Skip to main content

जानकी पुनःवनवास २६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास २६

मातेच्या डोळ्यातील अश्रु पुसत प्रभुनी पदर मातेच्या डोक्यावरुन नीट केला आणि विचारल

" या घटनेची माहिती सर्वाना आहे ना माते "

" हो ,परंतु आता ती बाब खुप मागे गेली, आणि सर्वानीच अनंत यातनांच्या पखाली व्हायल्यात या चौदा वर्षात. ख़र तर मीच या सर्व घटनांना आणि त्यानंतरच्या सर्व , सर्व परिणामाना जबाबदार आहे याची पूर्ण कल्पना आहे मला रामा"

"माते जे झालय तो एक भूतकाळ होता आणि त्याचहि यथायोग्य प्रायश्चित्त माते तूसुद्धा गेली चौदा वर्ष, एकाकीपणाच आयुष्य जगुन , क्षणोक्षणी जळत, क्षणोक्षणी मरत, मृत्युहुनही भयंकर जीवन जगत. तरीही एका गोष्टीची बोचणी आयुष्यभर मला राहिलं"

"कोणती गोष्ट रामा "

आपल्या इच्छेची पुसटशी जरी कल्पना आपण मला दिली असतीस तर मी स्वेछेने माझ्या प्रिय भरतासाठी राज्य त्याग करून राज्य भरताच्या स्वाधीन केल नसात. आणि मला खात्री आहे की, भरताने कुशल प्रशासन कार्य केले असते. आपण हा त्रास करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. मग पुढीलघटनां वाचल्या असत्या. आणि आपल्याला सर्व भोगातून वाचवता आल असत."

"ते तर उत्तरदायित्व होत आणि आहे माझ,  घडलेल्या घटनेची एकमेव कर्तिकरवती म्हणून. ते भोगण कर्तव्यच होत आणि आजही वाटतंय की मला मिळालेली शिक्षा ही माझ्या हातून घडलेल्या प्रमादापेक्षा अत्यंत कमी आहे. अतः मला भरताने दिलेल्या शिक्षेपेक्षा अजून कठोर दंड भोगण क्रमप्राप्त आहे. म्हणून तू सुद्धा भरताला दोषारोप करू  नयेस हिच माझी इच्छा आहे."

माते अत्यंत प्रिय अश्या तुझ्या हातून चुकीची गोष्ट होऊ शकत नाही. एकाअर्थी तू एक जगतकार्य केल आहेस काऱण तू अशी मागणी केली नसतीस तर मी वनात जातोच ना आणि मग पुढच्या सर्व घटना न घडता रावण वध असंभव होता माते. त्यांमुळे तू स्वतःला दोषारोप न करता एक उच्च कोटिच कार्य सम्पन्न केल आहेस. इतकच नव्हे तर या रामाला तू आजन्म ऋणी केल आहेस. तुझ्यामुळेच हे महत्तम कार्य होऊ शकले. "

" तरीही मला अस वाटत की तू भरताला याचा जाब विचारु नयेस"

" नाही माते पण भरताला त्याची चूक समजावून सांगण गरजेच आहे. म्हणून मी त्याला पाचारण करतो"

अस म्हणून राम सेविकेला बोलावून सांगतो की,

" महाला बाहेर आमचे प्रतिहारी प्रतिक्षेत असतील त्याना जाऊन सांगून  भरताला इथे येण्यास सांगाव"

सेविका जशी आज्ञा अस म्हणून निघून जाते.

इकडे त्याचवेळी कौसल्येच्या महालात माता कौसल्या, माता सुमित्रा आणि देवी सीता यांचा वार्तालाप चालू आहे आणि देवी सीता त्याना चौदा वर्षातील सर्व घटनाक्रम सांगत आहेत. दोन्ही माता सीतेचे कथन ऐकुन, आश्चर्य युक्त आणि स्तिमित झालेल्या आहेत.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...