Skip to main content

आत्मचिंतन भाग ७

आत्मचिंतन भाग ७
  
सहाव्या लेखात म्हटलं त्याप्रमाणे, देह गेल्यावर, आत्म तत्त्व हे आपला हिशोब मांडून घेण्यासाठी,त्या व्यवस्थेपुढे जाते.किंबहुना तिला बळजबरीने नेलं जातं.याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहात मनाची झालेली गुंतवणूक आणि ही गुंतवणूक आत्म्याला,अनेक कारणां साठी,मागे खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, काही राहिलेले हिशोब, काही करावयाच्या गोष्टी, काही करत असलेल्या, पण अर्धवट राहिलेल्या गोष्टी. 

याव्यतिरिक्त, मोहाचे, लोभाचे, वासनेचे, कुसंस्करांचे, व्यक्तिगत हेवेदावे यांचे, अहंकार,अहंगंड, दुराभिमान, दंभ, दुर्भावना, दुराग्रह, काही मनात योजलेल्या, तिरस्कार, राग, क्रोध यांच्या आठवणी, मान अपमान, दुःख, सुख यांच्या आठवणी, ठरवलेल्या पण साध्य न होऊ शकलेल्या योजनांचे आलेख इत्यादी बरंच काही, मन साठवून ठेवतं आणि ज्ञात वा अज्ञात कोणत्याही अवस्थेत देह त्याग घडल्यानंतर, मन देहाला आणि आत्मा मनाला घट्ट चिकटून राहतात आणि देह न सोडण्याच्या वासना व भावना, अंतकाळी तीव्र असतात. 

म्हणजे आधीच, देह न सोडण्याची तीव्र भावना, त्यात आपल्या आत्म्याला म्हणजेच खरतर आपल्याला, घडलेला हिशोब, ईश्वरी व्यवस्थेकडे जाऊन, ऐकायचा असतो. बरं तो हिशोब चोख असतो, कारण तो आपल्या कर्माशी व कर्माच्या भावाशी जोडून नोंदलेला असतो. त्यानुसार न्याय निवाडा होणार असतो. हे सर्व मृत्यू पश्चात घडणार असतं. पण ते प्रत्यक्ष कोणी पाहिलंय, या मदात, मस्तीत देह अनेक हिन, दीन, अहितकारक, अनिष्ट गोष्टी करतो. 

त्या सर्वांचा मिळून data किंवा माहिती आपल्या संचीतात जमा होते. संचित म्हणजे काय, तर आपण आजपर्यंत केलेल्या प्रत्येक जन्मातील कर्माची पूंजी, ज्यातून, प्रत्येक जन्मातील, भोग आणि उपभोग रूप देणी व वसुली वजा करून, पुढील जन्मात जाताना, आत्म्याच्या हातात दिलेला त्याचा स्वतःचा लेखाजोखा. अर्थात हिशोबाचा कागद. तो कसा कुठे साठवलेला असतो, यावर अनेक तर्क जाहेत. 

 पण त्याची मांडणी कुठे कशीही केलेली असो, प्रत्येक मोक्याच्या क्षणी, त्या त्या विशिष्ट कर्म फलाला आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे, त्याचं फलित आपल्या पुढे नेमकं येऊन उभं राहतं. त्याला कशी काय योग्यवेळी जाग येते, जे अन्यथा, निद्रिस्त असतं. काय निसर्गाची, विधात्याची व्यवस्था आहे, ज्यामुळे,अचूकपणे गोष्टी घडून येतात. ही कर्मफल शृंखलेने बद्ध व्यवस्था आपल्या जागी, अचूक कार्यरत असते. विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण ईश्वराची ही व्यवस्था वेळेच्या बाबतीत एकदम fraction of second अचूक असते. 

बरं विधाता सुद्धा यात काही ढवळाढवळ करू शकत नाही आणि करत सुद्धा नाही. म्हणूनच श्रीराम जन्माची आणि पत्नी वियोगाची बीजं, सत्ययुगात, ऋषी कश्यप यांच्या शापातून घडवून आणतो किंवा घडतात. म्हणजे किती detailed future planning आहे. अर्थात योजनाबद्ध तपशीलवार भविष्याची आखणी. वालीवधात कृष्ण जन्म समाप्ती ची योजना. 

म्हणजेच विधाता सुद्धा स्वतःला या व्यवस्थेतून वागल नाही, जर त्याला, या भुलोकी यायचं असेल तर. म्हणजेच यातून हे नक्की की, भुलोकात, काही नियम, निती, तंत्र, गणितं,समीकरणं आहेत,जी प्रत्येकाला पाळावी लागतात. त्यांना टाळून पुढे जाता येणार नाही. कर्म सिद्धांत हा त्यातील महत्वाचा नियम वा सिद्धांत. 

यातून निर्माण झालेला दुसरा एक सिद्धांत, म्हणजे जे या कर्म, या लोकात घडलं आहे, त्याचं फलित, इथेच येऊन भोगायचं आहे. कारण हा नियम इथला आहे आणि इथेच लागू आहे. तिसरा नियम म्हणजे केलेलं कर्म कधीही रितं किंवा अपयशी जात नाही. म्हणजेच एकदा हातून घडलेलं कर्म फिरून,योग्य वेळी आपल्याकडेच येणार. त्याची वेळ आपणच आपल्या कर्माच्या वेळी निश्चित केलेली आहे. 

विषय खरतर मोठा आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. त्यावर पुढील भागात चर्चा करूया. 

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
३१/१०/२०२३

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...