Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४०

भोग आणि ईश्वर  ५४० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
मनावरील सर्व प्रकारचे  ताण, अतिरिक्त दबाव, ज्यामुळे  आपण, प्राप्त भोग व उपभोग यातून आपलं मन शुद्ध, सशक्त आणि सुबल ठेवू शकत नाही, त्या मनाला ती शुद्धता ते बल व ती ऊर्जा प्राप्ती साठी, अनेक उपाय आहेत.  पण त्यातील, सर्वमान्य, सामान्य माणसाला सहसुलभ असा मार्ग म्हणजे सद्गुरू. समस्त जगताला आधार, कलियुगातील विशेष आशास्थान आणि ईश्वर प्राप्तीसाठी सामान्य माणसाला सामान्यत्व ते असामान्य ईश्वरीकृपाप्राप्ती या मार्गातील मुख्य आधरस्तंभ म्हणजे सद्गुरू. 

जदडेहात आल्याशिवाय, संचीतातील कर्मागतीचा फेरा चुकवता येणार नाही आणि मुक्तता सुद्धा शक्य होणार नाही, हे विधि लिखित सत्य आहे.  या देहात आल्यावर, कर्मप्राप्त भोग व उपभोग हे देहाचे असतात, आत्म्याचे नाही.आत्म्याला ती लागलेली काजळी असते.ही काजळी काढण्यासाठी आणि नवीन चढू न देता, मुक्तीच्या मार्गा वर जाण्यासाठीच, पंचमहाभूत रूप देह, ईश्वराने दिला आहे. ही जाणीव सामान्य जीवाला, अज्ञानी मुढ जनांना, होणं हे सर्वसामान्य परिस्थितीत अशक्य आहे. 

एखादा भाग्यवानच हे ज्ञान, या जाणीवा व हा योग प्रारब्धात घेऊन, जन्माला येतो. अश्या असामान्य जीवांना, ईश्वप्राप्तीची ओढ,तळमळ हा ईश्वरी दैवयोग पूर्वसंचित, पूर्वसाधना, पुर्व कर्माने व ईश्वरी कृपेने प्राप्त होतो. हे होण्यासाठी त्या आत्म्याला सुद्धा अपूर्व यातना, साधना,भोग यातून जावच लागतं.पण जगताच्या कल्याणार्थ हे जीव, हा भोग व या यातना सहन करून, ईश्वरी कृपा प्राप्त करतातच. ही ईश्वरी कृपा प्राप्ती, दुर्घट, अप्राप्य असते. 

पण अशी कृपा प्राप्त होण्यासाठी, त्या जीवाला चित्त शुद्धी, आत्मशुद्धी, या मार्गावरून जावेच लागते. दृष्टी अंतर्यामी होऊन, विचार, आचार यांची शुद्धता व सात्विकता या जीवांना, पुढे पुढे नेते, त्यातून हे विलक्षण योग प्राप्तीचं फलित मिळाल्यावर, हे जीव, या संकटांना, प्रापंचिक भोग उपभोग यांना पूर्णपणे जाणतात. त्या सर्वातून, जाणाऱ्या, वासना, विकार व विखार यांच्या माऱ्यापुढे तग धरून, आपलं चित्त शुद्ध व स्थिर करायला किती दिव्यत्व करावं लागतं, हे ते जीव जाणतात.  

म्हणून असे जीव ईश्वरी कृपा प्राप्त करण्याच्या मार्गाची महती, गती व त्रास या सर्वांना जाणून असल्यामुळे, हा मार्ग सहसुलभ, सर्वव्यापक व्हावा, यासाठी सतत चिंतन शील व कृतिशील असतात. असेच जीव उद्धरित आत्मे होऊन, जनहित साधण्यास ईश्वराला प्रार्थना, अर्चना आणि त्याचसाठी साधना करत असतात. किंबहुना, तेच त्यांच्या चैतन्याचा पुढील मार्ग व ध्येय असतं.  म्हणून अश्या उन्नत जीवांना ईश्वरी कृपेचा वरदहस्त नित्य प्राप्त असतो. अश्याच अलौकिक जीवांना लोक व जगत कल्याण हेतूसाठी ईश्वर गुरू तत्वात सामील करून घेतो. अर्थात सद्गुरू ही उपाधी अश्याच शुद्ध, सात्विक व अद्भुत जीवांना प्राप्त होते.  

यावर अजून चिंतन, पुढील भागात करूया. पण तोपर्यंत आपण नामाने हित साधण्याचा प्रयत्न करतच राहूया.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...