Skip to main content

जानकी पुनःवनवास २९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २९

" त्यावर निद्रादेवी म्हणाली की ही तुमची मागणी उचित नाहीच पण प्रकृति धर्माविरुद्ध आहे . तरीही तुमच्या इच्छेचा मान ठेवून हे करायच असेल तरीही  यावर एकच मार्ग निघू शकतो"

लक्ष्मण म्हणाला "कशा प्रकारे आणि क़ाय आहे तो मार्ग"

" एकच उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या वाटयातील निद्रा कोणालातरी घ्यावी लागेल तरच हे शक्य आहे"

" ठीक आहे मग माझ्या वाटयातील निद्रा माझी धर्मपत्नी, अर्धांगी उर्मिला पूर्ण करेल आणि मी पुढची चौदा वर्ष निद्रारहित अवस्थेत व्यतीत करीन"

"जशी आपली इच्छा आणि आज्ञा "

अस म्हणून निद्रादेवी अंतर्धान पावली.

"आणि म्हणून गेली चौदा वर्ष अनेक परीक्षामधुन गेले"

" जाणतो मी.  माझ्या वाटयातील निद्रा पूर्ण करतानाच अजून एक कर्तव्य जे मी तुझ्या हाती जबाबदारी म्हणून दिल होत तेही तू एकाच वेळी दोन्ही पार पाडत होतीस. "

" हो आपल्या वाटयाची निद्रा घेत असतानाच आपण इकडच्या सर्वांची जबाबदारी सुद्धा माझ्यावर देऊन गेला होतात. नव्हे तस वचन माझ्याकडून घेतल होतत आणि "

" हो घेतल कारण मला पूर्ण विश्वास होता कि तुला दिलेली आणि तुझ्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी तू पूर्ण पणे निभावुन नेणार. "

" हो आणि त्यासाठी मला जानकिताईने दिलेल्या शक्तिचा उपयोग झाला. ज्यायोगे मी एकाच वेळी तीन गोष्टी करू शकत होतो. आणि म्हणूनच आपल्या वाटयातील निद्रा घेत असतानाचा मी माझी इतर कर्तव्य देखील पार पाडत होते"

" तू माझी अर्धांगी म्हणून सार्थ साथ दिलीस आणि राजा जनकांच्या नावाला आणि संस्काराना साजेस वागलीस. माझ्या विश्वासाला पूर्ण उतरलिस. "

"तुमचा माझ्यावर विश्वास होता हेच माझ अहोभाग्य"

" तुला माझ्या सोबत लग्न केल्याच फार सुख , किंबहुना कोणतच सांसारिक सुख मिळाल नाही हे मी जाणुन आहे"

"हे बोलून आपण माझ्या सेवेचा आणि कर्तव्यतत्परतेचा उपमर्द करत आहात अस नाही वाटत आपल्याला"

"नाही तसा हेतु नव्हता माझा"

"आपल्याशी लग्न झाल तेंव्हाच एक गोष्ट समजली मला"

"कोणती गोष्ट"

"हिच की आपण म्हणजे प्रभु रामचंद्रांची सावली आहात आणि राम लक्ष्मण हे भिन्न नाहीत. आपल्या जन्माच्या वेळची एक गोष्ट समजली होती , आणि तेंव्हाच माझीही भूमिका ठरली होती "

" कोणती गोष्ट उर्मिले "

" नको "

" आता हे अर्ध सांगून उगाच मस्तकाला काम नको देऊस. सांग लवकर"

" बर. आम्ही ऐकलय की आपल्या जन्मानन्तर आपण खुप काळ रडत होतात आणि अनेक उपायानन्तर जेंव्हा आपल्याला ज्येष्ठ भ्राता श्रीरामचंद्र यांच्या शेजारी ठेवण्यात आल त्यावेळीच आपण रडण्याचे थांबलात. आणि त्यानंतर कायम आपल्याला त्यांच्यां शेजारी झोपवण्यात येत असे. ख़र आहे ना हे"

" हो भ्राता आणि मी दोन भिन्न शरीर असलो तरीही अंतर्यामी एकच आहोत. त्यांच्यांशिवाय जगण्याची कल्पना अशक्य आहे आम्ही एकश्वास आहोत दोघे"

" आणि आपण माझे श्वास म्हटल्यावर माझी सुद्धा तशीच परिस्थिति आहे. जी आपली इच्छा तीच माझिही"

"पण तरीही एकदाही "

"नाही एकदा सुद्धा असा विचार या मनाला स्पर्शू शकला नाही आणि स्पर्शू  शकणारसुद्धा नाही. फक्त"

"फक्त क़ाय "

"एक प्रश्न विचारु शकते का मी"

"निःसंन्कोचपणे विचार "

"सर्व गोष्टी वा घटनां विधिलिखित असतात तर मग  आपल्या चौदा  वर्ष निद्रा न घेण्याच्या।मागे फक्त बन्धुप्रेमाची तत्परता हा एकमेव भाव होता कि इतरही  कार्यकारण भाव होता  , ही एक गोष्ट जाणुन घ्यायची इच्छा आहे"

" उर्मिले त्याच एकमेव कारण म्हणजे इंद्रजीत अर्थात दशानन पुत्र मेघनाथ याला वरप्राप्त होता कि जो कोणी चौदा वर्ष निद्राहीन अवस्थेत राहिलं तीच व्यक्ति इंद्रजीताचा वध करू शकेल आणि त्यासाठी विधात्याने हे उत्तरदायित्व मला सोपवल आणि मी ते तुझ्या साथिने सार्थपणे पार पाडू शकलो"

" आज माझ्या शंकेच निरसन झाल"

कोणती शंका"

ही इतकी मोठी जबाबदारी आपण मला का सोपावलित"
बराच काळ दोघेही एकमेकांच्या डोळ्यात घडलेल्या घटनां आणि भूतकाळ शोधत होते"

इकडे लक्ष्मण आणि उर्मिलाची चर्चा चालू  असताना
प्रभु रामचंद्रानी पाचारण केल्याप्रमाणे आणि त्यांच्यां आज्ञेनुसार भरत चौदा वर्षानंतर आपली माता कैकयी हिच्या महाली प्रवेश करत होता .

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...