Skip to main content

आत्मचिंतन भाग ३

आत्मचिंतन भाग ३
 
या जगात आणि जगताबाहेरील ब्रम्हांडात किंवा ज्ञात वा अज्ञात जगतात, वैकुंठात कुठेही, जे काही आहे, त्यामागे कार्यकारण भाव तर आहेच. पण प्रत्येक अणू मागे, काही वैज्ञानिक, शास्त्रीय कारण आणि पद्धती, व्यवस्था किंवा इंग्रजीत ज्याला system म्हणतात,ती या सर्वांचा आधार आहे.म्हणजे व्यवस्थेने चालत नाही,अशी गोष्ट अस्तित्वात नाही. इथेही नाही किंवा कोणत्याही लोकात नाही. याचं आधारावर नक्कीच हे म्हणता येईल की, मृत्यूपश्चात सुद्धा हिशोबाची काही पद्धत अस्तित्वात असणार.

पण आता जर आपल्या कर्माच्या हिशोबाचा विचार केला तर, या जगतात अस्तित्वात असलेली आणि मृत्यूपश्चात पुढे जाणारी गोष्ट म्हणजे आत्मा. आपल्या हातून काया, वाचा मन व बुद्धी या चारही माध्यमाने घडलेली, घडणारी सर्व कर्म, आत्म्याच्या द्वारे एकतर, हिशोबासाठी पुढे पाठवली जात असतील, अगदी घडते वेळी. म्हणजे आत्म्यामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म रुपात, त्यांना साठवण्याची कुठलीतरी व्यवस्था असली पाहिजे. 

किंवा आत्म्याला अश्या कुठल्यातरी व्यवस्थेने वा व्यवस्थेला जोडलेलं असणार, जी व्यवस्था या सर्वांचा हिशोब ठेवते. त्या व्यवस्थेपर्यंत पोचणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे आत्म्याचा कोष. म्हणजे अशी व्यवस्था आत्म्याच्या आत तयार करण्यात आलेली असणार, जी आपल्या प्रत्येक जागृत, अर्धजागृत वा सुप्त अवस्थेतील कर्मांची इत्थंबुत माहिती अर्थात data ठेवून, तो एकतर ठराविक वेळेत किंवा अंतिम समयानंतर, योग्य त्या व्यवस्थेकडे सुपूर्द करत असेल.जेणेकरून,त्या व्यवस्थेला त्या आत्म्याचा हिशोब योग्य वेळेत पूर्ण करता येऊन, त्या आत्म्याला, विनाविलंब पुढील कार्यार्थ धाडता येत असणार. 

काही गोष्टी तर्काने तर काही गोष्टी ज्ञानाने जोडून, आपण या वाटचालीत पुढे चिंतन करत जाणार आहोत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हे सर्व ज्ञान गुह्य आहेच. पण त्याहीपेक्षा, ते जाणण्यासाठी, प्रत्यक्ष मृत्यू या व्यवस्थेला सामोरं जाणं, हा एकच उपाय आहे. पण ते झाल्यावर, पुन्हा परत माघारी येण्याचा प्रश्न राहणार नाही.म्हणजेच जो एकदा देह सोडून गेला तो, पुन्हा कधीही माघारी येत नाही, येऊ शकत नाही. 

काही अपवाद असतील, तर त्याच्या मागे तसच काही तर्कसंगत कारण असणार, जे या त्रिमिती जगतात आपल्याला ज्ञात होणार नाही आणि जाणता येणार नाही. याचाच अर्थ या त्रिमिती जगताला सुद्धा, काही सीमा किंवा बंधनं किंवा लांबी रुंदी व उंची यांची परिमाणं असली पाहिजे. म्हणजे ही त्रिमितीची भूमी किंवा वातावरण, हे आपल्यासाठी, विधात्याकडे सहजी जाता न येण्याचं किंवा बाहेरील विश्व न जाणण्याचं एक महत्वाचं कारण आहे. 

कारण या त्रिमिती जगात आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक व आत्मिक मर्यादा आहेत, ज्या आपल्याला पाळाव्या लागतात. म्हणून जाणण्यावर किंवा ज्ञानावर सुद्धा देहाच्या बुद्धीच्या, त्रिमितीच्या मर्यादा येतातच. त्या मर्यादा पालन करत करतच आपल्याला कर्मरत राहायचं आहे. या मर्यादा पालनाच्या अंकुशामुळे आपल्या कर्मावर सुद्धा बंधनं आणि मर्यादा येतात. त्या सर्व मर्यादा पालन करत आपण जे ज्ञान ग्रहण करतो आणि जो कर्मांचा आलेख तयार करतो, तोच घेऊन आत्मा पुढे जातो. 

विषय असा आहे की, आता या सर्व आलेखाला कशा प्रकारे किंवा कश्या माध्यमात लीपिबद्ध केलं जातं. मुख्यतः ते लहरी किंवा कंपनं या माध्यमातून मांडलं, लिहिलं आणि साठवलं जातं. कारण ब्रम्हांड भेदून पुढे जाऊ शकण्याची शक्ती लहरी व संदेश यातच आहे. म्हणजेच आपल्या कर्मांना लहरी व संदेश माध्यमात परिवर्तित करून, ते विधाता रूप व्यवस्थेतील योग्य स्थानी अगदी ऑनलाईन पद्धतीने पाठवले जात असावेत, हे निःसंशय. 

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
२६/१०/२०२३

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...