Skip to main content

जानकी पुनःवनवास १३

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १३

अयोध्या जवळ येत आहे हे पाहुन हर्षभरित झालेले सर्व , भगवान मुख़ातून अजुन काही ऐकण्यास उत्सुक झाले. हेच जाणुन प्रभु स्वयम वदते झाले

भगवान श्रीराम उवाच

प्राक्तनात जे लिहिले तुझिया
भोग भोगणे आहे रे तुज
सहस्त्र जन्मे येऊन योनि
कर्मफले बघ मिळती रे तुज

किती अडकसी कर्मगते तू
किती भोगिसी जन्मोजन्मी
तुझे तुला ना उमगत कोड़े
का रति रमसी या कर्माग्नि

कळे न काळाची गति तुजला
कळे न तुजला किती भोग हे
तुझे भोगणे संपे न कधीही
जोवर माया मोहून  राहे

लक्ष्मण उवाच

प्रभु वदावे यातून मार्गा
कैसे जड़जीव सुटती सांगा
कोण्या कर्मे भोग सुटावे
त्या मार्गाचे गुह्यही सांगा

भगवान उवाच

योग याग  अष्टादिक मार्ग
परंतु हर युगी नसेल सवडी
म्हणून एकच मार्गा वदतो
नामस्मर तू क्षणही न दवडी

मिळेल जो जो वेळ जीवाला
नामा जोडूनी करे सार्थकि
ज्या योगे हे भोग सुटावे
अंति मोक्षाची हो प्राप्ति

भोग भोगताना स्मरणे रे
सुखात ही स्मरशी नामाला
वेळ मिळे तुज पुण्य जोड़ी तू
क्षण ही न वाया स्मर नामाला

लक्ष्मण उवाच

नामाची इतुकी महती तर
कोणी कैसे केले आधी
स्पष्ट करुनी सांगावे भगवन
याला आहे क़ाय उपाधी

भगवान उवाच

असे नाम ज्या नाही उपाधी
मिथ्या नाही यांची महती
याच्या योगे तरले ईश्वर
अनेक दैत्या निर्दल करती

महेश , माधव, ब्रम्हाहि म्हण
कोणी न यावीण असे वेगळे
तिन्ही लोकी श्रेष्ठ जहाले
नामाने बघ  तरले  सगळे

नको शंकि या अवीट नामा
यावीण जगी ना तरणे कोणी
जन्मजन्मिचा खेळ थांबवी
नामा अधिकची नसेल ऊणी

लक्ष्मण उवाच

एकच पुसतो तुम्हा प्रभु मी
ज्याने केले नामा जवळी
पापे त्याची असतील कितीही
पुसुनी जातील का हो सगळी

भगवान उवाच

असेल जरी कितीही अधमी तो
कोणी पापी नर ही असे मग
नामे स्मरता आत्म्यापासून
वाल्मीकि होई वाल्या ही मग

इतुके गुह्य असे नामाचे
परंतु जाणे जो जीव येथे
पापे हरुनी भोगही संपुनी
आत्मा जाई परमात्मा जेथे

फलश्रुति :

नसेल आधी कुणीही कथीली
रामगीता म्हणुया हो याला
पारायण  करता घडते हो
रामकृपा ती अखंड त्याला

श्रीरामे इतुकी कॄपा करावी
वाचें यासी तयासी फळणे
पापांच्या राशी उतरोनि
प्रारब्धाचे भोगहि टळणे

रामाचा आशीष तयाला
जो जीव पठतो या गीतेला
अखंड सेवा प्रभुची तयाला
मोक्ष मिळे अंति आत्म्याला

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© शब्द प्रभुंचे
लेखन : प्रसन्न आठवले
०२/०२/१८

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...