Skip to main content

भोग आणि ईश्वर ५२७

भोग आणि ईश्वर  ५२७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
खरं पाहिलं तर मनातील भाव बदलला की, सर्व त्या भावानुसार बदलत जातं. कदाचित संचित आणि प्रारब्ध यांच्या कर्म पुंजी नुसार प्रत्येकाला यामध्ये वेगवेगळा वेळ किंवा काळ लागू शकतो. पण एकदा एखादा मार्ग योग्य आहे, हे लक्षात आलं की, त्या मार्गावर पुढे जाणं इतकंच आपल्या हातात आहे. तेवढं आपण नेटाने करू शकतो. पण आणि हा पण महत्वाचा आहे. कारण हे करणं इतकं सहज असतं तर इतके अनंत ऋषीमुनी, संतं महंत यांनी पूर्ण आयुष्य, त्यासाठी खर्ची घातलं नसतं.

म्हणजेच यामध्ये काहीतरी गुह्य असणार, ज्यामुळे, ही गोष्ट वा हे कर्म वाटतं तितकं सहज शक्य होत नसेल. याचं कारण काय, याचं चिंतन करता हे लक्षात येईल की, या सर्व गोष्टी तेंव्हाच साध्य होतील, जेंव्हा मनाला हे पटेल आणि ते मन, त्यासाठी आवश्यक कर्म म्हणजे नित्य कर्में नेमाने व नेटाने देह, बुद्धी व वाचा यांच्याकडून करवून घेईल. म्हणजे पुन्हा आपण एका प्रश्नावर आलो.

याचं उत्तर अनेकांनी अनेक प्रकारे देऊन लिहून, कृतीतून दाखवून, जगून आपल्याला दिलं आहे. स्वतः भगवंतांनी त्याबाबतचा सर्वात सोपा मार्ग श्रीमद् भगवदगीतेत मांडून ठेवला आहे. अनेकांनी तो अनेकप्रकारे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक प्रयास केले आहेत.यातील योग याग अष्टांग साधने, मंत्र तंत्र आदी विद्या, या महत्प्रयासाने साध्य होणाऱ्या आणि साध्य होऊन सिद्धीप्राप्ती झाली तरी, त्या टिकवून ठेवण्यासाठी, पुन्हा सतत मेहनत व जागरूकता आवश्यक असणाऱ्या आहेत. 

त्यातही, त्यातील काही अगदी लहान वयात सुरू केल्या तरच, पूर्णत्वास जाऊ शकणाऱ्या आहेत. म्हणजे सर्व सामान्य मानवा साठी ईश्वप्राप्तीसाठी, मनःशांती साठी, उचित भाव प्राप्ती करून, त्यातून योग्य लहरींपर्यंत पोचण्यासाठी ईश्वरावरच अवलंबून राहावं लागणार. पण अश्या कृपेला व ती प्राप्त व्हायला, संचीता तील सारी कर्मफलगती सुधारणं अत्यंत आवश्यक आहे.

बरं त्या कर्मगतीत शिल्लक कर्म किती आहेत आणि अजून किती कर्मांची भर त्यात पडत राहणार आहेत, हेदेखील विधाता जाणे. पण यातून सुटकेसाठी काही मार्ग काही यंत्रणा नसणार हे संभवत नाही. कारण प्रत्येक मार्गाला काही विकल्प किंवा इतर मार्ग असतात, हा विश्वाचा नियम आहे. तसा मार्ग, ज्यायोगे आपण मनाचा वारू नियंत्रित करून, मनातील भाव नेटके करून, पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय यांना स्वनियंत्रणात ठेवून, अनुचित विचार व कर्म यांचा त्याग करून, फक्त उचित कर्में करत राहून, मोक्षमुक्तीच्या अंतिम उद्देशापर्यंत मार्गक्रमण करू शकतो. 

यासाठीचे तीन मार्ग अर्पण, शरण व स्मरण यांच्यातील, अर्पण व शरण यावर आपण दीर्घ चिंतन मागेच केलं आहे आणि स्मरणाच्या चिंतनात मनाच्या स्थिती व भाव यावर विचार करत इथपर्यंत आलो आहोत. म्हणूनच यातील स्मरणासाठी आवश्यक भावस्थिती जाणून घेण्यासाठी, उद्याच्या भागात पुढे चिंतन करूया. त्यासाठी ईश्वराच्या नित्य स्मरणात रममाण होऊया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...