Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६३

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
 या सर्व परत निघालेल्या राजे रजवाडे यांना राजा भीमक आणि रुक्मि सामोरे गेले. राजा भीमकाने हात जोडून नम्रपणे म्हटले.

" आपण सर्वांनी वऱ्हाडी म्हणून येणे करूनसुद्धा कोणत्याही अवताणाशिवाय माझी कन्या रुक्मिणी हिला कृष्णाकडून सोडवून आणण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल मी समस्त प्रजेतर्फे व राज्यातर्फे आपला कृपाभिलाशी आहे.  या उपकारांची फेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही.  आपल्याला या कार्यात येऊन, तद्नंतर  झालेल्या त्रासाबद्दल मी अत्यंत खजील आहे. आपण मला क्षमा करावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे." 

जरासंध सर्वांच्या वतीने पुढे आला. त्याने राजा भीमकाचे हात हातात घेऊन त्यांना क्षमा न मागण्याची विनंती केली. "विदर्भ राज्याचा हितचिंतक म्हणून जे शक्य होतं तेच आम्ही केलं."  इतकं बोलून तो रुक्मिकडे वळला. रुक्मि रागाने लाल झाला होता. जरासंध आणि इतर सर्व राजांनी कर्तव्यकार्य म्हणून जे केलं ते त्यांच्या जागी योग्यच होतं. पण जरासंध रुक्मिच्या जवळ येताच रुक्मि गरजला

" हे महाराज जरासंध त्या कृष्णाने माझी भगिनीच नव्हे तर या राज्याची इभ्रत पळवून नेली आहे. त्यामुळे आता ती इभ्रत परत मिळवणं हेच माझं इतिकर्तव्य आहे. ते साध्य करून कृष्णाला परास्त करून रुक्मिणीस परत आणत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. 

मी हे करू न शकल्यास ब्रम्हहत्येसारख्या घोर पापाचा मी धनी होवो. मी जर रणात कृष्णाला हरवलं नाही तर साधू निंदेचे घोर पातक मला लागुदे. विद्या मिळाल्यानंतर जर गर्व झाला तर गुरू निंदेचे पातक लागते.  ते पापही मला लागो जर मी श्रीपतीला हरवू शकलो नाही. आपल्याच माता पित्यांना लाथा घातल्यावर पुत्रास जी जी पातके लागतात ती सर्व मला लागोत जर मी रणात कृष्णास हरवू शकलो नाही. 

साधू सज्जन व संत यांच्यावर मिथ्या आरोप केले तर ते घोर पाप ठरते. ते पापदेखील मला लागो, जर मी कृष्णापुढे अपयशी ठरलो तर. आता जर मी कृष्णास न हरवण्यात  आणि रुक्मिणीस न सोडवण्यात असमर्थ ठरलो तर मी या राज्यात परत येणार नाही. कौंडिण्यपुराला कधीही तोंड दाखवणार नाही." 

इतके बोलून जरासंध आणि इतर राजाचा निरोप घेऊन पुन्हा वदता झाला.

" आता तुम्ही बघाच माझा पराक्रम.तो कृष्ण ज्याला अज्ञान आहे आणि बळजोरीने माझी भगिनी रुक्मिणी हिला राक्षस पद्धतीने पळवून नेऊन वरू इच्छितो, त्याची ही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही. त्याला त्याच्या या प्रमादाचा योग्य तो दंड देईनच. तो कृष्ण स्वतःस खूप मोठा योद्धा समजतो पण अजून त्याचा या रुक्मिशी सामना झालेला नाही.  म्हणून माझ्या शक्तीचा त्याला प्रत्यय द्यावाच लागेल"

इतके बोलून रागाने थरथरता कापणारा, दात ओठ खात खात जाणारा आणि क्रोधाने नासिकेतून उग्र ज्वाळा येत असलेला रुक्मि  मदगर्वित अवस्थेत, त्वरेने कवच बांधून व तिरकमठा आदी आयुध घेऊन कृष्ण जिथे होता त्या ठिकाणी जाण्यासाठी रथारुढ  झाला आणि सारथ्यास म्हणाला.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०४/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...