Skip to main content

जानकी पुनःवनवास १५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १५

त्या अमृतमय समयी जेंव्हा पुष्पक जमिनिकडे झेपावल तेंव्हा काळपुरुषाच्या  मुख़ातून अनायासे शब्द आले

घटिका पळे ती आली अवनी ही तृप्त झाली
ती वेळ अमृताची जुळूनी सामोर आली

वदली धरा ती गगना
मी आज धन्य झाले
पुष्पापरी ती वाहनी
पुष्पकातुनी मिळाले
त्या मूर्त विष्णु लक्ष्मी पाहून धन्य जहाली
ती वेळ अमृताची ........

वेली , नी फूल हर एक
शहारून तृप्त झाले
भाग्यात हे तयांच्या
सायुज्य भाग्य आले
हा योग अमृताचा जुळण्यास ग्रह निघती
ती वेळ अमृताची ........

मोहास मोह झाला
लोभास होय लोभहि
माया स्वये ही अवघी
मोहून दृश्य पाही
पाहून मुक्ति जणू ती काळास प्राप्त झाली
ती वेळ अमृताची .......

पवनावही सूखे तो
मरुतास जन्मही तो
जगणे कशास म्हणती
अर्थास प्राप्त ही तो
अर्थासहित मग ही  कवने जुळून आली
ती वेळ अमृताची .........

भोगुन भोग सारे
अधमीही मुक्त होती
पाहुनिया ही जोड़ी
जनही सुखात्म होती
अवघी ही आज नगरी मग धन्य धन्य झाली
ती वेळ अमृताची .......

भाग्यात माझिया ही
प्रसन्न जणु की  ईश्वर
चिंतामणी स्वयेही
आठवले म्हणुनी अक्षर
कवनास आज माझ्या माँ शारदाहि आली
ती वेळ अमृताची .........

१६व्या भागाच्या भाग्यात अमृतमिलानाचा योग. आयोध्येला प्राप्त झालेला हा अमृतपंचम योग आपणही अनुभवुया पुढील भागात .

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...