पुढील पदार्थाची इच्छा लागून रहात होती. 

राजा भीमक आणि राणी शुद्धमती कृष्णाच्या समोर विनम्रपणे  कर जोडून उभे राहिले. अर्थात उष्टावण म्हणून कृष्णाने आपली मुद्रिका ठेवली आणि आपल्या पानात काही जिन्नस खाऊन उरवले रुक्मिणीसाठी. मुद्रिका पाहून शुद्धमती हर्षाने उल्हसित झाली. त्वरेने तिने ती मुद्रिका भीमकीकडे तिच्या हातात घालण्यासाठी पाठवून दिली. रुक्मिणीच्या सख्या कृष्णरूप पाहून भाव आणि वृत्तीरहीत होऊन हरवून गेल्या होत्या.अर्थातच त्यांना रुक्मिणीच्या भाग्याचं कौतुक आणि हेवा दोन्ही वाटत होतं.

सर्वांनी तृप्तीची ढेकर दिली. अर्थातच कृष्णाने देखील तृप होत गळ्यातील मोत्यांच्या माळा काढून आपल्या पानापुढे ठेवल्या. अर्थातच शुद्धमतीने त्वरेने त्या उचलून आपल्या गळ्यात घातल्या. तितक्याच त्वरेने तिने आनंदाने कसलीही पर्वा न करता कृष्णचरणी माथा ठेवला. या सर्वांत जवळ जवळ पूर्ण रात्र सरत आली. याकरणे पुरोहितांनी लगबग सुरू केली. राजांना म्हटले की हे राजन मुहूर्त गाठण्यासाठी आता लगबग करावी लागेल, त्यामुळे आपण समस्त यादवांना लग्नमंडपी जमण्याची विनंती करा आणि आम्हाला पुढील तयारीला लागू द्या.

याचवेळी राणी कृष्णास वंदून लगबगीने आणि अतिहर्षाने कृष्णउच्छिष्ट घेऊन रुक्मिणीकडे आली. रुक्मिणी ते कृष्ण उच्छिष्ट पाहून अतिमोदे ते पान आपल्या हाती घेती झाली. प्रत्येक घास , त्यास नमन करून, त्याचे सेवन करताना रुक्मिणीला क्षीरसागरीच्या समाधीचा अनुभव येत होता. प्रत्येक घास तिला अंतर्यामी निजानंदाचा अनुभव देत होता. त्या कृष्णउच्छिष्टाची अवीट गोडी चाखण्यात रुक्मिणी हरवून गेली. 

तद्नंतर रुक्मिणीने मुद्रिका ह्रदयी धरून निजभाळी लावली आणि आपल्या अनामिकेत चढवली.  त्या मुद्रिकेचे तेज रुक्मिणीच्या सर्वांगी दिसू व जाणवू लागले. शुद्धमतीने त्वरित साजिऱ्या रूपातील रुक्मिणीची दृष्ट काढली. मंडपात मुहूर्ताची घटी साधण्यासाठी पुरोहितांनी लगबग सुरू केली. भराभर आदेश निघत होते तसे तसे सामान सुमान येत होते. पुरोहित ते निजजागी लावून लग्नाच्या तयारीला लागले. सर्व वऱ्हाडीमंडळी आणि कौंडिण्यपूर वासी मंडपात जमायला सुरवात झाली. भोजनाच्या तृप्तीमुळे आणि सुस्तीमुळे समस्त जन आपल्याला साजेशी जागा पाहून पुढील विधींची प्रतीक्षा करत होते. 

काळ सरत होता, घटिका जात होत्या, मुहूर्त समीप येत होता.  कृष्ण रुक्मिणीच्या विवाहासाठी धरा सज्ज जाहली अवघी सृष्टी नटली. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२२/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...