Skip to main content

जानकी पुनःवनवास २५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २५

मातेने खुप विचार करून रामाच्या सांगण्याचा स्विकार केला आणि सर्व बळ गोळा करून बोलण्याचा यत्न सुरु केला

"  रामा मी जे सांगते ते तू शान्तचित्ते आणि पूर्ण ध्यान देऊन ऐकावस आणि पूर्ण कथन होईपर्यंत तू मनावर ताबा ठेवशील अस वचन मला दे"

" होय माते तस वचन मी तुला देतो, पूर्ण कथन होईपर्यंत मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही . झाल समाधान, आता सांग कोणताही आडपडदा न ठेवता"

"ऐक चौदा वर्षानपुर्वी मंथरेच्या सांगण्यावरून , मोहाला बळी पडून मी स्वतःच्या हाताने व कर्माने सर्व होत्याच नव्हतं केल. कोणाचाहि विचार न करता पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या एका मातेने सर्व घडलेल बिघडवून तुला, सीतेला आणि पुत्र लक्ष्मणाला वनवासात धाडल, तेही चौदा वर्षाकरता. आणि अयोध्येचे राज्य भरतासाठी मागून घेतल. तुम्ही सर्व पित्याच्या आज्ञेनुसार वनवासात गेलात. त्यावेळी आजोळी गेलेले भरत व शत्रुघ्न परत आले तोपर्यंत तुमचे पिताश्री  स्वर्गवासी (येणारा अश्रुना आवरत, राम मातेच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवतो) झाले."

"भरताला आल्यावर सर्व समजल आणि तो .............  .... त्याने ........................ माझ्या पुत्राने , माझाच तिरस्कार   ....... .... केला, एकाअर्थी योग्यच केले त्याने मला माझ्या कर्माची पूर्ण शिक्षा दिली. कदाचित मिळालेली शिक्षाही माझ्यासाठी कमीच् आहे इतकं माझ पातक, माझा प्रमाद हा प्रचंड आहे. "

"माते तू अजूनही पूर्ण सांगण्यास धजावत नाहीस, क़ाय शिक्षा भोगलीस तू , आमचा वीरह,  तो तर सर्वानीच एकमेकांचा सहन केला मग तू क़ाय भोगलस ते सांग."

" भरताने"

मातेला पुढे एक अक्षर बोलावत नव्हतं. इतका वेळ जमिनीवर बसलेल्या मातेला रामाने मंचकावर बसवल. आणि आश्वासक भावाने पुढील कथन करण्यास सांगितले.

" भरताने माझ्याशी गेली चौदा वर्ष संवाद .................बंद केलाय, माझ्या पापांची शिक्षा "

रामाला या वाक्याने या कथानाने प्रचंड धक्का बसला. आणि मस्तकात राग जाऊन राम मंचकावरुन उतरून उभा राहिला आणि क्रोधाने तयाच्या चेहर्याचे भाव बदलले. पण कैकयी बोलती झाली

"रामा तू वाचन दिलयस की ...."

राम शांत होऊन त्वरेने पुन्हा मंचकावर विराजमान झाला. आणि मातेला हात जोडून म्हणाला " क्षमस्व माते परंतु  अन्य कुणीही यावर भरताला जाब विचारला नाही का. कुणीही यावर भरताची कानउघडणी केली नाही का. त्याला कुणीच कस अडवल नाही, इतकं दुःसाहस करताना. माते अनुत्तरित का तू ."

माता रामाच्या शांत संयत पण  रागाचा माग दाखवणाऱ्यां चेहर्याकडे काही क्षण बघत राहिली, आणि वदली

"रामा तुला माझा राग आलाच नाही की तू एक पुत्र आणि मी माता आहे या संबंधांमुळे तू दर्शवू इच्छित नाहीस, आणि या सर्वांवर कड़ी म्हणजे तुला भरताने केलेल्या नैसर्गिक आणि प्रासंगिक प्रतिक्रियेचा राग आला."

"माते तुला मी भरतावर रागावलो म्हणून राग आला नाहीये ना".

"नाही रामा असा विचार पण येणार नाही, माझ्या मनात. पण मला तुझ्या भूमिकेच कौतुक वाटत, कारण जिने आपल्याला वा समस्त कुटुंबाला दुःखसागरात लोटल त्या मातेचा, त्या व्यक्तिचा तुला राग आलाच नाही, की येऊनसुद्धा तू त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालास. तस असेल तर तू निश्चित भरतापेक्षा श्रेष्ठ आहेसच, पण ते तू सिद्ध केलयस अस मी म्हणेन"

"नाही माते तशी कोणतीही बाब नाही. भेद दोघांमधे इतकाच आहे की मी जाणतो प्रसंगोचित तुझी चूक असु शकेल , पण तो एक माझ्याच कर्माचा आणि त्यायोगे मिळणाऱ्या फलाचा व्यापक भाग होता. तद्वत तू केलेली गोष्ट ही प्रमाद नसून एक परिणाम आहे माझ्यासाठी किंबहुना , या सर्वात भरडले गेलेल्या सर्वांच्या कर्मफलाचा. ही गोष्ट भरत जाणत नाही म्हणून त्याने एका क्रियेला प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया दिली , अज्ञानवश. "

"माते आपण सर्वजण कर्मबद्ध असताना आणि कर्मफलाच्या कक्षेतच प्राण्याच आयुष्य फिरत असताना समोर विपरीत फल येत, तेंव्हाही ते आपल्याच पुर्वकर्माच फल आहे हे न जाणता मानवप्राणी त्याला प्रारब्धाच्या तराजुत टाकून आपल उत्तरदायित्व टाळण्याचा यत्न करतो हे किती विरोधाभासी चित्र आहे. कधी कळेल त्याला जे करतोस तेच भोगतोस. म्हणून मला भरताचा राग आला. या सर्व संबंधांच ज्ञान असुन सुद्धा त्याने तुझी निर्भत्सना करावी एका मातेची"

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...