ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ३०
भरत एक एक पाउल हळू हळू चालत महालाकडे मार्गक्रमणा करत होता. जणू प्रत्येक पावलागणिक चौदा वर्षापुर्वी घडलेल्या घटनेचा प्रत्येक क्षण त्याला मागे खेचत होता, आणि भरत जड़ पावलानी महालाच्या दिशेने अग्रेसर होत होता. प्रत्येक क्षण आणि पाऊल त्याला साद घालत होत , त्या घायाळ करणाऱ्या क्षणाची, त्या घटनेची सय त्याचा वेध घेत होती. त्याला माघारी परतायला भाग पाडत होती.
त्याचाच प्रिय ज्येष्ठ भ्राता ज्याला त्याच घटनेने चौदा वर्षान्चा वनवास घडला होता, तोच त्याला त्याच ठिकाणी बोलावत होता ज्या ठिकाणी कधीही न येण्याचा त्याने निश्चय केलाहोता. आणि ही चौदा वर्ष कैकईने यांच् साठी मागितली होती की , प्रचलित प्रथेनुसार जऱ एखादी व्यक्ति राज्यापासून चौदा वर्षे दूर राहिली तर ती व्यक्ति राज्य करण्यास , पदभार घेण्यास अपात्र समजला जात असे. नव्हे अपात्र ठरत असे. म्हणजे किती विचारपूर्वक कलेला कावा होता तो. सर्व आठवल तरी मस्तकात शूळ उठत होता.
हळू हळू भरत महालाच्या दिशेने पुढे जात होता आणि तस तस माता कैकईच्या हॄदयात धड़धड़ वाढत होती. तिलाही चौदा वर्षानपुर्वी घड़लेला प्रसंग आणि त्याअनुशंगाने भरताने ,प्रत्यक्ष पुत्राने , सुनावलेले बोल आठवले. माता कैकई मंचकावरुन उतरुन महालात येरझाऱ्या घालत होती. आणि चिंताग्रस्त अवस्थेत हाताने अंगावरल्या शेल्याबरोबर चाळा करत होती. प्रभुना मातेची ही चिंता समजली. ते म्हणाले
"माते व्यर्थ चिंता करू नकोस .माझ्या भरतावार माझा पूर्ण विश्वास आहे."
प्रत्यक्ष जन्मदात्या मातेला हे वाक्य ऐकवायला हॄदय आणि त्या हॄदयातील बन्धुप्रेम फक्त रामाचच असाव लागत. माता यावर काही न बोलता फक्त उसन हसली. प्रभुना समजल की एवढ्याने मातेच समाधान झालेल नाहीये. त्यानी मातेला दोन्ही हातानी धरुन मंचकावर बसायला भाग पाडल. कैकई दासी निरोप घेऊन येण्याची वाट पहात होती. आता प्रत्यक्ष रामाने आग्रहाने बसवल्यामुळे कैकईचा निरुपाय झाला. कारण बसल क़ाय वा उभ राहिलं क़ाय चिंता त्याने कमी होणार नव्हती.
भरताला आता एक एक पाऊल जड़ झाल होत. राग मोठा म्हणून तो धरुन ठेवावा की बन्धुप्रेम श्रेष्ठ म्हणून तो राग सोडून द्यावा अश्या विचित्र कात्रीत भरत सापडला होता आणि हतोत्साहित झाला होता. घडलेल विसराव म्हटल तर अशक्य होत. बन्धुआज्ञा मोडावी म्हटल तर तेही अशक्य. कस कराव हाच पेच पडला होता. इकडे आड़ आणि तिकडे विहिर. व्रुथा अभिमान म्हणावा तर व्रुथा नव्हता कारणसुद्धा तसच सबळ होत. बर महालात प्रभुनी बोलावलय म्हणजे नकार देण्याचा वा न जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. म्हणूनच भरत चालत होता आपसुक ओढला जात होता. बन्धुप्रेमाच्या ताक़दीपुढे अभिमान तोसुद्धा इतक्या वर्षान्चा हळू हळू गळून पडत होता , आणि हे महालात प्रभुना जाणवत होत. भरताचे अभिमान , राग यांचे पदर सुटुन येताना आणि भरताच मन बेचैन होत आहे हे प्रभुना कळत होत किंबहुना प्रभुना भरत जसा यायला हवा होता तसाच तो हळू हळू घडून येत होता, एक एक पाऊल टाकता टाकता.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment