Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८६ (विवाह सोहळा १४)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८६ (विवाहसोहळा १४) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
शुद्धमती देवकीच्या सदनी जाऊन हात जोडून वदली की, आपण कृष्णाची माय अर्थात वरमाय आपल्या सुनेचं मुखदर्शन घेण्यासाठी यावं, अशी मी आपल्याला विनंती करते. शुद्धमतीने देवकीला सुखासनी बैसवून विडा दिला आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने येण्याचं आमंत्रण केलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून देवकी त्वरेने लग्नमंडपी निघाली. छत्र चामरे आणि चवऱ्या ढाळत देवकीला शुद्धमतीने वाद्य गजरांच्या नादात लग्नमंडपात आणले. 

कृष्णरुक्मिणी जोडा खूपच लोभस दिसत होता. ते पाहून, तिथे आलेल्या देवकीने दोघांची दृष्ट काढली. कृष्णाची दृष्ट काढल्यानंतर मीठमोहरी अग्निअर्पण करताना अग्नी ते घेण्यासाठी धावत वर आला.  कारण कृष्णाच्या मागे लागलेले वाईट काहीही त्वरेने जळून जावे आणि त्याचे श्रेय मला मिळावे या आनंदाने अग्नीने ते कार्य त्वरेने केले. त्यानंतर देवकीने रुक्मिणी व कृष्णाला मांडीवर  बसवून आरशात सूनमुख पाहिले आणि त्याप्रीत्यर्थ तिला कानातले भेट म्हणून दिले. 

या भेटीने कृष्ण रुक्मिणी हरखून गेले. दुसऱ्या दिवशी यादवां कडे जाऊन सोळा मेहुण आमंत्रित करून  भीमक आणि शुद्धमती परत आले. अर्थातच त्या सोळा मेहुणांबरोबरच कृष्ण परिवार होताच भोजन समारंभाला. जमलेल्या सर्व मंडळींचा कृष्णाला हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सोबतीला अर्थात भजन गायन सुरू होतंच.  अर्थात हे हळदी लावणं रुक्मिणी करणार होती.

यास्तव कृष्णाला चौरंगी बसवण्यात आलं. भीमकीच्या हाती हळद चंदन आणि उत्तम उटणे होतं. सर्व स्त्रिया श्रीकृष्णाला चिडवत होत्या. आता आजपासून कृष्ण अधीन झाला. यावर रुक्मिणी  लाजून कृष्णाकडे पहात होती तर कृष्ण देवकीकडे व रुक्मिणीकडे स्मित करत पाहत होता. अर्थात कृष्णदेह सावळा असल्याकारणाने यादव स्त्रिया रुक्मिणीला सांगत होत्या की, चांगलं हळद चंदन लावून रगडून काढ म्हणजे जरासा उजळ होईल आणि तुझ्या हाताचा गुण लागलाच तर थोडा तुझा गौर वर्ण त्याला मिळेल.

हळद चंदन आणि सुगंधी उत्तम उटणे लावून कृष्णांगासी रगडून काढल्यानंतर रुक्मिणीने कृष्णचरणी चंदन लावण्या साठी चरण मागितले. अर्थात कृष्णाने आपले चरण पुढे केले आणि तेल लावण्यासाठी रुक्मिणीने तळपायाकडे नजर नेली. रुक्मिणीला समस्त ब्रह्मांड तळपायी दिसले. सर्व दिसल्यावर तिने स्वतःला लक्ष्मीरूपात पाहिले आणि ते पाहून तिला मूर्च्छा आली. कृष्णाने लगेच पडणाऱ्या रुक्मिणीस हाताने आधार देऊन सावरून बाजूला बसवले.

थोडं पाणी पिऊन शुद्धीत आलेल्या रुक्मिणीला सर्वांनी प्रश्न केला की, अशी एकदम कशी मूर्च्छा आली तुला रुक्मिणी. कृष्णा तू जरा जास्तच रगडून घेतलंस. अरे तुझा हा पिळदार मर्दानी देह आणि तिचे नाजूक हात,झेपलं नसेल तिला. आता जे पाहिलं ते सांगणार कसं या संभ्रमात रुक्मिणी असताना कृष्णच वदला की, कदाचित गेल्या काही दिवसात झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास यामुळे तिला थकवा आला असेल, जरा आराम केला की बरं वाटेल. याला अर्थात सर्वांनी दुजोरा दिला. पण रुक्मिणी सावध होत म्हणाली की मी आता ठीक आहे आणि विश्रांतीची आवश्यकता नाहीये. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२८/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...