Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३७

भोग आणि ईश्वर  ५३७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कलियुगातील असुर शक्तींचा प्रभाव वाढत असताना, या नकारात्मक  लहरी आपल्यापर्यंत येणारच. कारण मुळातच आपण सर्वप्रकारच्या, म्हणजे शुभ व अशुभ लहरींच्या विळख्यात असतो. यातून सुटका नाही. सुटका नाही, म्हणजे, हे वातावरण, समस्त भुतलाला व्यापून आहे. म्हणजे जिथे जिथे या विश्वात श्वास आणि उश्वास याचं साम्राज्य आहे, त्या त्या स्थानापर्यंत, या लहरींचा प्रभाव आहे आणि असणार. विज्ञानाचा सुद्धा तो नियम आहे. अगदी निर्वात पोकळीतसुद्धा या लहरींचा संचार असतोच. 

म्हणजे, आपण आपल्या देहाच्या सर्वांगाभोवती, वलयांकित आहोत. याचा आपल्या बुद्धी, देह व मन यांवर, प्रभाव होतच असतो. या प्रभावळीत, सुष्ट आणि दुष्ट, सकार व नकार अश्या दोन्ही प्रकारच्या लहरी असतात.  त्या आपल्या देहासह, बुद्धी व मस्तिष्क आणि मन यांच्यावर सतत एकप्रकारे दबाव टाकत असतात. आपण एखाद्या वाईट प्रसंगातून वा अनिष्ट काळातून जातो, त्यावेळी हा दुष्ट शक्तींचा प्रभाव अतिप्रमाणात असतो.  त्यावेळी मनावर असलेला, ताण व तणाव आपण नक्कीच अनुभवू शकतो. 

किंबहुना, तो तसा जाणवतो याचा अर्थ आपण आतून कुठेतरी सशक्त किंवा सबल आहोत वा असतो. अन्यथा असा प्रभाव न जाणवता आपण त्यात वाहावत गेलो असतो. म्हणून विशेषतः अश्या काळात, ज्यावेळी हा नकारात्मक दुष्ट शक्तींचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता असते, त्याकाळात, आपल्या शास्त्रा नुसार, आपल्याला स्तोत्रपठण, मंत्रोच्चारण इत्यादी सहाय्यक गोष्टी किंवा तंत्र यांचा वापर करण्याचे संस्कार केले गेलेले आहेत. Tyamaae निश्चित विज्ञान आहे, हे नक्की.

हे संस्कार, त्या त्या वेळेला, तेंव्हाच  लक्षात राहतील किंवा लक्षात येतील वा आठवतील, जेंव्हा ते आपल्या नित्य पठणाचा भाग असतील. ही मंत्र, स्तोत्र हे थोतांड किंवा सहज जाता जाता करण्याच्या गोष्टी नसून.  त्यांचा नित्य सराव किंवा म्हणण्याचा अभ्यास असावा. हे एक प्रकारचे पॉवर बूस्टर आहेत. आता आज करोना लसी नंतर, बूस्टर डोसची गरज वा आवश्यकता तेंव्हाच भासते, ज्यावेळी, येणारे, प्रत्येक नवीन पिढीचे विषाणू हे, आधीच्या विषाणूपेक्षा जास्त सक्षम व बलशाली असू शकतात.

अश्यावेळी, शरीर त्यासाठी सक्षम नसल्यास, त्या शरीरावर, त्यांचा प्रभाव पडून, आजारपण येण्याची शक्यता असते. त्यासाठी अतिरिक्त बूस्टर डोस. याचं न्यायाने मन हे सहसा संकटं चिंता, काळज्या इत्यादीचे हल्ले झेलायला व पुन्हा ताठ उभं राहायला सक्षम होऊ शकतं,जर ते मुळात पुरेसं सक्षम आणि बलवान असेल तरच. पण असं बलवान नसलेल्या किंवा संकटं काळात बल अपुरं पडत असल्यास, त्याला अतिरिक्त बलाची आवश्यकता भासू शकते. 

आपल्यापैकी अनेकजण सकट काळात, दुःख दैन्य, नकारात्मक काळात, मनाचा कणखरपणा टिकवू शकतात. किंबहुना काही जण, त्याही काळात, इतरांना साथ वा धीर देताना दिसतात. पण असं धैर्य, मनाचं बल नसलेल्या लोकांना आणि मनाचं बळ टिकवून, ते वाढवण्यासाठी, नक्कीच मनाला बूस्टरची गरज भासते. म्हणून आपल्या भोवती असलेल्या आणि वेळोवेळी वाढणाऱ्या दुष्ट व नकारात्मक प्रभावाला सक्षमतेने तोंड देता येण्यासाठी काय काय आवश्यक आहे, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया, ज्ययोगे, मनाची सक्षमता वाढेल आणि बराच काळ टिकवता येईल.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२१/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...