Skip to main content

Posts

Showing posts from 2023

#आत्मचिंतन_बोध भाग १०

#आत्मचिंतन_बोध भाग १० ©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा. त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो.  पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत...

#आत्मचिंतन_बोध भाग ९

#आत्मचिंतन_बोध भाग ९ कालच्या भागात आपण पाहिलं की आत्म्याचा श्वासांचा हिशोब संपला की एक श्वास देखील, अतिरिक्त, आत्मा त्या देहात थांबत नाही. थांबू दिला जात नाही. कारण त्या गणितावर, पुढची अनेक गणितं अवलंबून असतात. खूप क्लिष्ट नाही पण थोडं किचकट आहे.बघुया. या जन्मा तील मृत्यूनंतर, त्या आत्म्याचा प्रवास, जो त्याच्या कर्म फलाने ठरलेला आहे किंवा त्या आत्म्याने ठरवला आहे, तो पुढे नेण्याची मोठी जबाबदारी काळ पुरूष,यम, मृत्यूची व्यवस्था, या सर्वांवर सोपवलेली असते.  त्यात कसूर होऊन चालत नाही. कारण त्या आत्म्याचा पुढील जन्म, त्या जन्मातील, अनेक भोग उपभोग, कर्म फल, त्या आत्म्याशी निगडित सर्व आणि सर्वांचे त्या जन्मातील व्यवहार, हे त्या आत्म्याच्या या देहातील गमनावर अवलंबून असतात. म्हणजे एकाचं गणित चुकलं की, त्यावर अवलंबून कितीतरी गणितं चुकू शकतात. बरं ही पुढची गणितं एकाच नव्हे तर पुढील कित्येक जन्मातील, चुकणार. म्हणजे अनेकांच्या त्या आत्म्यासंबंधी कर्म करार चुकू शकतात.  कर्म करार, नवीन वाटला शब्द तरीही त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तो अर्थ नंतर पाहू, पण पुन्हा मुद्यावर चर्चा करूया. म्हणजे किती ब...

#आत्मचिंतन_बोध भाग ८

#आत्मचिंतन_बोध भाग ८ भुलोकि जे नियम आहेत आणि जे काल पाहिले, ते खालीलप्रमाणे :  १. कर्मसिद्धांत.  २. इथलं कर्म इथेच फलित. ३. फलरहित कर्म नाही. चवथा नियम म्हणजे, जितके श्वास आहेत तितकं जगण्याचं बंधन आहे. म्हणजे जितक्या श्वासात आयुष्य लिहिलेलं आहे, ते आपल्याला जगूनच संपवणे क्रमप्राप्त आहे. याचे दोन अर्थ होतात, दोन्ही पाहूया. एक म्हणजे आपलं आयुष्य हे श्र्वासांचं आहे. याचं कारण म्हणजे, कालगणना हा मानवाने, या भूलोकात विकसित केलेला, या भुलोका साठीचा,गणिती प्रकार आहे. तो वेदकाळा पासून सुरू झाला असावा. पण हे ब्रम्हांड तयार केलं, त्यावेळी कालगणना ही श्र्वासांच्या लहरी किंवा कंपन यावर गणलं गेलं आहे. देहासाठीची ही मापन पद्धती, फक्त या मृत्युलोकासाठी आहे, हे देखील पाचवा नियम म्हणून लिहून घ्या.  ती मूळ सुरुवात किंवा मापन पद्धती आहे,जी विधात्याची उपलब्धी आहे. त्याच्या लेखी व त्यांच्या हिशोबात, आपलं आयुष्य, याच मापन पद्धतीने मोजलं जातं.म्हणजेच आपण मृत्यू पश्चात त्याच्या विशिष्ट व्यवस्थेपुढे जाऊ किंवा जातो, तेंव्हा तिथे आपला हिशोब श्वासांच्या आधारे किती झाला, याचा ताळेबंद काढला जातो. यातू...

आत्मचिंतन भाग ७

आत्मचिंतन भाग ७    सहाव्या लेखात म्हटलं त्याप्रमाणे, देह गेल्यावर, आत्म तत्त्व हे आपला हिशोब मांडून घेण्यासाठी,त्या व्यवस्थेपुढे जाते.किंबहुना तिला बळजबरीने नेलं जातं.याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहात मनाची झालेली गुंतवणूक आणि ही गुंतवणूक आत्म्याला,अनेक कारणां साठी,मागे खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, काही राहिलेले हिशोब, काही करावयाच्या गोष्टी, काही करत असलेल्या, पण अर्धवट राहिलेल्या गोष्टी.  याव्यतिरिक्त, मोहाचे, लोभाचे, वासनेचे, कुसंस्करांचे, व्यक्तिगत हेवेदावे यांचे, अहंकार,अहंगंड, दुराभिमान, दंभ, दुर्भावना, दुराग्रह, काही मनात योजलेल्या, तिरस्कार, राग, क्रोध यांच्या आठवणी, मान अपमान, दुःख, सुख यांच्या आठवणी, ठरवलेल्या पण साध्य न होऊ शकलेल्या योजनांचे आलेख इत्यादी बरंच काही, मन साठवून ठेवतं आणि ज्ञात वा अज्ञात कोणत्याही अवस्थेत देह त्याग घडल्यानंतर, मन देहाला आणि आत्मा मनाला घट्ट चिकटून राहतात आणि देह न सोडण्याच्या वासना व भावना, अंतकाळी तीव्र असतात.  म्हणजे आधीच, देह न सोडण्याची तीव्र भावना, त्यात आपल्या आत्म्याला म्हणजेच खरतर आपल्याला, घडलेला हिशोब, ईश्वरी व्यवस...

आत्मचिंतन भाग ६

आत्मचिंतन भाग ६    या पाच लेखात एक गोष्ट मनावर बिंबवली गेली असेल ती म्हणजे, आपला खरा हिशोब हा मृत्यू पश्चात होणार आहे आणि या देहात असताना, जे काही कमावलं आहे किंवा गमावलं आहे, त्याचा संबंध फक्त देहापुरता आहे आणि तो इथेच सोडून जायचं आहे. देह असताना, तो चालावा, नीट सुस्थितीत ठेवता यावा व शेवटपर्यंत तो सुस्थित रहावा, यासाठी जे आवश्यक आहे, ते केलं गेलं पाहिजे. म्हणजे देह उत्तम रहावा आणि उत्तम शरीर स्वास्थ्य व मन:स्वास्थ्य असावं, हा उद्देश असण्यात काही गैर नाही. पण त्यासाठी ज्या तडजोडी करायच्या आहेत तितक्याच केल्या जाव्यात, जेणेकरून, कधीही पश्चात्ताप करावा लागता कामा नये. तसही जो ताप नंतर अर्थात पश्चात बुद्धीने येतो आणि मनाला, बुद्धीला व आत्म्याला न्यून अथवा ताप देतो, त्याला आपल्या संचित गाठोड्यात बांधून घेऊ नये. यदाकदाचित अशी गोष्ट अनावधानाने, अनिच्छेने, मनाविरुद्ध तडजोड म्हणून करावी लागली, तर तो आपल्या पूर्वकर्म दोष होता, असे जाणावे आणि लक्षात आल्या पश्चात, त्याबद्दल ईश्वराकडे क्षमेची व करुणेची याचना करावी.  आपण वाचलं किंवा ऐकलं असेल तर, अनेक संत महंत कळत वा नकळत काही अपराध...

आत्मचिंतन भाग ५

आत्मचिंतन भाग ५   मृत्यू पश्चात आपला हिशोब कसा असावा, याचा विचार माणूस तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत मृत्यू साक्षात समोर येत नाही. कदाचित त्याही वेळी, हाच विचार मनात येत असावा की,मी काय कमावलं किंवा काय गमावलं म्हणजे पुन्हा बेरीज वा वजाबाकी. म्हणजे पुन्हा व्यापारी हिशोब. पण हा व्यापारी हिशोब वरती किंवा जिथे कुठे ही कर्माच्या हिशोबांची उजळणी होते, त्या ठिकाणी होत नाही. तर तिथे किंवा त्या व्यवस्थेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तीनच मोजमापात आत्म्याच्या त्या देहातील जन्माचा हिशोब होतो.  त्यावर आधीच्या संचीतातील किती ठेव वा देणी शिल्लक आहे, ते मिळवून, एकूण ताळेबंद मापला जाऊन, त्यातून पुढे या जीवाला काय भोगायचे किंवा उपभोगायचे आहे ते काढले किंवा ठरवले जाते. म्हणजे आपण एखाद्या जन्मात मौज मजा आणि नुसती धमाल केली असेल तर, त्यानुसार आधीच्या संचीतातील ठेवीमधे घट होऊन, पुढील जन्मी फक्त आणि फक्त भोग अर्थात देणी शिल्लक राहू शकतात.  नक्कीच आपल्यासमोर, आत्मा देह सोडून गेल्यावर, हा हिशोब, होत असणार. म्हणजे तिथे आपल्याला नक्कीच आपल्या त्या आणि आधीच्या जन्मांची शिलकी समजत असेल. चैतन्य रुपात अस...

आत्मचिंतन भाग ४

आत्मचिंतन भाग ४    मागच्या भागातील मुद्दा जरा विस्ताराने अभ्यासून पुढे जाऊ. माणसाने गेल्या पन्नास ते पंचाहत्तर वर्षात जी वैज्ञानिक प्रगती केली आहे.त्यातील एक महत्वाची प्रगती म्हणजे या आकाशगंगेत असलेल्या इतर ग्रह, इतर विश्व आणि त्याही पुढे असलेल्या इतर आकाशगंगा यांचा शोध घेण्यासाठी अनेक यांनं पाठवली आहेत. या सर्वांचा मुख्य आदर हा प्रकाशाची गती आणि ध्वनीची गती हाच आहे. म्हणजे सरतेशेवटी या दोन गोष्टी, या विश्वाला भेदून पुढे जाऊ शकतात हे विज्ञानाने मान्य केलं आहे. म्हणजेच प्रकाश आणि ध्वनी यांच्या लहरी अमर किंवा अमर्त्य आहेत. अर्थात त्यांच्या लहरी या आपलं स्वरूप बदलू शकतात आणि आसमंतात विरून जातात, पण अस्तित्व टिकवून असतात. असं वाचण्यात आलेलं आहे की, कदाचित याच तत्वाचा आधार घेऊन, काही जर्मन शास्त्रज्ञ, या आधी घडून गेलेल्या भगवदगीता कथनाचा प्रभूंच्या आवाजाचा वेध घेऊन,त्यांना पुन्हा साठवण्याच्या प्रयोगाचा अभ्यास करत आहेत.  पण एक नक्की की, कोणत्याही लहरी या एकदा निर्माण झाल्या की, नष्ट होत नाहीत. मर्त्य जगतात सुद्धा अनेक गोष्टीतून आणि अनेक कारणांनी निर्माण झालेल्या लहरी, अमर्त्य अ...

आत्मचिंतन भाग ३

आत्मचिंतन भाग ३   या जगात आणि जगताबाहेरील ब्रम्हांडात किंवा ज्ञात वा अज्ञात जगतात, वैकुंठात कुठेही, जे काही आहे, त्यामागे कार्यकारण भाव तर आहेच. पण प्रत्येक अणू मागे, काही वैज्ञानिक, शास्त्रीय कारण आणि पद्धती, व्यवस्था किंवा इंग्रजीत ज्याला system म्हणतात,ती या सर्वांचा आधार आहे.म्हणजे व्यवस्थेने चालत नाही,अशी गोष्ट अस्तित्वात नाही. इथेही नाही किंवा कोणत्याही लोकात नाही. याचं आधारावर नक्कीच हे म्हणता येईल की, मृत्यूपश्चात सुद्धा हिशोबाची काही पद्धत अस्तित्वात असणार. पण आता जर आपल्या कर्माच्या हिशोबाचा विचार केला तर, या जगतात अस्तित्वात असलेली आणि मृत्यूपश्चात पुढे जाणारी गोष्ट म्हणजे आत्मा. आपल्या हातून काया, वाचा मन व बुद्धी या चारही माध्यमाने घडलेली, घडणारी सर्व कर्म, आत्म्याच्या द्वारे एकतर, हिशोबासाठी पुढे पाठवली जात असतील, अगदी घडते वेळी. म्हणजे आत्म्यामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म रुपात, त्यांना साठवण्याची कुठलीतरी व्यवस्था असली पाहिजे.  किंवा आत्म्याला अश्या कुठल्यातरी व्यवस्थेने वा व्यवस्थेला जोडलेलं असणार, जी व्यवस्था या सर्वांचा हिशोब ठेवते. त्या व्यवस्थेपर्यंत पोचणारी ए...

आत्मचिंतन भाग २

आत्मचिंतन भाग २ मानवी देहात असताना आपण फक्त आणि फक्त देहाचा विचार केला, या गोष्टीला आठवून आत्मा, पश्र्चाताप पावतो. हा प्रत्येक क्षण होणारा पश्र्चाताप, खरतर आत्म्याला दाह देतो. हा दाह वा याचा अग्नी, वास्तविक अग्नी सारखा नसला तरीही, तो आत्म्याला नित्य जाळणारा असतो. आपण नैनं छिंदंती शस्त्राणी..... हे वचन वाचलं, ऐकलं आणि जाणलं आहे. पण तरीही मी, आत्म्याचा दाह होतो,असं का म्हणतोय, याचा विचार करूया. भुलोकीच्या पंचतत्वातील अग्नी, जल, वायू, आकाश हे नक्कीच आत्म्याला काहीही करू शकत नाहीत. अगदी भुलोकीच्या गुरुत्वाकर्षण सारख्या कोणत्याही शक्तीचा सुद्धा त्यावर परिणाम होत नाही. कारण त्यांचा अधिकार फक्त पंचमहाभूतरूप देहापुरता आहे. देह संपला की, त्यांचं कार्य, अधिकार आणि उद्देश तिन्ही समाप्त होतं आणि ते पुन्हा आपल्या स्थानी विलीन होतात. त्यामुळे भगवंत जे सांगतात ते संपूर्ण सत्य आहे, ते या अर्थाने.  याचं विषयावर चिंतन करतांना, एक प्रश्न नेहमी मनात यायचा की, नरकात आत्म्याला ज्या यातना दिल्या जातात असं आपण वाचतो, त्या आत्म्याला कश्या काय, स्पर्शू शकत असतील, किंवा त्रास देऊ शकत असतील. कारण श्रीमद् भ...

आत्मचिंतन भाग १

आत्मचिंतन भाग १ (नवीन मालिका)  खरतर मृत्यू आणि त्या पलिकडील जगत हा अनंत कल्पनांचा विषय आहे. ज्याची कल्पना मानवी मनाच्या उद्दाणा पलीकडे आहे. मानवाचा प्रवास हा सप्तलोकां तून स्वर्ग लोकाकडे होतो. पण कर्माच्या गतीनुसार तो, सप्त पाताळ या कडे सुद्धा होऊ शकतो.भुलोकीचं जीवन हा या अनंत प्रवासातील, मात्र एक टप्पा आहे. पण त्यातच अनेक जीव इतके गुरफटून गेलेले असतात की, त्यांना पुढच्या प्रवासासाठी, वेळ, विचार आणि कर्म, तीनही, असाध्य असतं.  मानवी देहातील जन्मात इंद्रिय, अवयव, बुद्धी, देह, वाचा जिव्हा इत्यादी कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय प्राप्त असतात. त्याचा उपयोग जास्तीतजास्त ग्रहण करून, जतन करत, कर्माचा आलेख पुढे पुढे न्यायचा असतो. हा कर्माचा आलेख जितका चढता असेल (अर्थात उच्च पातळीवर जाण्यासाठी) तितका त्या देहातील आत्मा, पुढच्या पायरीकडे जाण्याची शक्यता आणि शाश्वती अत्याधिक असते. मानवी जन्मात. दिलेली कर्म, ज्ञान इंद्रिये, बुद्धी, मन ही विस्तारित इंद्रिये, पुढील कोणत्याही स्थितीत वा अवस्थेत असतं नाहीत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा की, मानवी देहाच्या सहाय्याने, मानवी देहातील मन व त्याला जोडल...

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं.

मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं.  अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, द्वैतातून अद्वैताकडे, अज्ञाना कडून ज्ञानाकडे, तीमिराकडून प्रकाशाकडे जातानाचा प्रवास हा शिवाकडून पुन्हा शिवाकडे जाण्याचा प्रवास. हा प्रवास अनंत जन्मांचा असतो. म्हणूनच हा अनंताकडे जाणारा प्रवास आहे. शिवतत्व हे अगम्य आणि गूढ आहे. तो एक अग्निरुप ब्रम्हांड आहे.जीवाला तिथे जाण्यासाठी अनेक दिव्य पार करून जावं लागतं. यामधे आपले भोग व उपभोग संपवून किंवा त्यांचा मोह टाळून, पुढे जाणं अपेक्षित आहे.  यातील शून्यातून शिवाकडे जाण्यात,चुका, प्रमाद, अज्ञान वश अनेक चुकीची कर्म घडतात. हा प्रवास म्हणजे एक यज्ञ आहे आणि यज्ञ म्हटलं की आहुती अपेक्षित आहे. ही आहुती, मोह, लोभ, माया, अज्ञान, दुष्कर्म यांची असावी लागते. पण या सर्वातून निर्माण झालेले व होणारे भोग व उपभोग हे या अहुतीला अपूर्ण ठेवतात. कारण प्रत्येक क्षणी आहुती अपेक्षित असते. पण प्रत्येक क्षणी भोग आणि उपभोग सुद्धा येतच असतात.  या सर्वांना टाळून जाणं अशक्य आहे. या सर्वांना भोगून जाणं कष्टप्रद आणि ऊर्जा, शक्ती व वेळ यांचा अपव्यय करणारं आहे. पण द्वैत, अस्थिरता, अज्ञान...

भोग आणि ईश्वर ६३०

भोग आणि ईश्वर  ६३०   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना प्राप्त संदेश लहरी व संवेदना, त्यांच्या मार्फत, त्यांना मेंदूत नेमून दिलेल्या पेशी समुहा कडे पाठवण्याची जबाबदारी, त्या त्या ज्ञानेंद्रियांना देण्यात आलेली असते. त्यांना त्याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. असं कधी झाल्याचं वाचलय का की, कानांनी काही धोक्याचा इशारा ऐकल्यावर, त्यांनी तिथूनच तो इशारा डोळे, हात, पाय वा इतर कुठल्याही इन्द्रियाला परस्पर पाठवून, कार्याला जुंपलं आहे.  असं क्वचितही घडलेलं आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे त्यांना नेमून दिलेला मार्ग किंवा चॅनल न मोडण्याचे संस्कार त्यांना उपजतच, विधात्याने केलेले आहेत. हे देह निर्मितीच्या प्रक्रियेत, देह घडताना, केले जाणारे, विधात्याचे संस्कार आहेत. त्यांना अपवाद नाही. त्यांचा संदेश पाठवण्याचा मार्ग निश्चित आहे. त्यानुसार ते कार्य करणार. पुढील जबाबदारी ही, मेंदू या अवयवायचं कार्य आहे. सहसा सर्वसाधारण घटना, प्रसंग, कार्य, संदेश इत्यादीं मध्ये, शरीर शास्त्रानुसार मेंदूचा डावा भाग कार्य करतो. म्हणजे आ...

भोग आणि ईश्वर ६२९

भोग आणि ईश्वर ६२९   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    आतापर्यंतच्या दोन भागातील विस्तृत कथनावरून एक गोष्ट लक्षात येते की, बुद्धीच्या सवयी, या संस्काराशी निगडित असतात. बुद्धी ही मनाच्या अत्यंत निकट मानली जाते किंवा तशी ती असते. म्हणूनच मनाच्या लहरी व संवेदना यांचां जलद किंवा कधीकधी अती जलद प्रभाव, सर्वात प्रथम मेंदू अर्थात बुद्धी यावर होतो. कारण कोणत्याही लहरी, स्पंदनं यांचा त्वरित परिणाम स्त्राव अर्थात हार्मोन्स यावर होतो. त्याचप्रमाणे मनाला देहा कडून कार्य करवून घ्यायला बुद्धी या माध्यमाची आवश्यकता किंवा माध्यम म्हणून निकड असते.  त्यावर आधारित विचार किंवा अविचार हे,या हार्मोन्सच्या स्त्रवण्यामुके येतात, जे बुद्धी आणि मन दोन्हींना भारून टाकतात. म्हणजे बुद्धीच्या अविचार किंवा विचार करण्या मागे, मनाच्या लहरींचं प्रसारित होणं आणि बुद्धीचं त्या दिशेने जाणं, या परस्पर सबंधित घटना आहेत. पण या प्रकारे बुद्धीचं झेपावणं किंवा कार्यरत होणं, हे सवयीचा परिणाम आहे. कारण एखादी स्थिती किंवा परिस्थिती अथवा घटना घडते, त्यावेळी त्यावर आपली क्रिया किंवा प्रतिक्रिया ही, आपल्या ब...

भोग आणि ईश्वर ६२८

भोग आणि ईश्वर ६२८   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले    विवेकाचा विचार करण्याआधी, बुद्धी म्हणजे काय, यावर जरा विचार करूया. बुद्धी म्हणजे जड तत्वाचं अर्थात पृथ्वी तत्वाचं प्रतीक. मेंदूत असलेल्या पेशींमध्ये, विशिष्ट प्रकारची हार्मोन्स निर्माण करून, त्यातून उत्पन्न लहरी वा संदेश कोणत्याही गोष्टीचं पृथक्करण करण्याची देहात स्थित मेंदू या इंद्रियाची क्षमता. यामध्ये मनाच्या जाणिवा, संवेदना यांचा उपयोग सुद्धा केला जातो. पण तरीही बुद्धी ही कार्यरुपात आणि अस्तित्व स्वरूपात देहाचा भाग गणला जातो. विज्ञान, जीवशास्त्र, शरीर शास्त्र या सर्वांच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाने, सिद्ध झालेली आणि आज माहीत असलेली गोष्ट म्हणजे मेंदूवर जितक्या वळ्या, सुरकुत्या या जास्त, त्यानुसार बुध्दीची क्षमता जास्त असते. बुद्धी म्हणजे संकलन, आकलन, पृथक्करण करण्याची क्षणात. मेंदूची उजवी व डावी अशी विभागणी असून, दोन्ही भागात काही विशिष्ट पेशी समूह, विशिष्ट कार्य करण्या साठी बनवलेला किंवा घडवलेला असतो. त्यामुळे त्या त्या विशिष्ट पेशी समुहांवर, ज्ञानेंद्रियां कडून प्राप्त, त्या त्या विशिष्ट, दृश्य, ध्वनी, ...

भोग आणि ईश्वर ६२७

भोग आणि ईश्वर ६२७   ©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले   आज जवळजवळ तेरा महिन्यांच्या अंतरा नंतर, पुन्हा हा विषय सुरू करताना, कशी सुरुवात होईल, काय लिहिलं जाईल, असे अनेक विचार येत होते. पण दुसरा एक विचार या सर्वांना छेद देऊन पुढे आला. तो म्हणजे एवढे ६२६ भाग सलग ६२६ दिवस, ज्या सद्गुरूंनी लिहून घेतले. तेच माझे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, इथून पुढचे भाग, लिहून घेतील. कारण आधीचे ६२६ भाग त्यांनीच, कोणत्याही अभ्यासाशिवाय, माझ्याकडून लीलया लिहून घेतले. म्हणजे हे एक वर्षांपेक्षा जास्त काळ न लिहिण्याची आणि आता पुन्हा लिहिण्याची प्रेरणा तेच आहेत.  म्हणून नव्या दमाने, भाग ६२७ पासून पुन्हा लिहायला घेण्याची सद्बुद्धी,त्यांनीच दिली,हे जाणून आणि समजून लगेच बसलो. फक्त एक आहे विषय कुठे होता आणि पुन्हा कुठून सुरू करायचां, हा विचार करण्या पेक्षा, जे, जसं जमेल तसं आणि तिथून सुरू करुया. जे योग्य आणि सर्वांना गरजेचं आहे, तेच महाराज मांडून घेतील. त्यामुळे आता श्रीगणेश करूया आणि पुन्हा एकदा भोग आणि ईश्वर या विषयाला सुरुवात करुया. जय श्रीराम खरतर भोग आणि उपभोग या आपल्या जीवनातील दोन अश...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५ © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड त्यांनी त्यांच्या आयुष्यात, प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट न ठरवता करून दाखवली ती म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या धाकाने, दडपणाने, भयाने वा परिणामाने डगमगून न जाता, धैर्याने, पण तितक्याच शांतपणे, त्यास सामोरे कसे जावे. प्रारब्धाचे कोणतेही भोग हे शांतपणे आणि धैर्य राखून त्याचा स्वीकार करून , परंतु त्याने डगमगून न जाता, पुढे जात राहणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे.  श्रीशंकर : त्यांचा अजून एक व्यक्तिविशेष, जो आम्हाला आवडतो, तो म्हणजे आदर्श राजाचा वस्तुपाठच जणू त्यांनी जगाला घालून दिला. राजाने सतत म्हणजे अष्टौप्रहर फक्त जनांचा आणि त्यांच्याच आशा आकांक्षा यांचा विचार करावा.  एकदा राज्यपदी बसल्यावर, स्वतःच्या परिवाराकडे सुद्धा एक प्रजा म्हणूनच पाहावे, याच उत्तम उदाहरण प्रभूंनी स्वतःच्या आदर्शवत जीवनाने, पुढील कित्येक पिढ्याना दाखवून दिलं आहे. राजाने फक्त लोकोपयोगी कार्य आणि लोकांच्या भल्याचाच विचार सतत करणं, गरजेचं आहे. रामराज्य ही एक अशक्य वाटणारी कल्पना, त्यांनी प्रत्यक्ष...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४ © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले आज कैलासावर स्वये श्रीनारायण आपल्या दोन भिन्न प्रकृती रुपात आणि त्या रूपातील आपल्या अर्धांगीसह आले आहेत म्हणजे नक्कीच काही प्रयोजन वा कोणत्या तरी कार्याचे नियोजन करून अथवा करण्यास आले असावेत असा कयास करूनच श्रीमहादेवानी पृच्छा केली " आज कैलास पर्वती आपण मूळ स्वरूप त्यागून या रुपात प्रकट झालात. काही प्रयोजन आहे का ? " श्रीराम : आपल्या दर्शनाची वेडी आस आम्हाला आपल्या प्रत घेऊन आली. अनेक वर्षे झाली आपली फक्त समाधी अवस्थेत ध्यानयोगातच भेट होत आहे. म्हणून विचार आला की प्रत्यक्ष रुपात, आपले दर्शन घ्यावे. त्याच उद्देशाने आज उपस्थित झालो. येऊन पहातो तर काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण तेसुद्धा, देवी रुक्मिणीसह, समोर पहावयास मिळाले. दर्शन तर झालेच, पण काही सद्विचार ऐकण्याचे भाग्य आणि योग जुळून आला. श्रीकृष्ण : प्रभू आपण अगदी मनकवडे आहात, अर्थात आहातच म्हणा. भक्तांच्या मनातील भाव भक्तांनी न वदता, आपण जाणता. यात गुंजभरदेखील मिथ्या वचन नाही. काय कैलासनाथ.  श्रीशंकर : अर्थात आम्ही पूर्ण सहमत आहोत. प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात भक्तवत्स...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३  © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : परंतु आपल्यामध्ये काही साम्य स्थळं सुद्धा आहेत. श्रीराम : अर्थात  श्रीकृष्ण : आपण दोघांनीही एका स्त्री खल प्रवृत्तीला संपवलय. जस आपण त्राटीका आणि आम्ही पुतना, आम्ही कर्णाला तो युद्ध थांबवून रथातून खाली उतरला असताना वधावयास लावले आणि आपण मित्रकर्तव्या स्तव वालीवध केलात. दोन्हीमध्ये उद्देश एकच खल प्रवृत्ती नष्ट करणे आणि जर ती त्या व्यक्तींबरोबर संपणार असेल व त्यासाठी कोणत्या ही मार्गाचा वापर गरजेचा असेल तर, तो न्याय नीतिसंमत आहे. उद्देश मात्र खल नव्हे तर खलप्रवृत्ती नष्ट होण गरजेच आहे.  श्रीराम : आम्ही असं मानतो की, जे घडावं हे नियती विहित आहे, ते फक्त घडवण्याचं कार्य करण्याचं स्वातंत्र्य मानवी देहात असतं. हे अर्थात आमचं जीवना बद्दलच तत्वज्ञान आणि श्रद्धा.  श्रीकृष्ण : अर्थातच म्हणूनच मानवी जन्मात मुख्य कर्म हे सज्जन रक्षण आणि खल निर्दालन हेच असावं, विशेषतः तुम्ही सत्ताधारी असताना. पण सर्वसामान्य जीवास मात्र निज कर्तव्य आणि या देही आल्याचं सार्थ कर्म कृतीत आणून मिळालेला जन्म संचित कमी करून, ...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २ (काल्पनिक) © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : आपण स्वयं हे जाणता की, त्यातील बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कला आपणाकडून प्रारब्धवश प्राप्त झाल्या.  श्रीराम : आपल्या वाग्चातुर्याबद्दल आपण ख्यात होतात, हे जाणून आहोत, पण आज प्रत्यय सुद्धा आला. तसं पाहिलं तर, आपल्याला आपले चातुर्य, हर एक क्षेत्रात दाखवण्याची संधी प्राप्त झाली, काळाच्या विशिष्ट परीघ रेषेवर आपण जन्माला आलात. त्यावरही कडी म्हणजे आपण त्या संधीचे सोनं केलंत.  श्रीकृष्ण : सत्य आहे, कदाचित हा त्या काळाचा महिमा असेल. आपला काळ हा सत्ययुग संपून, त्रेतायुग चालू झाल्याचा काळ. जडदेही मानवाच्या वासनारूपाचे, पूर्ण प्रकटीकरण झालेच नव्हते. त्यामुळेच आपल्याला अति दुष्ट दानव पाहण्यास मिळाले. परंतु मानवी रुपात तश्या अभिव्यक्ती अपवादानेच आढळून आल्या असतील.  आमच्या युगात सर्व दानवी शक्ती, या मानवी रुपात प्रकट होऊन आल्या होत्या. त्यादेखील एकाच घरात. जस की सदाचारी वसुदेव आणि त्यांचा मेहुणा दुराचारी कंस. बर कंसाच्या घरात पिता राजा उग्रसेन सुशील आणि सद वर्तनी. पण पुत्र कंस. सख्खे चुलत बंधू कौरव व पा...

जन्म आणि नामस्मरण लेख २

जन्म आणि नामस्मरण लेख २ ©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले.  १. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून : .  मनाच्या गाभ्यात असलेले भय, भूक, निद्रा व मैथुन हे चार मुख्य घटक, ईश्वराने माणसाला सुद्धा दिले, याचं मुख्य कारण, प्रकृती आणि पुरुष यांचा समन्वय साधला जावा आणि मानवी वंश, प्राणीमात्रांप्रमाणेच, अविरत, कोणत्याही अडसराशिवाय वा हस्तक्षेपाशिवाय पुढे जात रहावा, या एकमेव उद्देशाने, हे चार मूळ प्रवृत्ती पर गुण, मनात स्थापित केले. अर्थात मनात स्थापित करताना, विचार, विवेक, बुद्धी यांसह जिज्ञासा, ज्ञानप्राप्तीची लालसा, शिकत पुढे जाण्याची वृत्ती, हेदेखील, त्याचं ईश्वरी अधिष्ठानाने, प्रदान केले.  मुळात एक लक्षात ठेवा किंवा कोरून ठेवा. माणसाला या छोट्याश्या देहात प्रकृती पुरुष यांसह जे जे प्रदान केलं आहे, ते ते सर्व युगाच्या सुरुवाती पासून, ते कल्पांतापर्यंत पुरेसं दिलेलं आहे. हे नक्की. म्हणजेच नराचा नारायण होण्या साठी आवश्यक सर्वच, माणसाच्या ठायी आहेच. पण त्या नराचा असुर करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा बहाल करताना, ईश्वराने फक्त एक कर्मफल नियम त्यात घालून दिला. म्हणजेच कल...

जन्म आणि नामस्मरण लेख १

जन्म आणि नामस्मरण लेख १  ©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले मानवी देहात जन्म घेतल्यावर, नामस्मरण का करायचं या मुख्य गाभ्याला धरून लिहिण्यात येणारी ही मालिका आहे. याची मुख्य पाच कारणे आहेत. प्रत्येक कारण विस्ताराने बघून नंतर पुढच्या कारणाकडे आपण वळणार आहोत.  १. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून : प्रत्येक माणसात, नव्हे प्रत्येक प्राण्यात, अनेक प्रकारचे दोष असतात. वर्तणुकीचे दोष, स्वभावाचे दोष, चारित्र्याचे दोष, समूहात वावरताना अडसर निर्माण करणारे दोष, मनातील संचितातील दोष, देहबाह्य संस्कारांचे दोष, बाल्यावस्थेत जोपासले गेलेले दोष, आयुष्यात प्रत्येक क्षण घडत जाणाऱ्या घटनांचे दोष इत्यादी अनेक प्रकारचे दोष प्रत्येक माणसात असतात.  दोषांची निश्चित व्याख्या करणं अवघड आहे. पण प्रत्यक्ष दोष म्हणजे आपण वागताना ज्या चुका होतात आणि ज्या चुकांनी स्वतःला आणि दुसऱ्याला हानी पोचते वा पोचू शकते, त्याला दोष म्हणता येईल. किंवा वागण्या तील त्रुटी, कमतरता, अती पणा याला दोष म्हणता येईल.  यात स्वतःला आणि दुसऱ्याला हे मुद्दाम लिहिलं आहे. कारण दुसऱ्याला आपल्या वागणुकीतून अवग...

श्रीराम व श्रीकृष्ण संवाद भाग १ (काल्पनिक)

श्रीराम व श्रीकृष्ण संवाद भाग  १ (काल्पनिक) © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले हा लेख आणि यातील संवाद पूर्णतया काल्पनिक आहे. पुराणात वा इतिहासात याचा शोध घेऊ नये.  यामध्ये कल्पना अशी केली आहे की श्रीराम-जानकीदेवी हे श्रीकृष्ण-रुक्मिणीदेवी हे, कर्मधर्म संयोगाने कैलासावर श्रीमहादेव-देवी पार्वती यांना,भेटण्यास जात आहेत. वास्तविक रुपात, त्यांनी मानवी देह त्याग केला असला तरीही, चैतन्य रुपात ते तत्वरूप चिरंतन आहेत. म्हणूनच त्याच रुपात ते सर्वदूर वावर करू शकतात. याच आधाराने हा लेख लिहिला आहे.  परमात्मा श्रीकृष्ण व माता रुक्मिणी हे माता जानकी आणि प्रभू श्रीराम याना प्रणाम करतात.  श्रीकृष्ण व  रुक्मिणी : प्रणाम तुम्हा उभयतांना.  श्रीराम व जानकी : प्रणाम आमचा सुद्धा.  श्रीकृष्ण : माझ्या अनुमानानुसार आपली प्रथम भेट आहे.  श्रीराम : हो प्रथम भेट आहे.  श्रीकृष्ण : महादेवाच्या भेटीस्तव आला आहात अस दिसतंय.  श्रीराम : हो आपल्या प्रमाणेच.  श्रीकृष्ण: दीर्घकाळापासून काही प्रश्न होते मनात, आपली अनुमती असेल तर वदावे असे म्हणतो. श्रीराम : अवश्य. किंबहुन...

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ८३

राम अनुज भरत भाग ८३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले. " राजकुमार, आपली सूचना व आदेश अत्यंत उपयुक्त आणि गंभीर आहेत. आपल्या, सुचनेतील पाहिला भाग, अमलात आला आहे आणि गुप्तचर संदेशानुसार, त्यांच्या प्रतिनिधीने, आपल्या राज्यात, एक दोन दिवस अधिक मुक्काम करण्याचा, प्रयत्न केला. पण त्यांना योग्य ती समज देऊन, राज्यातून जाण्यास सांगण्यात आलं.  त्यानुसार त्यांनी राज्याबाहेर प्रस्थान केलं. तरीही त्यांच्या पुढील हालचालींवर, आपण गुप्तचर दृष्टी ठेवून आहोत. आपल्या दुसऱ्या उपयुक्त आदेशानुसार,आपल्या राज्यात, त्यांचे कोणी गुप्तचर आले आहेत का, याचा, त्वरित शोध घेऊन, त्याबद्दल अधिक माहिती, अतिजलद आपल्या समोर सादर केली जाईल.." राजपुत्र शत्रुघ्न, आर्य सुमंत यांच्या या महत्वपूर्ण, साद्यंत आणि जबाबदारीने दिलेल्या उत्तराने, अती प्रसन्न झाला. आर्य सुमंत यांना प्रस्थान करण्याची अनुमती देऊन, राजपुत्र, महर्षी वसिष्ठ यांच्या कडे पहात म्हणाला.  महर्षी, या राज्यातील, मंदिर व मंदिरातील व्यवस्थेची वार्ता काय आहे. त्याचप्रमाणे, या रा...

राम अनुज भरत भाग ७३

राम अनुज भरत भाग ७३ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले   माता कौसल्या गहिवरली आणि तिच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. भरताने मातेला स्नेहपूर्वक आलिंगन देऊन आपल्या हृदयाशी धरले. मातेचा गहिवर बऱ्याच प्रमाणात कमी झाला. दोन सेविकांनी तिला धरून बाजूला नेले आणि रथात बसवले. तदनंतर भरत माता सुमित्रा हिच्या समीप गेला. ह्रदय पूर्वक चरण स्पर्श करून, भरताने मातेला नमस्कार केला. मातेने त्याला प्रेमपूर्वक आलिंगन दिले आणि हृदयाशी धरले.  मातेला भरताची चिंता वाटत होती. कारण तिचा एक पुत्र रामासह वनवासात गेला होता तरीही, दुसरा पुत्र शत्रुघ्न, हा तीनही मातांच्या समीप चौदा वर्षे असणारच होता. पण भरत असा दुर्दैवी जीव होता,जो त्याच्याच मातेच्या कर्मामुळे, आपला प्राणसखा आणि ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या पासून चौदा वर्षे दुरावला होता. राम लक्ष्मण हे सावली समान होते. परंतु भारत हा रामाच्या हृदयात होता. नव्हे तर तो रामाचा प्रथम भक्त होता.  या कारणाने तो आत्मिक दृष्टीने रामाच्या अत्यंत समीप होता. लक्ष्मण हा रामाची सा...

राम अनुज भरत भाग ७४

राम अनुज भरत भाग ७४ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले    भरताने, मांडवीकडे पाहिलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. मांडवीच्या नेत्रात अनेक प्रश्न होते. कदाचित मूळ संस्कार जनक राजाच्या घराण्याचे असल्यामुळे, अव्यक्त भाव जास्त सहज व्यक्त करण्याचं साधन हे लोचन असावेत. कारण तो काळसुद्धा अव्यक्तातून बरेच भाव व्यक्त करण्याचा होता. अल्प, स्वल्प कथनातून, गुह्य गोष्टी, गहन अर्थ सांगून, समोरच्या व्यक्तीला त्याचा अर्थ शोधण्यासाठी उद्युक्त करून, भावार्थ जाणून घ्यायला लावायचा, तो काळ होता.  त्यामुळे मांडवीच्यां मनात काय चाललं असेल, हे अव्यक्त असूनही जाणून, भरत म्हणाला "नियतीने, ज्या कार्यासाठी आपला जन्म घडवून आणला आहे, त्या कार्याची सुरुवात आता झाली आहे. या कार्यात प्रत्येकाला काही दायित्व दिलेलेच आहे.प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्यासाठी जो कार्यभाग घडवला आहे, तो कदाचित अधिक असाधारण असणार. अन्यथा ज्येष्ठ भ्राता विनाकारण देवी सीतेला सोबत घेऊन गेलेच नसते. पण भ्राता लक्ष्मण आणि ऊर्मिला यांची स्थिती अधिक खडतर आहे,...

राम अनुज भरत भाग ७८

राम अनुज भरत भाग ७८ (आजचा भाग लिहून अक्षरशः स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त झाली. वाचकांनी सुद्धा त्याचं भावाचा लाभ घ्यावा) श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले विचारांच्या व गंगेच्या प्रवाहात हरवलेला भरत, जलात विहार करत, पलीकडील किनारी कधी पोचला, त्यालाही कळलं नाही. त्या विस्तीर्ण जलाशयाचा वेध एकवार त्याच्या नजरेने घेतला आणि तो विचार करता झाला की, हा जलप्रवाह, अखंड, अविरत, कोणत्याही आपत्तीत, परिस्थितीत विहरत असतो. याला कोणतीही बाधा आवरू शकत नाही किंवा बांधू शकत नाही. नित्य हा खळाळत वहात असतो. म्हणूनच यातील जल स्वच्छ, सुंदर, स्फटिकासमान आहे. म्हणजेच याच्या स्वच्छ नितळ जलाचं रहस्य, याच्या नित्य वाहण्यात आहे. मनाचं असच असायला पाहिजे. जर ते मन घटनेच्या, प्रसंगांच्या, क्षणांच्या बांधात अडकलं तर, ते गढूळ पाण्यासमान होईल आणि मग अश्या मनात येणारे विचार, हे नक्कीच पथदर्शी, पारदर्शक नसतील आणि मन, मस्तिष्क यांना देखील अस्वच्छ करतील. अश्यावेळी त्या मनात येणारे,सर्व विचार हे मन,देह आत्मा यांना अचिंतनीय विचारात गुंतवून ठेवतील....

राम अनुज भरत भाग ७७

राम अनुज भरत भाग ७७ श्रीराम जयराम जय जयराम!!  श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!  ©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले प्रदीर्घ काळानंतर इतकी निरव शांतता व जलप्रवाहात विहार करण्याचा आनंद, भरत घेत होता. या शांततेत विचारांचं मंथन सुद्धा आता हळूहळू बाहेरच्या स्तरातून, मनाच्या आतल्या पटलाकडे जात होतं. मनातील वर्तमान आंदोलनं आता स्थिरावण्याची स्थिती येत होती. भाव आता अधिक खोलीतून जाऊन, पटलावर येत होते. किंबहुना, काहीं काळापूर्वी आपण, याचं विचारांच्या प्रवाहात, अविचारीपणाने वागलो, वावरलो का, असा विचार वारंवार मनाच्या वरच्या पातळीवर येत होता. पण अत्यंत विचारी, बुद्धीमान, ओजस्वी आणि वेद शास्त्र यांचा प्रकांड पंडित असलेला भरत, असा विचारांच्या वादळातून, वहावत जाऊन, अविचारी कृती करण्याचा निर्णय घेणारा नव्हता आणि नाही, हे त्याच्या मनाला जाणवत होतं. परंतु मग आता पर्यंत, काळाचा काही भाग, हा भरत जे काही करून गेला त्याचा भावालेख, मनाच्या पटलावर, असा कसा चितारला गेला असेल, हा विचार भरताच्या मनात येत होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी असलेला भरत, जवळपास, आपले ज्येष्ठ भ्राता श्रीराम, यांची अजोड प्...