Skip to main content

जानकी पुनःवनवास ३४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३४

भरताच्या भावावस्थेवर प्रभु काही क्षण स्वतःहि भावमय झाले. साश्रुनयनानीच प्रभुनी वाकून खांद्याला धरुन भरताला उभ केल , उठवल. त्याच उपवस्त्र नीट करून देत, त्याचे अश्रु पुसले. सर्वात प्रिय भ्राता ,अनुज , होता त्यांचा. लहानपणी सर्वात जास्त रक्षण प्रभुना कराव लागे भरताच. इतक्या प्रिय बंधुला नव्हे प्रतिरुपाला अश्रु ढाळताना बघून, प्रभुना कस क़ाय बर वाटेल. भक्त वत्सल ते, इथे तर प्रत्यक्ष प्रिय अनुज उभा.

प्रभुनी एकवार शांतपणे भरताकडे पाहिल. भरत अजूनही हुंदके देऊन लहान मुला सारखा रडत होता. प्रभुना पुन्हा लहानपणीचा भरत आठवला आणि त्याही अवस्थेत अश्रु ढाळता ढाळता प्रभु किंचित स्मित करते झाले.  भरत त्याच अवस्थेत काही बोलण्याचा आणि पुन्हा पुन्हा हात जोडून क्षमायाचना करण्याचा यत्न करीत होता. पण अखंड अश्रुधारांमध्ये काहीही बोलण जमत नव्हतं आणि सुचतही नव्हतं .

ह्याच कोंडित प्रभु देखील होते. पण प्रयत्नपूर्वक स्वतःला नियंत्रित करत ते म्हणाले

'भरता "

बस या प्रेमपूर्वक आलेल्या शब्दानी जणू रोमांच उभे राहिले भरताच्या सर्वांगावर , आणि अनायासे त्याच्या मुखातून शब्द निघाले,

" चुकलो आम्ही ज्येष्ठ भ्राताश्री , चुकलो आम्ही माते , चुकलो आम्ही , क्षमा असावी "

अस म्हणून भरत पुन्हा रामाच्या पायावर डोक टेकण्यासाठी
झुकणार इतक्यात प्रभुनी त्याना धरल आणि माते पुढे उभ केल. भरताने अश्रुपूर्ण नयनानी मातेकडे पाहिल आणि दोघानाही अश्रु अनावर झाले. साहजिक आहे, चौदा वर्ष जवळ असून माता आणि पुत्र कधीही न भेटलेले आणि आधी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलेले दोघे आज पुन्हा समोर उभे होते. या सर्वाचा कर्ताकरविता एकिसाठी पुत्र आणि एकाचा भ्राता असलेले प्रभु, हे दृश्य पाहण्यासाठी जणू जन्मलो आहोत अश्याच आविर्भावात उभे ,माता पुत्राच्या प्रेमाचा सोहळा पाहात  तेदेखील लोचनी नीर आणि मूर्ति क्षमाशील या मुद्रेने.

माता अश्रु भरलेल्या डोळ्यांनी पुत्राला हात जोडणार इतक्यात भरत आणि राम दोन्ही पुत्र एकदम पुढे सरसावुन मातेला अस करण्यापासून अडवल . भरत मातेच्या पायावर डोक टेकुन म्हणाला

"माते क़ाय करतेस. चूक नव्हे घोर प्रमाद आमच्या हातून घडलाय, दयेस पात्र आहोत की नाही हे न जाणतादेखील हा पुत्र तुझी क्षमायाचना करतोय. "

"पुत्रा भरता , जे घडल त्याला पूर्णपणे जबाबदार मी असताना आणि यात सर्व राजघराण्याला भरडल. माझ्या मुळे माझ्या सर्व आप्ताना जे भोगाव लागल, खरतर ते क्षमायोग्य आहे की नाही हे माहित नाही , पण तरीदेखिल ..........."

मातेला मधेच थांबवत भरत म्हणतो , माते आपला अपराध हा पुत्रप्रेमाने आंधळ्या मातेने केलेल एक घोर कृत्य हे निश्चित. ते  एका मातेने ममत्वापायी केलय, पण मी तर काहीही लक्षात न घेताच जे आपल्याला बोललो" 

एवढं बोलून भरताला पुन्हा अश्रु आवरेनासे झाले.

प्रभुनी दोघानाही जवळ बसवून आता जे घडल त्यावर दोघानीही काहीही न बोलता गत काळाला एक स्वप्न असल्याप्रमाणे विसरून पुढील गोष्टिंचा विचार करावा तरच दोघांमधला कड़वटपणा दूर होईल हे समजावून सांगितल आणि स्वतः दोघांचाहि निरोप घेऊन ते आपल्या महालाकडे देवी जानकीना भेटण्यासाठी निघाले. तो पर्यन्त त्याचा निरोप  प्रतिहारींकडून देवी जानकिंच्या महालाकडे गेला सुद्धा. आणि इकडे कैकई आणि भरत एकमेकांचे अश्रु पुसण्यात आणि एकमेकांना निरखुन पाहण्यात दंग होते, ज्या दृश्याने प्रभु स्वतः देखील अन्तर्मनात सुखावले आणि कदाचित काळ देखील.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...