Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२२

भोग आणि ईश्वर  ५२२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

स्मरणाचं एक वैशिष्ट्य आहे की, सुखात वा उत्तम काळात आपल्याला सुखोपभोग घेण्याचं स्मरण असतं किंवा विसरच नसतो. मन त्यावेळी वास्तविक उत्तम लहरींनी युक्त असतं. सकारात्मकतेने मनाचा घट काठो काठ भरलेला असतो. पण इथेच आपला खरा घात होतो. म्हणजे होतं काय की, गुंतवणुकीच्या धोरणानुसार हा काळ काही साठवण्याचा, जमवण्याचा आणि भविष्या साठी काही तरतूद करून ठेवण्याचा असतो. ते आपण व्यवस्थितपणे करतो. 

हेच नेमकं आयुष्यात वा आत्मानंदाच्या मार्गावर अग्रेसर होण्या साठीसुद्धा करण्याची आवश्यकता असते. पण आपण तेच करत नाही. किंवा त्याचंच स्मरण राहात नाही.  वास्तविकपणे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात एखादा कार्यकाळ असा येतोच, ज्यावेळी मन उल्हसित आणि प्रसन्न असतं, मनांत सकारात्मक विचार, येत असतात, येणाऱ्या कोणत्याही विचारातून नकारात्मक असेल ते, त्यागून, फक्त आणि फक्त सकारात्मक विचार घेऊन पुढे जाण्यासाठी मन सक्षम असतं, जिकडेतिकडे मनाला फक्त उल्हास आणि उत्तम विचार दिसतात. 

हा असा काळ गुंतवणूक शास्त्राप्रमाणे, पुढील काळ तसंच पुढील जन्मासाठी काही साठवून पुढे जाण्याचा काळ आहे. परिस्थिती कधी कशी येईल हे आर्थिक बाबतीत आणि आध्यात्मिक पातळीवर सांगता येत नाही  सर्व आयुष्य हे कर्माधिष्टीत असल्यामुळे आपण आज जो सुखोपभोग घेत आहोत, तो आपल्याच आधीच्या कर्मांचा परिपाक आहे. 

पण हे जाणताना दूरदृष्टीचा अभाव, जाणीवा बंद ठेवतो आणि हे लक्षातच येत नाही की, गुंतवणूक करून पडत्या काळासाठी काही चांगलं कर्म करून ठेवणं जरुरी आहे. अन्यथा सुखाच्या काळात उपभोग घेताना, चांगल्या कर्माचं संचित संपल्यानंतर येणाऱ्या भोग, दुःख या काळा साठी जर काहीच सत्कृत्य व पुण्यकर्म घडलं नसेल, तर तो पडता काळ सुसह्य होण्याऐवजी असह्य होईल. वास्तविकपणे हीच चूक जवळजवळ सर्वच जण करतात. 

उपभोग घेताना हे लक्षात येतच नाही की आपण आपल्याच पूर्वकर्मातील पुण्यकारक कर्माचं, संचितात मिळालेलं फल भोगत आहोत. त्यावेळी असा विचार असतो की, आता तर उपभोग घेऊ, पुढचं पुढे बघू. ज्यावेळी पडता काळ येतो, त्यावेळी वाटतं की, आपण सुखात होतो, आनंदात होतो, ते कोणालातरी बघवलं नाही. कोणीतरी मिठाचा खडा टाकला. पण हे ध्यानात येत नाही की, उत्तम काळात आपण नवीन पुण्यफल जोडलं नाही. उलट आपण आपल्या हिश्श्यातील पुण्य कर्माचं फलरूपात आलेलं संचित संपवलं आहे. 

यावर अजूनही चिंतन करूया, पण तोपर्यंत नामात नित्य राहण्याचा प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...