Skip to main content

भोग आणि ईश्वर ६३०

भोग आणि ईश्वर  ६३०
 
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
  
आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना प्राप्त संदेश लहरी व संवेदना, त्यांच्या मार्फत, त्यांना मेंदूत नेमून दिलेल्या पेशी समुहा कडे पाठवण्याची जबाबदारी, त्या त्या ज्ञानेंद्रियांना देण्यात आलेली असते. त्यांना त्याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. असं कधी झाल्याचं वाचलय का की, कानांनी काही धोक्याचा इशारा ऐकल्यावर, त्यांनी तिथूनच तो इशारा डोळे, हात, पाय वा इतर कुठल्याही इन्द्रियाला परस्पर पाठवून, कार्याला जुंपलं आहे. 

असं क्वचितही घडलेलं आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे त्यांना नेमून दिलेला मार्ग किंवा चॅनल न मोडण्याचे संस्कार त्यांना उपजतच, विधात्याने केलेले आहेत. हे देह निर्मितीच्या प्रक्रियेत, देह घडताना, केले जाणारे, विधात्याचे संस्कार आहेत. त्यांना अपवाद नाही. त्यांचा संदेश पाठवण्याचा मार्ग निश्चित आहे. त्यानुसार ते कार्य करणार. पुढील जबाबदारी ही, मेंदू या अवयवायचं कार्य आहे.

सहसा सर्वसाधारण घटना, प्रसंग, कार्य, संदेश इत्यादीं मध्ये, शरीर शास्त्रानुसार मेंदूचा डावा भाग कार्य करतो. म्हणजे आलेले संदेश पडताळून,त्यांचं पृथक्करण करून, त्यानुसार योग्य त्या इंद्रिय व अवयव यांना त्यात्या क्रियेची किंवा प्रतिक्रियेची आज्ञा व संदेश देणं.ज्यासाठी मज्जा संस्था व चेतापेशी वेगवेगळ्या नसांच्या माध्यमातून कार्य करतात. यात गुंता असा आहे की, मनाचं कार्य कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं, याचा  थांग आपल्याला लावता येणं कठीण आहे. 

यात एक द्विधा स्थिती अशी आहे की, मेंदू शरीराचा एक महत्वाचा भाग व घटक असल्यामुळे, तो आपलं कार्य आपलं ज्ञान, अनुभव, आकलन व पृथक्करण यावर आधारित करत असतो. ज्ञान व अनुभव हे खूप महत्वाचे घटक, यात कार्य करतात. म्हणूनच वयानुसार एखाद्या गोष्टीचं आकलन व त्याचं पृथक्करण करून, घेतलेला निर्णय, वेगवेगळा असू शकतो. म्हणजे बरेचदा त्याची अचूकता किंवा योग्यता, ही अनुभव व ज्ञान यानुसार वाढत जाते. या मधे सर्वसाधारण व सामान्य गोष्टीत किंवा प्रसंगात, संस्कार हे अनुभवाच्या स्वरूपात कार्य जास्त महत्वाचा सहभाग घेतात. 

किंवा त्यांच्या आधारे माणूस, अनेकदा सामान्य बाबतीतले निर्णय घेतो आणि कृती करतो. पण विशेष प्रसंगात, संदेशात व घटनेत सहसा ज्ञान व अनुभव दोन्हीहीअनेकदा जास्त गरजेचे व उपयोगी असतात. आता या सर्व प्रक्रियेत, माणूस अनेकदा चुकीचे किंवा बऱ्याच प्रसंगात अचूक निर्णय घेतो. हा मुद्दा विशेष कळीचा आहे. कारण बाकी सर्व बाबतीत, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास जीवशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी शाखांनी केलेला आहे. त्यातील गुंते वा प्रक्रिया अभ्यासल्या आहेत आणि काही ठोकताळे मांडलेले आहेत. 

त्यामुळे त्यांचा आपण विशेष अभ्यास करण्याची गरज नाही. आपण वर दिलेल्या तिसऱ्या प्रकारच्या निर्णय, कृती इत्यादींचा अभ्यास पुढील भागात करूया. कित्येक प्रसंगात काही काही जणांचा घटना घडत असताना किंवा एखाद्या घटनेची तशी काही चाहूल नसताना सुद्धा, भविष्याची किंवा येणारं संकट अथवा नकारात्मक प्रसंग यांचा अचूक किंवा बराचसा योग्य अंदाज बांधून काही योजना किंवा काही सावधता बाळगून मनाची तयारी करतात. 

आता अश्या गोष्टींमागे काय विज्ञान किंवा तर्क असू शकतो, याचा विचार करण्याचा प्रयत्न करूया, पण पुढील भागात. तोपर्यंत गेल्या तीन भागातील मुद्द्यांचा, विश्लेषणाचा आढावा घ्या आणि अर्थात नाम सोडू नका, ते नित्य घेतच रहा. 

भोग आणि ईश्वर पुस्तकं ३ व ४ यांच्यावर काम सुरू आहे आणि लवकरच, त्यांच्या प्रकाशना बद्दल सूचित करण्यात येईल. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता. 

त्याचप्रमाणे भाग १,२ व ३ हे कींडल अमेझॉन वर ईबुक म्हणून उपलब्ध करण्यात आलं आहे. ज्यांना ते शक्य आहे, त्यांना तशी लिंक पाठवण्यात येईल. ते ईबुक घेऊन वाचू शकतात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/१०/२०२३
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...