Skip to main content

जानकी पुनःवनवास १७

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १७

" भ्राता भरत काही कथन करण्याचा यत्न करीत असताना अश्रुधारामुळे पुढे एक अवाक्षर उच्चारणे अशक्य होत होते. दोन्ही भावांच्या  अश्रून्चा महापुर लोटला होता. परंतु अचानक भरताच्या गालावरील अश्रु पुसत श्रीराम वदते झाले.

" भ्राता भरत तू सकुशल आहेस ना आणि राजपरिवारातील इतर सदस्य,माता, ठीक आहेत ना"

भरत अजूनही या समोर दिसणाऱ्या प्रभुना पाहून आश्चर्यमग्न होत होता. जे पहातोय ते सत्य की सत्याचा विपर्यास की पुन्हा भंगण्यासाठी पडलेल एक दिवास्वप्न, या विचित्र भावावस्थेत भरत अड़कला होता. आणि इतका अनंत आणि अमर्याद आनंद व्यक्त तरी कसा करावा हीच त्याची अवस्था झाली होती. मन अजून विश्वास ठेवायला तयारच नव्हतं की प्रत्यक्ष परमानंद सागर ज्येष्ठ भ्राता , या जगतातील सर्वात अमूल्य दागिना , भरतासाठी समस्त विश्वातील महत्तम व्यक्ति आता या क्षणाला चौदा वर्षान्चा वनवास संपवून त्याच्या जितक्या नीकट होती, आणि म्हणून भरताने खात्री करण्यासत्व अनेक वार रामाला स्पर्श करून बघितल.

त्याची ती अवस्था पाहुन प्रभु म्हणाले

" भरता क़ाय पहातोस असा"

आणि भरताने चेहर्यावरील अश्रु पुसले प्रभुंचे हात हातात घेतले आणि भरताच्या मुखातून अस्फुट शब्द आले

" ज्येष्ठ भ्राताश्री ज्याचे प्राण शरीराबाहेर होते त्या मृतवत भरताला विचारत आहात आपण की भरता तू कसा आहेस. आपण जाणता की आपल्याशिवाय भरत म्हणजे एक निर्जीव शरीर मात्र आहे.  आजपर्यंत घेतलेले सर्व श्वास फक्त आणि फक्त या शरीर चालनार्थ घेतले होते. फक्त आजचा दिवस दिसावा म्हणून. आपण त्रिकालदर्शी आहात. या काळा दरम्यान वाहिलेल्या प्रत्येक अश्रुची दाद आपल्याजवळ मागायची आहे, तस मला त्या अश्रूनच्या थेम्बानि बजावून सांगितलय. अनंत जन्मांच्या पातकाच परिमार्जन करवून घेतलय काळाने आमच्याकड़ून. प्रभु हे जाणता आपण."

प्रभु स्वयं साक्षी असूनही मर्यादा पुरुषोत्तम असूनही ह्यावर क़ाय वदणार. तेही यातून गेलेच होते. त्यांचाहि भरत हा अत्यंत प्रिय भ्राता होता. पण तरीही स्वतःला सावरल आणि
प्रभुनी भरताला भानावर आणल आणि उपस्थित लोकानाही भरताची भेट घेण्यास सांगितल. श्रीराम भरत भेटीप्रमाणेच भरत लक्ष्मण भेट झाली अश्रून्चा जणू पुर सवर्त्र जाहला. पुन्हा शत्रुघ्न भेट झाली आणि भरताला प्रभु म्हणाले

" माझ्या नादात तू आमच्या लाडक्या शत्रुघ्नाकड़े दुर्लक्ष केलेस अस दिसतय भरता"

शत्रुघ्न लगेच  म्हणाला

" नाही भ्राताश्री त्याने एक क्षण देखील मला दुर्लक्षित केल नाही उलटपक्षी आपल्या वतीने जास्तच काळजी घेतली आहे."

प्रभु म्हणाले

" माझा भरत आहेच प्रेमळ".

प्रभुनी समस्तांची ओळख करून दिली आणि सर्वात प्रथम भरत व शत्रुघ्न खाली आले मात्र, इतका वेळ आपली उत्सुकता ताणून प्रतिक्षेत असलेल्या आयोध्यावासीयांच्या आनंदास पारावार उरला नाही. सर्व स्वयंस्फुर्तिने राम , भरत , लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांसह माता जानकी यांचा जयघोष करत होते. चौदा वर्ष ज्या योगाची प्रतीक्षा ज्यानी ज्यानी केली त्यांची पुण्याई आज फळली आणि विमानातून प्रभु श्रीराम जानकीचा हात हाती घेऊन बाहेर आले. सर्वानी हर्षभराने आणि नाभिअग्रापासुन जयघोष केला. त्या अलौकिक नादाने सुग्रीव,विभीषण यासह विमानात उपस्थित वानरगण भारावून गेले. आपल्या लाडक्या राजपुत्र आणि युवाराज्ञीला पाहुन प्रजाजनाना झालेला आनंद आणि या दोघांप्रति प्रजेच असलेल प्रेम, ममत्व यानी त्यांचेही नेत्र पाणावले अर्थात आनंदाश्रुनी.
सर्व पुष्पक विमानातून बाहेर येऊन उपस्थित सर्वाना हात उंचावून व नमस्कार करून प्रतिसाद देत होते. स्वतः श्रीराम व जानकी भरतासमवेत एका रथात स्थानापन्न झाले. आणि बाकीच्या पाहणे मंडळींना घेऊन भ्राता लक्ष्मण आणि शत्रुघ्न इतर रथात स्थित झाले. आणि सर्व रथ प्रासादाच्या दिशेने निघाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...