ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास १२
प्रारब्धाचा खूप चुकीचा अर्थ घेऊन बोलतोस सुग्रीवा. प्रारब्ध ही एक प्रकारे कर्मगतिच्या आणि त्यानुसार भोगाव्या लागणाऱ्या फलाची श्रृंखला आहे. ही जीवाला बद्ध करून पुढील प्रत्येक कर्माला प्रव्रुत्त करते आणि ह्या श्रुंखलेच्या चक्रात माणूस एकदा अड़कला की मग तो कर्मरत रहातो. अधिक अधिक बद्ध होत जातो. त्यांमुळे कर्मरहित वा कर्माशिवाय राहण शक्य नसत. तसा कोणताही जीव राहू शकत नाही. अगदी परम ईश्वर सुद्धा या जड़ देही आल्यानन्तर कर्माशिवाय राहु शकत नाही. प्रत्येक जीव एक कर्म त्याच फल आणि त्यानुसार पुढील कर्म यांच्यात बद्ध राहून या पंचतत्वयुक्त देहाच्या स्वाधीन होऊन कार्यरत रहातो. या देहानुसार आलेल्या त्रिगुण युक्त भावावर अवलंबित राहून वा अधीन राहून , प्रत्येक कर्मात गुरफटून त्यातून बाहेर येऊ शकत नाही."
"विश्वास बसणार नाही पण हा खेळ सुरु असताना प्राक्तन , प्रारब्ध आणि परिणाम यांच्या चक्रात मनुष्य मोक्षप्राप्तीच अथवा आत्ममुक्तिच ख़र कर्म कोणत आणि जन्ममृत्युच्या चक्रात बद्ध ठेवणार, बांधणार कर्म यात फरक करू शकत नाही आणि म्हणून अधिक गुंतत जातो. " खुप गहन विषय आहे हा"
परंतु प्रभु या सगळ्यातून प्राणी बाहेरच पडू शकणार नाही , एकदा या चक्राच्या आत गुंतल्यानन्तर " विभीषण म्हणाला
प्रभु वदले " विभिषणा खुप छान. मुळात यासाठी माया क़ाय आणि ती या सर्वात कस कार्य करवून घेते हे जाणून घेण गरजेच आहे. माया ही बुद्धिला आणि मनाला मोहात पाडून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते. पुन्हा इतकं सर्व करून ती स्वतः कुठेही न अडकता तटस्थ राहून कार्यरत राहाते , हेच मोठ गूढ आहे आणि हे गहन ज्ञान अनेक मार्गानी, अनेक प्रकारे आणि अनेक माध्यमाद्वारे ब्रम्हदेव, ऋषी, मुनि, गुरु, व इतर अनेक मुमुक्षुतानी धर्मग्रंथ, वेद , पुराण, या सर्वातून सांगितलं आहे. स्वतः भगवान विष्णुनी व कैलासेश्वर देवाधिदेव व मला गुरुस्थानी असलेल्या महादेवानी सुद्धा आपल्या अनेक लिलांमधुन दाखवून दिल आहे. या मायेचा पसारा म्हणजेच विस्तार आणि आवाका अनंत असून ती विश्वव्यापक आहे. त्याबद्दल खुप महत्वाच गुह्य म्हणजे ही भगवंतांच्या आधीन असते. म्हणून एकप्रकारे जिवाला भगवंतांपर्यंत पोहोचू न देण्याच कार्य अहोरात्र ,न थकता करत असते"
" ज्येष्ठ भ्राता मुळात माया क़ाय हे आधी समजावून सांगावे, तरच आपल्या कथानाचा उचित अर्थ आमच्या सर्वांच्याच अकलनास येईल." लक्ष्मण विचारता झाला
माया म्हणजे परमपिता परमईश्वराची छाया. ही बुद्धिला चक्रव्युहात टाकते आणि मनाला षट्रिपूंच्या स्वाधीन करून मोहात रममाण करते. प्राणी विशेषतः मनुष्य हा यात गुरफटून कर्मफलाच्या जाळयात अडकत जातो. मुख्य म्हणजे मायेच्या प्रभावाने मनुष्य ज्या कारणासाठी या जड़देहात आला तेच मुख्य कार्य म्हणजे मोक्षप्राप्तीचे तेच विसरून जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवून घेतो. "
हा विषय खुप विस्ताराचा आहे आणि शीघ्र अयोध्या नगरी जवळ आपण येत आहोत म्हणून हा विषय पुन्हा विषय विस्ताराने ग्रहण करूया.
विभीषण आणि सुग्रीव " प्रभु आपण जे कथन केलय त्याने विषयाची उत्सुकता वाढली आहे आणि याचे सखोल विवेचन आपल्याकडून ऐकण्यास मन उतावीळ आहे. "
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment