Skip to main content

जानकी पुनःवनवास ३७

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३७

" मी प्रभुंचा दास आहे आणि भक्त ,भगवंत ह्या संज्ञा आणि अर्थ जाणत नाही. फक्त पभु प्रेमाचा भुकेला असलेला मी, जन्मापासुन फक्त ज्यांच्या दर्शानाची आस धरून होतो आणि अंतरात ज्यांच्या नामाचा ध्यास होता ते साक्षात यांची जन्मी , याची देही, याची डोळा पाहू शकलो. इतकंच नव्हे तर त्यानी प्रेमपूर्वक माझा स्वीकार केला आणि चरणांपाशी स्थान दिल.

अनेक जन्मांची , नव्हे युगायुगांची पूर्वपुण्याई, माता पित्यांचा आशीर्वाद आणि साधु सज्जनांची सादिच्छा या बळावर जे प्राप्त व्हाव अस शास्त्रात आणि वेदात लिहिलय आणि पूर्वजानी जे सांगितलय ते प्राप्त होण्याच सद्भाग्य मला यांच जन्मी लाभल ही फक्त आणि फक्त प्रभुंचीच असीम कृपा आहे. अन्यथा मी इतक्या पात्रतेचा नाही, अस माझ प्रामाणिक आणि आत्मिक मत आहे.

मी सम्पूर्ण विश्वात, नव्हे ब्रम्हांडात, एक गोष्ट जाणतो आणि पाहतो, ती म्हणजे फक्त प्रभु श्रीराम यांचे चरणकमल. या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी दिसत नाहीत, ना ऐकू येत. आपण खरोखर भाग्यवान आहात, की आपल्याला प्रभु ज्येष्ठ भ्राता म्हणून लाभले आणि त्यांचा सहवास अखंड जन्मापासुन लाभला. नव्हे आपण त्यांचे सर्वात प्रिय भ्राता आणि हॄदयात सर्वात उच्च स्थानी आहात.

प्रभुंशी माझी भेट घडल्यापासून , एक क्षण सुद्धा असा गेला नाही की , त्याना तुमची आठवण आली नाही. इतके व्याकूळ असत ते तुमच्या भेटीसाठी, जसा भक्त भगवंतांच्या भेटिसाठी असतो."

इथे भरताच्या मुखावर स्वतःच्या लोचनातून येणाऱ्या अश्रून्चा महापुर सुरु झाला होता.  हनुमंत पुढे सांगतात

"किंबहुना आपण इथे विवंचनेत आहात हेच अखंड त्यांच्यां स्मरणात आणि चित्तात असायच.  प्रभु आणि माता जानकी फक्त आपली आणि माता कैकई यांच्याविषयीच जाणून घेण्यास व्याकूळ असत. आपल्या अनेकों जन्माच पुण्य आहे किंवा आपणही पूर्णरूप त्यांचेच अंश आहात , हाच भास सतत आहे. "

" त्रैलोक्याचे स्वामी माझ नाव घेतात त्यावेळी प्रत्येक वेळी अंगावर रोमांच उभे राहतात, आणि सद्भाग्याची परिसीमा की त्यांच्यां काहीतरी उपयोगास आलो. धन्य हा जन्म अशीच अखंड भावना या मनात आहे. इतकच फक्त माझ योगदान त्यांच्यां कार्यात. अन्यथा ते पूर्णपणे सक्षम आहेत एका संकल्पात सर्व नष्ट आणि निर्माण करण्यात. त्याना कोणत्याही सहकार्याची गरज नाही, हे मी जाणून आहे. प्रभुंबद्दल बोलण्यात हाच नव्हे तर अनेक जन्म आणि अनेक युगे जरी लोटली तरीही मी त्याविषयी न थकता बोलू शकेन आणि तरीही त्यांची महती समाप्त होणार नाही."

हनुमंताच हे आत्मकथन भरत सदगतित अन्तःकरणाने ऐकतोय, आणि हनुमंताला पुढे म्हणतो की

"हनुमंता ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या विषयी अजून एकण्याची इच्छा तू जागृत केलीस. तेंव्हा पुढे कथन कर, कारण तुझ्या निवेदनाने या कानांची , जीवाची आणि आत्म्याची भूक जागृत झाली आणि अतृप्ति सुद्धा. तेंव्हा अजून प्रकट हो अन्तराम्यातून. "

हनुमंत किंचित स्मित करून वदते झाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...