Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ७३

राम अनुज भरत भाग ७३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले   माता कौसल्या गहिवरली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. भरताने मातेला स्नेहपूर्वक आलिंगन देऊन आपल्या हृदयाशी धरले. मातेचा गहिवर बऱ्याच प्रमाणात कमी झाला. दोन सेविकांनी तिला धरून बाजूला नेले आणि रथात बसवले. तदनंतर भरत माता सुमित्रा हिच्या समीप गेला. ह्रदय पूर्वक चरण स्पर्श करून, भरताने मातेला नमस्कार केला. मातेने त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले आणि हृदयाशी धरले.  मातेला भरताची चिंता वाटत होती. कारण तिचा एक पुत्र रामासह वनवासात गेला होता तरीही, दुसरा पुत्र शत्रुघ्न, हा तीनही मातांच्या समीप चौदा वर्षे असणारच होता. पण भरत असा दुर्दैवी जीव होता,जो त्याच्याच मातेच्या कर्मामुळे, आपला प्राणसखा आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पासून चौदा वर्षे दुरावला होता. राम लक्ष्मण हे सावली समान होते. परंतु भारत हा रामाच्या हृदयात होता. नव्हे तर तो रामाचा प्रथम भक्त होता.  या कारणाने तो आत्मिक दृष्टीने रामाच्या अत्यंत समीप होता. लक्ष्मण हा रामाची सा...

राम अनुज भरत भाग ७४

राम अनुज भरत भाग ७४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले    भरताने, मांडवीकडे पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. मांडवीच्या नेत्रात अनेक प्रश्न होते. कदाचित मूळ संस्कार जनक राजाच्या घराण्याचे असल्यामुळे, अव्यक्त भाव जास्त सहज व्यक्त करण्याचं साधन हे लोचन असावेत. कारण तो काळसुद्धा अव्यक्तातून बरेच भाव व्यक्त करण्याचा होता. अल्प, स्वल्प कथनातून, गुह्य गोष्टी, गहन अर्थ सांगून, समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ शोधण्यासाठी उद्युक्त करून, भावार्थ जाणून घ्यायला लावायचा, तो काळ होता.  त्यामुळे मांडवीच्यां मनात काय चाललं असेल, हे अव्यक्त असूनही जाणून, भरत म्हणाला "नियतीने, ज्या कार्यासाठी आपला जन्म घडवून आणला आहे, त्या कार्याची सुरुवात आता झाली आहे. या कार्यात प्रत्येकाला काही दायित्व दिलेलेच आहे.प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्यासाठी जो कार्यभाग घडवला आहे, तो कदाचित अधिक असाधारण असणार. अन्यथा ज्येष्ठ भ्राता विनाकारण देवी सीतेला सोबत घेऊन गेलेच नसते. पण भ्राता लक्ष्मण आणि ऊर्मिला यांची स्थिती अधिक खडतर आहे,...

राम अनुज भरत भाग ७८

राम अनुज भरत भाग ७८ (आजचा भाग लिहून अक्षरशः स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त झाली. वाचकांनी सुद्धा त्याचं भावाचा लाभ घ्यावा) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले विचारांच्या व गंगेच्या प्रवाहात हरवलेला भरत, जलात विहार करत, पलीकडील किनारी कधी पोचला, त्यालाही कळलं नाही. त्या विस्तीर्ण जलाशयाचा वेध एकवार त्याच्या नजरेने घेतला आणि तो विचार करता झाला की, हा जलप्रवाह, अखंड, अविरत, कोणत्याही आपत्तीत, परिस्थितीत विहरत असतो. याला कोणतीही बाधा आवरू शकत नाही किंवा बांधू शकत नाही. नित्य हा खळाळत वहात असतो. म्हणूनच यातील जल स्वच्छ, सुंदर, स्फटिकासमान आहे. म्हणजेच याच्या स्वच्छ नितळ जलाचं रहस्य, याच्या नित्य वाहण्यात आहे. मनाचं असच असायला पाहिजे. जर ते मन घटनेच्या, प्रसंगांच्या, क्षणांच्या बांधात अडकलं तर, ते गढूळ पाण्यासमान होईल आणि मग अश्या मनात येणारे विचार, हे नक्कीच पथदर्शी, पारदर्शक नसतील आणि मन, मस्तिष्क यांना देखील अस्वच्छ करतील. अश्यावेळी त्या मनात येणारे,सर्व विचार हे मन,देह आत्मा यांना अचिंतनीय विचारात गुंतवून ठेवतील....

राम अनुज भरत भाग ७७

राम अनुज भरत भाग ७७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रदीर्घ काळानंतर इतकी निरव शांतता व जलप्रवाहात विहार करण्याचा आनंद, भरत घेत होता. या शांततेत विचारांचं मंथन सुद्धा आता हळूहळू बाहेरच्या स्तरातून, मनाच्या आतल्या पटलाकडे जात होतं. मनातील वर्तमान आंदोलनं आता स्थिरावण्याची स्थिती येत होती. भाव आता अधिक खोलीतून जाऊन, पटलावर येत होते. किंबहुना, काहीं काळापूर्वी आपण, याचं विचारांच्या प्रवाहात, अविचारीपणाने वागलो, वावरलो का, असा विचार वारंवार मनाच्या वरच्या पातळीवर येत होता. पण अत्यंत विचारी, बुद्धीमान, ओजस्वी आणि वेद शास्त्र यांचा प्रकांड पंडित असलेला भरत, असा विचारांच्या वादळातून, वहावत जाऊन, अविचारी कृती करण्याचा निर्णय घेणारा नव्हता आणि नाही, हे त्याच्या मनाला जाणवत होतं. परंतु मग आता पर्यंत, काळाचा काही भाग, हा भरत जे काही करून गेला त्याचा भावालेख, मनाच्या पटलावर, असा कसा चितारला गेला असेल, हा विचार भरताच्या मनात येत होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेला भरत, जवळपास, आपले ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांची अजोड प्...

राम अनुज भरत भाग ७६

राम अनुज भरत भाग ७६ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले सर्वजण अयोध्येला परतून जात असलेले,एकटक पहात, आपल्याच विचारात हरवलेला भरत, निश्चल उभा होता. सर्वांनी प्रस्थान ठेवलं आणि सोबतचा सर्व गोतावळा दूर गेला, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवी सीता व अनुज लक्ष्मण, दूर चित्रकूट येथील वनात,तातश्री महाराज दशरथ स्वर्गस्थ प्रस्थान करते झालेले आणि बाकी सर्व परिवार अयोध्येत गेलेला. आता भरत एकटाच उरला होता. अश्या परिस्थितीत स्वतःला सावरून, संध्या समयाच्या स्नानादी नित्य कर्म आणि पादुकांच्या नित्य पूजना साठी, भरत, जवळ असलेल्या गंगेच्या तीरावर, स्नानाची तयारी करून, निघाला.  मध्यांहीचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा समय झाला होता. उन्ह परतीला निघाली होती. ती पूर्ण क्षितिजाच्या पलिकडे जाण्याआधी, स्नान करून,संध्या विधी करून, पादुका पूजन करण्याच्या लगबगीने, भरत, गंगेच्या तिराकडे निघाला.  नदीच्या एका बाजूला नगराच्या जवळ, राजा रघुच्या वंशातील, सर्व कुलदीपक राजांनी,गंगा नदीच्या किनाऱ्या वर, दोन्ही बाजूंना, उत्तम असे घाट, त्या घटां...

राम अनुज भरत भाग ७५

राम अनुज भरत भाग ७५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले मांडविचा निरोप घेतल्यावर, भरत हा, शत्रुघ्न आणि शृतकिर्ती याना एकत्र बोलावून, शत्रुघ्नचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणाला.  " हे शत्रू विनाशक, शत्रुघ्न आणि शृतकिर्ती, ज्येष्ठ भ्राता अधिपती श्रीराम आणि देवी सीता जर, घटना प्रवाहाच्या एका टोकाला उभे राहून, प्रत्यक्ष नियतीला सामोरे गेले असतील, तर तुम्ही दोघे, नियतीच्या घटनारूप शृंखलेच्या दुसऱ्या टोकाला आहात. अर्थातच, जे महत्तम दायित्व ज्येष्ठ भ्राता आणि देवी सीता निभावून नेत आहेत, त्याच दायित्वाच्या महत्वाच्या कार्याचा भार नियतीने तुम्हाला सोपवला आहेत.  याचं महत्वाचं कारण म्हणजे, नियतीच्या या कोड्याचा प्रत्यक्ष भेद करणारा जितका महत्वाचा असतो, तितकाच महत्वाचा सहभाग, दुसऱ्या टोकाला उभे राहून, दुसरी बाजू कणखरपणे सांभाळणाऱ्याचां असतो. तुम्हाला या सर्वात, अत्यंत महत्तम कार्य हे आहे की, वचन बद्ध ज्येष्ठ भ्राता, चौदा वर्षे पुन्हा परत येई पर्यंत, तीनही मातांना, सांभाळून, त्यांची मानसिक व आत्मिक ऊर्जा स्थ...

राम अनुज भरत भाग ७२

राम अनुज भरत भाग ७२ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले गुरुदेव श्री वसिष्ठ महर्षी यांनी प्रस्थान ठेवल्यावर, त्यांच्या परतून चाललेल्या, देहाकृती कडे पाहून, भरताने पुन्हा एकवार वंदन केलं आणि तत्पश्चात आपल्या परिवाराकडे वळले.सर्वप्रथम माता कौसल्या,हिच्यापर्यंत येऊन, भरताने आपले दोन्ही कर आणि शीश, मातेच्या चरणांवर टेकवून, प्रसन्नतेने प्रणिपात केला. मातेच्या नेत्रात अखंड धारा होत्या.  परंतु, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांच्या चरण पादुका प्राप्तीने, त्यांच्या पादुकांच्या आसनस्थ झाल्याकारणाने, पण त्याहीपेक्षा, प्रत्यक्ष श्रीरामांनी आपल्याला, त्यांच्या पादुकांचं, या अखिल जगतात, प्रथम प्रतिनिधित्व दिलं, या मुख्य कल्पनेने, भरत आता चिद्घन आकाशाप्रमाणे, चिदानंदी रममाण झाल्यामुळे,आतून व बाहेरून पूर्ण शांत झाला होता. त्यामुळे मातेच्या लोचनातील अश्रू धारा, आपल्या सुकोमल हातांनी पुसत पुसत मातेला म्हणाला. " हे माता कौसल्या, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना घेऊन, येण्याचे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न, आपल्या पुत्र भरताने केले होते. पण...

राम अनुज भरत भाग ७१

राम अनुज भरत भाग ७१ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले आर्य सुमंत यांना राजकुमार भरत याच्या मुखातून स्तुती ऐकून, अनंत वर्षांच्या आपल्या सेवेची कृतकृत्यता झाली हे आत्मभाव प्रकट झाले आणि कर्तव्यासाठी, इतकी वर्षे केलेली सेवा परिपूर्ण झाली, हे भाव, त्यांच्या नेत्रात दाटून आले. यांच्या नेत्रातून सहस्त्र अश्रुधारा बरसत होत्या. त्यांचा कंठ दाटून आला आणि आवाज कापरा झाला. त्यांना काय बोलावे हेच सुचत नव्हते.  सद्गतीत स्वरात, त्यांनी आपल्या दोन्ही करांनी, राजकुमार भरत याला विनम्र प्रणिपात केला. भरताने त्यांचे दोन्ही हात आपल्या हातांनी धरले आणि म्हणाला. "आर्य आपण पिताश्री असल्यापासून आहात. त्याअर्थाने आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. आपण असा प्रणाम करणं योग्य नव्हे. आपण स्वतःआमच्याकडून प्रणीपातास पात्र आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवेचे, स्वर्गीय महाराज दशरथ आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यासह आम्ही चारही बंधू सदैव ऋणी राहू. आपण आम्हाला मार्गदर्शन करत राहाल या विश्वास आहेच. " भरताचे हे कृतज्ञता व्यक्त करणारे बोल ऐकून, जमलेल...

राम अनुज भरत भाग ६८

राम अनुज भरत भाग ६८ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले परम प्रतापी प्रभू श्रीराम, भ्राता लक्ष्मण याला बोधवचन देत असताना, इकडे अयोध्येला निघालेले समस्त राम भक्त, नंदीग्राम च्या समीप येऊन पोचले. भरताने, आधीच दोन मंत्री आणि सोबत काही सचिव, अधिकारी आणि सेवकवर्ग यांना अयोध्येला धाडून, राजकुमार भरत हा, आपल्या माता, आपला परिवार व सोबत नेलेले समस्त अयोध्यावासी यांच्यासह नंदीग्राम येथे, पोचला आहे, असा संदेश धाडला होताच. आपण स्वतः नंदीग्राम येथे राहून, पादुका स्थापन करून, येथूनच संपूर्ण अयोध्येचा राज्यकारभार पाहणार असल्याचा संदेश सुद्धा, त्यांच्या सोबत धाडला होताच.  ठरल्याप्रमाणे सर्वजण, नंदीग्राम येथे थांबले. भरताने, तेथे, एक सुबकशी पर्णकुटी बांधून घेतली. त्याभोवती अंगण आणि त्याला जोडून, सर्व बाजूंनी, कुंपण बांधून घेतले. स्वतः भरत शत्रुघ्न यांसह, काही सेवक वर्गाने, हे कार्य संपन्न केलं. राजपरीवार, विशेषतः तीनही माता आणि मांडवी अत्यंत दुःखी होत्या. कारण यापुढील चौदा वर्षे, भरत येथेच राहणार होता. अत्यंत व्यथित करणा...

राम अनुज भरत भाग ७०

राम अनुज भरत भाग ७० श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले आपल्या प्राणप्रिय असलेल्या,ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पादुका, आपल्या पर्णकुटीच्या स्थानी स्थापित केल्यानंतर भरत, जवळच उभ्या असलेल्या, आर्य सुमंत याना म्हणाला. " आर्य, आपण ज्येष्ठ मंत्री या नात्याने, स्वतः अयोध्येत राज्य सभागृहात नित्य उपस्थित राहून, दैनंदिन कार्य व्यवस्था पहाल. सर्व प्रकारच्या महत्वाच्या विषय आणि प्रसंग संदर्भातील, सर्व घटना व तपशील आपण आमच्या कडे धाडाल.त्यावरील, श्रीराम प्रेरणेने, आम्हाला प्राप्त आदेश,आम्ही आपल्याकडे कार्यवाही साठी पोचवू. आपण त्याची अंमबजावणीही त्या सूचनेनुसार करावी.  कोणत्याही, अत्यंत विपरीत व आपत्तीजनक स्थितीत, आपण,आपल्या बुद्धी, सिद्धी व अनुभव यानुसार उपयुक्त कार्यवाही करावी व आम्हाला सूचित करून, आमच्या कडून प्राप्त सूचनेनुसार,पुढील व्यवस्था करावी. घडत. असलेल्या सर्वच गोष्टींची माहिती आपण, श्रीराम पादुकां मार्फत, ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना देत राहू.  त्यावर ज्येष्ठ भ्राता, आपल्याला, नक्कीच सद्बुद्धी द...

राम अनुज भरत भाग ६७

राम अनुज भरत भाग ६७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रभू एकाग्रचित्त ऐकणाऱ्या लक्ष्मणाला, तितक्याच तन्मयतेने पुढे म्हणाले.  परंतु मनाच्या समाधानाने, खरा माणूस ओळखला गेला पाहिजे. किंवा तो तसा ओळखला जावा, हेच विधात्याला अपेक्षित आहे.त्यातही मनात स्वप्राप्तीच्या आनंदाने प्राप्त समाधान, हे मर्यादित काळापर्यंत टिकतं. पण चिरकाल समाधान, हे आपण दुसऱ्याला दिलेल्या आणि आपल्या मुळे दुसऱ्याला प्राप्त झालेल्या आनंदामुळे प्राप्त होतं. समाधानाच्या प्राप्तीचा हा आनंद, मिळाल्याने प्राप्त न होता, दिल्यामुळे प्राप्त झाला पाहिजे.  समस्त विश्वाच्या अंतिम आनंदाचे समाधान हे दुसऱ्याला काही दिल्यामुळे, त्या सदर प्राण्याला प्राप्त झालेल्या आनंदाने, आपल्याला मिळाले पाहिजे. कदाचित हाच विधात्याच्या विश्व निर्मितीचा उद्देश असणार, लक्ष्मणा. म्हणून या दुसऱ्याच्या मनाला मिळालेल्या आनंदाने, आपण संतोष पावणं हे जीवना तील सर्वात मोठ सुख आहे आणि भरताला आनंद देऊन, मी ते सुख प्राप्त करू शकलो, याचा मला आनंद आहे.  अशी सूक्ष्मातील ...

राम अनुज भरत भाग ६९

राम अनुज भरत भाग ६९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले नियतीच्या फटकाऱ्यातून, कोणीही वाचलं नव्हतं. प्रत्येक जण या एका घटनेने, व्यथित आणि करुण अवस्थेत होते. मौन आणि मुक रुदन करत असलेल्या प्रत्येकाच्या मनात, राम प्रेमाचा आणि त्या प्रेमापायी विरहाचा डंख घेत होता. प्रत्येकजण विमनस्क अवस्थेत उपचार म्हणून, अयोध्येला आपल्या गृहाकडेः पुन्हा माघारी परत चालला होता. चित्र कूटाकडे निघताना,प्रत्येकाला आस होती की,श्रीराम, माझे प्रभू श्रीराम, भरताचा आग्रह, ओलांडू शकणार नाहीत आणि जिथे असतील, तिथून,भरतावरील प्रेमा साठी, माघारी नक्की येतील. परंतु काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतात, त्यावेळी नियतीचा हा निष्ठुरपणा, आपल्याला आघात करून गेला तरीही, त्यामध्ये, नियतीचा अंतिम उद्देश,अखिल जगताचं हित आहे, हे फक्त नियतीलाच ज्ञात असतं. काळाच्या उदरातील काही उत्तरं, नियती, आपल्या गूढ पद्धतीनेच देते. त्या उदरातील गर्भात, उद्याच्या भविष्यासाठी, काय गर्भजनन होत आहे, हे एक विधाता व त्याच्या पोटी जन्म घेतलेल्या नियतीचा गर्भ जाणत होता. पण त्यास...

राम अनुज भरत भाग ६७

राम अनुज भरत भाग ६७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रभू एकाग्रचित्त ऐकणाऱ्या लक्ष्मणाला, तितक्याच तन्मयतेने पुढे म्हणाले.  परंतु मनाच्या समाधानाने, खरा माणूस ओळखला गेला पाहिजे. किंवा तो तसा ओळखला जावा, हेच विधात्याला अपेक्षित आहे.त्यातही मनात स्वप्राप्तीच्या आनंदाने प्राप्त समाधान, हे मर्यादित काळापर्यंत टिकतं. पण चिरकाल समाधान, हे आपण दुसऱ्याला दिलेल्या आणि आपल्या मुळे दुसऱ्याला प्राप्त झालेल्या आनंदामुळे प्राप्त होतं. समाधानाच्या प्राप्तीचा हा आनंद, मिळाल्याने प्राप्त न होता, दिल्यामुळे प्राप्त झाला पाहिजे.  समस्त विश्वाच्या अंतिम आनंदाचे समाधान हे दुसऱ्याला काही दिल्यामुळे, त्या सदर प्राण्याला प्राप्त झालेल्या आनंदाने, आपल्याला मिळाले पाहिजे. कदाचित हाच विधात्याच्या विश्व निर्मितीचा उद्देश असणार, लक्ष्मणा. म्हणून या दुसऱ्याच्या मनाला मिळालेल्या आनंदाने, आपण संतोष पावणं हे जीवना तील सर्वात मोठ सुख आहे आणि भरताला आनंद देऊन, मी ते सुख प्राप्त करू शकलो, याचा मला आनंद आहे.  अशी सूक्ष्मातील ...

राम अनुज भरत भाग ६७

राम अनुज भरत भाग ६७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रभू एकाग्रचित्त ऐकणाऱ्या लक्ष्मणाला, तितक्याच तन्मयतेने पुढे म्हणाले.  परंतु मनाच्या समाधानाने, खरा माणूस ओळखला गेला पाहिजे. किंवा तो तसा ओळखला जावा, हेच विधात्याला अपेक्षित आहे.त्यातही मनात स्वप्राप्तीच्या आनंदाने प्राप्त समाधान, हे मर्यादित काळापर्यंत टिकतं. पण चिरकाल समाधान, हे आपण दुसऱ्याला दिलेल्या आणि आपल्या मुळे दुसऱ्याला प्राप्त झालेल्या आनंदामुळे प्राप्त होतं. समाधानाच्या प्राप्तीचा हा आनंद, मिळाल्याने प्राप्त न होता, दिल्यामुळे प्राप्त झाला पाहिजे.  समस्त विश्वाच्या अंतिम आनंदाचे समाधान हे दुसऱ्याला काही दिल्यामुळे, त्या सदर प्राण्याला प्राप्त झालेल्या आनंदाने, आपल्याला मिळाले पाहिजे. कदाचित हाच विधात्याच्या विश्व निर्मितीचा उद्देश असणार, लक्ष्मणा. म्हणून या दुसऱ्याच्या मनाला मिळालेल्या आनंदाने, आपण संतोष पावणं हे जीवना तील सर्वात मोठ सुख आहे आणि भरताला आनंद देऊन, मी ते सुख प्राप्त करू शकलो, याचा मला आनंद आहे.  अशी सूक्ष्मातील ...

राम अनुज भरत भाग ६६

राम अनुज भरत भाग ६६ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले राजकुमार भरत याने आता केलेली आज्ञा ही, प्रत्यक्ष रुपात श्रीराम यांनीच केलेली आज्ञा आहे, याची जाणीव, श्रीराम पादुका प्राप्तीमुळे भ्राता भरत याच्याबद्दल निश्चित धारणा, समस्त अयोध्येच्या ध्यानीमनी, लोचनी मस्तिष्क, हृदय आणि अंतरात्मा, यामध्ये स्थिर झाली होती. कारण परत येऊन, अभिषिक्त होण्यास जरी, प्रभू श्रीराम यांनी, विनम्रपणे नकार दिला असला तरी, पादुका रुपात, राज्य पदीं स्थापित करण्याचा,भ्राता भरत याचा मनोदय, प्रभूंनी अत्यंत हर्षाने,प्रेमभराने,स्वीकृत केलेला असल्याकारणाने भरतासह समस्त राजपरिवार,सारे अयोध्या वासी, कृतार्थ आणि समाधानी होते. भ्राता भरत याला, यामध्येच आपल्या दुःखाच्या, पापाच्या ओझ्याचं परिमार्जन, दिसत होतं. या कृतार्थ भावातच ही चौदा वर्षे सहज नाही, पण समाधानात निश्चितच जातील. अयोध्या वासी यासाठी आनंदी होते की, प्रभू नाही तरी, निदान त्यांच्या चरण कमलातून प्राप्त झालेल्या, त्यांच्या प्रतीक स्वरूपाच्या, पादुकांची प्राप्ती झाली आणि त्यांची विधिवत स्थ...

राम अनुज भरत भाग ६५

राम अनुज भरत भाग ६५ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले भरत याचं विचारांच्या दाट धुक्यात हरवून. गेलेला आहे. आपल्याच विचारात हरवलेला, दोन्ही हातांनी श्रीराम पादुका धरून, रथासह आयोध्येकडे जात होता. पण मन मात्र ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्यामागे वनवासातच होतं. आपल्या मातेच्या अवास्तव, अतर्क्य आणि पुत्र मोहा पायी घडवून आणलेल्या, अनिष्ट घटनेमुळे, देवस्वरुप ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना नाहक, या कारस्थानाचं बळी व्हावं लागलं. पिताश्री महाराज दशरथ यांचा, यामधे घडलेला मृत्यू, ज्याचा आपल्या चारित्रावरील डाग, कदाचित आजन्म पुसला जाणार नाही.याचं प्रायश्चित्त म्हणून आपण आयुष्यभर जरी, श्रीराम.चरणांची सेवा केली, तरीही त्याचं परिमार्जन होणार नाही, होऊच शकत नाही. ते दुःख, ती अवहेलना, लोकांच्या नजरेत, प्रभू श्रीराम यांना आपण राज्यपदावरून दूर केल्याचां असलेला रोष, एका घातकी चुकीचा समस्ताना झालेला मनस्ताप, या सर्वांच्या विचारात, भरत, वेळ काळ सुद्धा विसरून गेला.  सारथ्य करणाऱ्या आर्य सुमंत यांनी सांगितलं,  "राजकुमार भरत, आप...

राम अनुज भरत भाग ६४

राम अनुज भरत भाग ६४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले एक लक्षात घ्या की, महाराज दशरथ यांनी सुद्धा, हा प्रश्न, कैकयीला विचारला होताच की, तुझ्या पुत्रप्रेमाच्या लोभा मुळे, भरताला राज्यपद हे अत्यंत सैयुक्तिक असू शकेल, एकवेळ, तू त्याची माता असल्यामुळे.जरी ते,मला आणि या रघु वंशाच्या रीतीला धरून नसलं तरीही, नाईलाज म्हणून का होईना, मी ते मान्य केलं असतं. पण रामाला वनवास का. म्हणजे त्याचा राज्यपदी आरुढ होण्याचा अधिकार डावलला जाणं, हा एक अन्याय, रामावर पुरेसा नाही का, कैकयी.मग कैकयी, तू रामाच्या वनवासाचां आग्रह धरू नयेस.  पण याचा नीट विचार केला तर खरी मेख ही इथेच आहे. जी राजकीय कारणाने भिन्न भासते आणि पारमार्थिक किंवा जनहित कारणाने भिन्न भासते. ती गोष्ट नीट विचार केल्या वर आणि काळाच्या पानातील काही गुह्य पदर जोडून बघितल्यावर,साधारण लक्षात येते.म्हणजे एकी कडे आपल्या पूत्रासाठी राज्याचा मोह, ते करताना, आपल्या पुत्राहून अधिक प्रिय असलेल्या, रामाला, वन वासात धाडणं आणि या सर्वाला स्वार्थी, लोभी, लालची अशी तात्कालीन द...

राम अनुज भरत भाग ६३

राम अनुज भरत भाग ६३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले त्यामुळे हा वनवासाच्या अट्टाहासाचा निर्णय का. याकडे वास्तविकपणें दोन दृष्टीने पहावं लागेल. एक राजकीय तर्क दृष्टीने आणि दुसरं धर्मकारणं दृष्टीने. राजकीय दृष्टीने पाहिलं, तर एक म्हणजे प्रत्यक्ष ज्येष्ठ भ्राता आपल्या सह असताना आणि त्याच्या समक्ष, भरताने, हे राज्य कधीही स्वीकारलं नसतं. अगदी प्रत्यक्ष, श्रीरामांनी सांगून सुद्धा.  दुसरं कारण म्हणजे श्रीराम अयोध्येत असताना, प्रजेने सुद्धा, भरताला राजा म्हणून राज्यपदी स्वीकारलं नसतं. कदाचित, प्रत्यक्ष रामासमोर, इतक्या सहजी, महाराज दशरथ यांनी ते स्वीकारलं नसतं किंवा रामाला बंड करायला उद्युक्त केलं असतं. श्रीरामांनी असं बंड केलं असतं की नाही, हा प्रश्न नंतरचा. कारण तो त्यांच्या वृत्तीचा निर्णय होता.  चौथं कारण म्हणजे लक्ष्मणाचं कालातीत अमर्याद बंधूप्रेम, ज्यामुळे, त्याने भरताला राजा म्हणून स्वीकारलं नसतं. पाचवं कारण म्हणजे जर यदाकदाचित, रामाच्या असण्याने, या निर्णयाला अस्वीकृती देऊन,  भरतानेच जर बंड ...

राम अनुज भरत भाग ६२

राम अनुज भरत भाग ६२ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले त्या परिवाराचे नावं, रघुवंश, काकुस्थ वंश असं होतं. जणू प्रत्येकाच्या गृहात श्रीराम, कुटुंबात श्रीराम, बुद्धीत श्रीराम देहात श्रीराम,मनात श्रीराम,वृत्तीत श्रीराम,हृदयात श्रीराम आणि आत्ममंदिरात श्रीराम वसत होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला वाटत होतं की, आपल्याच परिवारातील कोणी सदस्य वनवासात आहे. त्यामुळे संपूर्ण अयोध्या आणि अयोध्यावासी, चित्रकूट क्षेत्री, श्रीरामांनी पुन्हा माघारी याव, म्हणून गेली होते. अजून एक गोष्ट जी या सर्वांना बांधून ठेवणारी होती ती म्हणजे, सर्व रघुवंशी राजांनी, आपल्या प्रजेवर केलेलं आणि प्रजेला दिलेलं निस्सीम पुत्रवत प्रेम, पित्यासमान माया. ज्यामुळे, रघु राजाच्या वंशाप्रमाणेच, प्रजेच्या सुद्धा तितक्याच पिढ्या,राजाशी,वंशाशी राजघराण्याशी मायेने, स्नेहाने बांधल्या होत्या.म्हणूनच,अर्थात म्हणूनच प्रजा सुद्धा तितकीच दुःखी होती, जितकं दुःख राज परिवाराला झालेलं होतं.  याचसाठी समस्त अयोध्या नगरी, या राम. भेटीच्या कार्यार्थ जाऊन, आता एकत्र...

राम अनुज भरत भाग ६१

राम अनुज भरत भाग ६१ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले अर्थातच मातेला थोडी हुशारी आली. त्याहूनही अधिक आनंद शृतकिर्तीला झाला. ती मनमोकळे पणाने मातेकडे पाहून, स्मित वदन म्हणाली.  " तुम्हाला जितका हुरूप आला असेल त्याहूनही अनेक पट आनंद मला झाला आहे. तुम्ही माझं ऐकून, माझ्या साठी हे मधुरस पान करून, मला खरच उपकृत केलं आहे."  उत्तरादाखल माता कैकयीने, शृतकिर्तीच्या पाठीवरून, चेहऱ्यावरून, प्रसन्नतेने आणि स्नेहपूर्ण भावाने, हात फिरवला. मातेच्या मनातील खरी प्रेम भावना, शृतकिर्ती च्या हृदयात खोलवर रुजली. इतके दिवस राजप्रासादात येऊनही, अनेक कारणांनी, एकमेकींच्या फार सहवासात न आलेल्या, सासू सूना, आज अनेकविधकारणांनी, एकत्र आल्यामुळे, दोघींमध्ये एक प्रकारचा अनोखा स्नेहबंध निर्माण झाला.  हा स्नेहबंध, गतकाळाच्या, काही वेदनादायक जखमांना, भरून काढण्यास, नक्कीच उपयोगी पडणार होता. कदाचित तसा नियतीच्या मनातील, पुढला डाव असावा. या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सुवर्ण क्षणांनी बांधलेले रेशीम धागे, कदाचित काळही जाणू शकणार नव्...

राम अनुज भरत भाग ६०

राम अनुज भरत भाग ६० श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले अत्यंत गहिवर येऊन, तरीही अश्रू न येणाऱ्या, गहिवर लेल्या आवाजात माता कैकयी म्हणाली. "पुत्री, कदाचित यातील काही भाव आणि घाव तुला उमगणार नाहीत. पण तू स्वभावतः सद्गुणी आहेस, म्हणून माझ्याशी इतकी बोलत आहेस. अन्यथा......."  एवढं बोलून, माता थांबली. तिला गहिवर आला आणि आलेला आवंढा, पुढे बोलू देईना. ही गोष्ट शृतकिर्तीने ओळखून, लगेचच तिला जल प्रशनास दिले. त्या पेल्या तील, थोडे जल प्राशन केल्यावर, मातेला पुन्हा भरून आलं. शृतकिर्तीने मायेने, स्नेहयुक्त अंतःकरणाने, मातेच्या पाठीवरून हात फिरवला.त्यातील स्नेहभाव, कदाचित मातेच्या मनापर्यंत पोचले असावेत. माता कैकयी, शांत झाली. त्यानंतर, हे भाव जाणूनच, माता तिला म्हणाली. "तुझा स्नेह, वृथा आहे. मी त्यास पात्र व्यक्ती नाही, शृतकिर्ती."  शृतकिर्ती, यावर म्हणाली. "वृथा नाही माते. ज्याअर्थी ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी आपली काळजी घेण्याची विशेष सूचना केली आहे, त्याअर्थी, त्यांच्या मनात आपल्या विषयी, विशेष कोणताह...

राम अनुज भरत भाग ५९

राम अनुज भरत भाग ५९ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले आपल्या या विचारात माता कैकयी यांच्या नेत्रातून ओघळणारे अश्रू सुद्धा आता शुष्क झाले आहेत, हे शृतकिर्ती च्या ध्यानात आलच नाही. विचारांचा पदर सुटला आणि जेंव्हा ध्यानात आलं, त्यावेळी माता कैकयीला अशक्त पणामुळे, घडलेल्या सर्व घटनांमुळे आणि त्याहीपेक्षा अत्याधिक दुःख, राज्यातील जनतेने दिलेली,धिक्कार व निषेध पूर्ण दूषणं आणि त्याहीपेक्षा अत्याधिक वेदना, पुत्र भरत यांनी झिडकारून अव्हेरल्या मुळे, जो सार्वत्रिक अपमान घडला, त्यामुळे झालेला मनःस्ताप, मानभंग, हे अनेक दुःखाहून, अती वेदनादायक होतं.  कैकयी मातेला कश्या प्रकारे समजावून सांत्वन करावं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, शृतकिर्तिला. तरीही ज्येष्ठ दिर आणि आता कुटुंब प्रमुख असलेले श्रीराम, यांची आज्ञा वजा सूचना, मान्य केल्यावर, काय आणि कसं हा प्रश्नच उरत नव्हता. म्हणून, शृतकिर्ति ने प्रश्न केला.  " माता कैकयी, आपण थोडं काही अन्न ग्रहण करावं.अती कृश होऊन, अनेक आजार बळावतील."  माता कैकयी,अन्य काहीह...

नाम अवतार कलियुगी - ५

नाम अवतार कलियुगी - ५ ©® संकल्पना, शीर्षक आणि लेखन : प्रसन्न आठवले मन आणि बुद्धी हे,  या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी,  काय काय साध्य करू शकतात ते बघण्या आधी यांच कार्य आणि शक्ती स्थान पाहुया.   -  सर्वसामन्यपणे बुद्धीची आकलन शक्ती, झेप , स्मरण शक्ती, तार्किकता  या सर्व गोष्टी प्रचंड प्रमाणात असतात.  -  अस पाहणीत आढळलय की सर्वसामान्यपणे बहुतांश लोक आपल्या उजव्या मेंदूच्या क्षमतेच्या काही टक्के अथवा नगण्य  वापर देखील करत नाहीत, पूर्ण आयुष्य भर सुद्धा. अस म्हटल जातं की, आइन्स्टाइन सारख्या अणुवैज्ञानिकाने सुद्धा पूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त ३% उजव्या मेंदुचा वापर केला होता. म्हणजे सामान्य माणसाची बातच सोडा.  - अजुन एक मुद्दा जो आता कुठे उजवा मेंदू यावर विश्वास आणि संशोधन सुरु झालय. आइन्स्टाइनने उजव्या मेंदुचा वापर 3% टक्के पर्यन्त केला होता व अगम्य वाटणाऱ्या गोष्टी व अनुसंशोधन घडवून आणल. इथे एक उदाहरण आठवलं स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्तिबद्दल.  एकदा स्वामीजी अमेरिकेत एका पूलाच्या कठड्यावर बसुन पुस्तक वाचत होते. आणि एक पान वाचून  ...