Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२१

भोग आणि ईश्वर  ५२१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

अर्पण आणि शरण या दोन शब्दातील रण आणि पण समजल्या वर आता स्मरण याबद्दल आपण जरा विचार करूया. मुळात मनाला स्मरण कशाचं होतं, तर मनाला त्रास देणाऱ्या आणि मनाला आकर्षित करून, आसक्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींचं. स्मरण म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, क्षण, आठवण  इत्यादी आवडणं आणि त्यामुळे ते लक्षात राहणं. म्हणजेच जे गमतं, रुचतं ते हवं असतं आणि त्यासाठी ते लक्षात राहतं. 

किंबहुना मनच अश्या गोष्टी वा क्षण वा व्यक्ती आठवून, ते क्षण वा हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतं. किंबहुना मनाला भुरळ घालणाऱ्या अनेक गोष्टींचे मोह, मनाला खुणावतात किंवा जवळ बोलवतात. ते क्षण त्या व्यक्ती, त्या आठवणी इत्यादी सतत हव्याश्या वाटतात. ज्या गोष्टी हव्याश्या वाटतात, त्याबद्दल विचार करण्यात मन नेहमी मग्न असतं. 

म्हणजे अश्या गोष्टी मन कधीच विसरू इच्छित नाही. पण याऊलट मनाला त्रास देणाऱ्या, दुःखं, भोग इत्यादींचा काळ हे सर्व मन कधीच आठवू इच्छित नाही.  आपल्याच आयुष्यातील असे नकारात्मक क्षण वा आठवणी कोणीच पुन्हा मनःपटलावर येऊ देऊ इच्छित नाही. म्हणजेच स्मरणात त्याच गोष्टी राहतात, ज्यातून काही सकारात्मक मिळवता येतं किंवा मिळू शकतं. 

प्रत्येकाचा स्वभाव, वृत्ती इत्यादी मनाच्या जडणघडणीवर अवलंबून असतं. पण अश्या सर्वसामान्यपणे बहुतेक जणांना, आपल्या उत्तम सवयी, आठवणी, स्वभावातील जमेच्या बाजू सतत लोकांसमोर याव्यात  आणि त्यातून आपल्याबद्दल लोकांनी चार चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, ही सद् इच्छा असतेच असते. म्हणजेच स्मरण या शब्दात सहसा जगासमोर येणाऱ्या वा आणल्या गेलेल्या गोष्टीचाच समावेश होतो. 

पण मानवी मनात, सुप्तमन किंवा अर्धजागृत मन आहे, ज्यामध्ये वास्तविकपणे खऱ्या गोष्टी दडलेल्या असतात. ज्या स्वप्नात वा झोपेत मनःपटलाकार येऊन, देह निद्रिस्त असताना स्वप्नरूपात चलचित्रासम आपलं अस्तित्व दाखवून जातात. या स्मरणाला अनियंत्रित स्मरण म्हणता येईल. जे म्हटलं तर माणसाच्या नियंत्रणातील आहे आणि म्हटलं तर नियंत्रणाबाहेर आहे.  

ज्या गोष्टी वा घटना वा व्यक्ती आपल्याला आपल्या प्रयत्ना शिवाय वा कष्टाशिवाय भेटतात वा अनुभवास येतात, त्या घटना व व्यक्ती नियंत्रणाबाहेर असतात. पण ज्या घटना वा व्यक्ती आपल्या कर्माने वा प्रयत्नाने भेटतात वा अनुभवास येतात, त्या नियंत्रणातील आहेत. पण कोणत्याही परिस्थितीत सुप्तमनातील स्मरणाला सुद्धा आपल्या स्मरणाच्या व्याख्येत धरावं लागेल. 

म्हणजेच अश्या अनेक गोष्टी घटना व्यक्ती, हे सर्व आपल्या स्मरणात कळत वा नकळतपणे असतात वा येतात. स्मरणाबद्दल अजूनही चिंतन उद्याच्या भागात करूया, तोपर्यंत नामाचं नित्य स्मरण करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...