Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३६

भोग आणि ईश्वर  ५३६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
कलियुगाचं एक वैशिष्ट्य, जे सांगितलं जातं की, या युगात देवांची शक्ती क्षीण असेल. या मागचं महत्वाचं कारण आपण जाणून घेऊ. मुळात आपण जी पूजा, अर्चना, साधना,  होम हवन याग, उपवास, उपासना, भक्ती, स्मरण, धर्मकार्य इत्यादी करतो, त्यातून, सुरवर देव इत्यादींना असुर शक्तींशी लढण्या साठी बळ प्राप्त होतं. द्वापारयुगापर्यंत ही सर्व कार्य, सेवा इत्यादी पूर्ण श्रद्धा व धार्मिक भाव जाणून, केली जात. ते करणाऱ्या श्रद्धावान लोकांची  संख्या जवळपास शंभर टक्के होती. 

पण कलियुगात, कलीच्या प्रभावाने, देवांवरील आस्था, श्रद्धा, विश्वास यांची दृढता हळूहळू कमी होत चालली आहे. देवावर विश्वास नाही, हे सांगणाऱ्याची संख्या  वाढत आहे. त्यामुळे हळूहळू लोप पावत जाणाऱ्या या श्रद्धेच्या लहरी अधिकाधिक क्षीण होत जात आहेत. याचं महत्वाचं कारण की,संकट आल्यावर,देवाला नमस्कार करून, त्याद्वारे आपल्यावर आलेल्या संकटातून सुटका करून घेणाऱ्यांच्या लहरी मुळातच, स्वतःपुरत्या मर्यादित असतात. 

याकारणाने, त्यातून सर्वभावे व सर्वव्यापक लहरी, उत्पन्न होऊ शकत नाहीत. म्हणून दिवसागणिक सुरासुर संग्रामा साठी, सुरांची शक्ती कमी पडते. यामुळेच असुरांचा प्रभाव नित्य वाढता दिसत आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे, ज्या प्रमाणात नकारात्मक व असुरी लहरी उत्पंन होतात आणि त्यांचा प्रभाव वाढतो आहे, त्यामुळे असुर शक्तींचा प्रभाव वाढण्यासाठी बलप्राप्ती होत आहे. पण त्या प्रमाणात, सुरशक्तीना बलशाली करणाऱ्या, सश्रद्ध लहरी, कमी प्रमाणात उत्पन्न होत आहेत. 

नकारात्मक भाव असलेल्या आणि श्रद्धा व विश्वास यांचा अभाव असणाऱ्या उदासीन लहरी, या सुर शक्तींना मारक ठरतात आणि त्या जास्त प्रभावी दिसतात. याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे या असुरबली आणि अश्रद्ध शक्तींना त्यांच्या अस्तित्वाची भीती असते.त्यामुळे, आपला प्रभाव वाढवून, त्याद्वारे, जास्तीत जास्त प्रमाणात आणि जास्तीजास्त काळ आपला प्रभाव रहावा, या दुष्ट हेतूने, त्या नकारात्मक शक्ती भारीत असतात. 

अश्रद्ध आणि श्रद्धेची दृढता वा बल कमी असणाऱ्या देहाना, बुद्धीला व मनांना, या भारित शक्ती, सहज प्रभावित करून, त्यांना आपल्या प्रभावाखाली आणतात. यामधे त्या लोकांचं मन, बुद्धी व देह, मुख्यतः प्रभावित होतं, जे आपली श्रद्धा, प्रसंगा नुरूप वा अनुभवाने बदलतात. म्हणजे चांगला अनुभव आला की देव मानायचा आणि वाईट अनुभव आला की, देवावर अविश्वास दाखवायचा. कलियुगात कलीचा, नकारात्मक, वाईट व असुरी प्रवृत्तींचा प्रभाव हा अश्याच लोकांवर जास्त अवलबून आहे. 

कारण अश्या लोकांचा कर्मावर व त्याच्या फलावर, फक्त, चांगलं घडलं तरच विश्वास बसतो. अन्यथा देव नाही, अशी या लोकांची सहजसुलभ देवाची व्याख्या असते. म्हणजे माझं कर्म कसही असो, मला वाईट अनुभव येता कामा नये. किंवा मागे कधीतरी, चुकीचं, वाईट वागलो असेन असं या व्यक्तींना वाटतच नाही. म्हणून अशी लोकं कर्मसिद्धांत, चांगुलपणा, देव श्रद्धा इत्यादी बाबत, कायम कुंपणावर असतात. 

अश्या लोकांचा मी हा खूपच बलशाली असतो. तो मी नकारा त्मक वातावरणात जितका strong असतो, तितकाच तो उपभोगाच्या काळातही बलशालीच असतो. अश्या लोकांची संख्या ही असुर शक्तींचा प्रभाव वाढवते. यावर अजूनही विस्तृत चिंतन, उद्याच्या भागात करूया. पण तोपर्यंत, आपली श्रद्धा दृढ करणारं नाम, नित्य घेत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२०/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...