Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

अध्यात्म विराम १७१

अध्यात्म विराम १७१    नामाच्या महतीसाठी कित्येक उदाहरणं देता येतील. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद, देवर्षी नारद, महर्षी वाल्मिकी, भक्त सूरदास, संत कबीर, संत मीराबाई, महाराष्ट्रातील महान संत परंपरा, विभिषण इत्यादी अनेकानेक दाखले देता येतील. यांनी फक्त ईश्वर नामाच्या स्मरणात आपल्या देहासह आत्म्याचा उद्धार करवून घेतला. पण या सर्वांचं एक समान सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे देहाच्या, संचिताच्या आणि प्रारब्धात आलेल्या कोणत्याही भोगाला, त्यांनी अव्हेरलं नाही. आलेल्या भोगात त्यांनी कधीही सूट, कपात वा पळवाट मागितली नाही. त्यांनी प्रपंचातील अनेक अकल्पनीय व अपरिमित दुःख, भोग सहन करताना, कोणतीही पक्रार केली नाही. किंबहुना आपल्या दुःखाच्या भोगाच्या अस्तित्वामुळे आपल्याला ईश्वरी नामाच्या साधनेचं स्मरण होतं आणि आपण त्या दुःख भोग यांमुळे हे ईश्वरी स्मरण अखंड करू शकतो,याची जाणीव त्यांच्या मनात नित्य  असायची. किंबहुना ते दुःख हाच आपल्या साधनेचा प्राण आहे, हीच त्यांची नित्य भावना होती. महाभारतात आपण जाणतो की, कुंती मातेने, श्री कृष्णाकडे अपार दुःख आणि भोग मागितले. कारण त्याच काळात, या दुःख व भोग यांम...

वर्षा

आषाढात तो रोरावत आला काळया मेघांचा  थवा आला सूर्य नारायण लुप्त झाले गर्द अंधार दिवसाही दाटला टपोऱ्या थेंबांनी ओलावलं  अंग भिजून शहारलं धरेला  आकाशाच्या प्रेमवर्षावाने  अवघा निसर्ग रोमांचित झाला थेंबाथेंबातून वर्षा ऋतुचा बहर जणू ओतप्रोत भरला पाना पानावर ओलाव्याचा हिरवा रंग चौफेर पसरला निसर्गाच्या सुंदर खेळाचा आषाढात प्रारंभ झाला  आषाढात प्रारंभ झाला ©® कवी : प्रसन्न आठवले ३०/०४/२०२३

अध्यात्म विराम १७०

अध्यात्म विराम १७०   प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, यांच्या अवताराआधी पासून, कैलास पती भगवान शंकर, हे नित्य, अविरत,ध्यान आणि जागृत अवस्थेत कोणतं नाम जप करतात, असा प्रश्न, एकदा, माता पार्वतीने भगवान शंकरांना केला. या प्रश्नाने अती प्रसन्न होऊन, त्यावर उत्तर देताना,  राम जन्माच्या युगानु युगे आधीच, भगवंतांनी मातेला उत्तर दिलं की, ते श्रीराम नामाचा जप अविरत आणि अखंड करतात. म्हणजेच श्रीराम जन्म ही एक औपचारिकता होती. पण त्यांचं नाम हे त्याही आधीपासून होतं आणि त्यानंतरही, युगांता पर्यंत ते असणार. याचाच अर्थ सगुण रूप व देहातील अस्तित्व हे क्षणमात्र आहे आणि असणार.  कारण विश्वाच्या करोडो वर्षांच्या परिघात, आपल्या देहातील अस्तित्वाची काही वर्षे, हे नगण्य समीकरण आहे. पण ईश्वराच्या सगुण रुपातील नामाचं अस्तित्व अखंड आणि अनंत काळापर्यंत असणार आहे. आता ईश्वराच्या राम अवतारा आधीपासून जर श्री शंकर, त्या नामाच्याच प्रभावाने आपलं तेज, ओज आणि शक्ती सुद्धा आहे,असं दृढ अभिमानाने,माता पार्वतीस सांगतात. याचं एक अर्थ असा होतो की, अगदी अवतार होऊन, प्रत्यक्ष प्रभू कार्य आणि त्याची देहातील प्रभा, या भूलोक...

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा होऊ नको अवकृपा ठेव हात मस्तकी देवा राहो सदा श्रद्धा माझी तुझिया वरी दयाळा  मी दुःखी न करावे कोणा इतकेच दान दे मज देवा मन बुद्धी अन हा देह विवेकाने करो कर्म देवा तुज नित्य स्मरून करणे जमुदे, मज प्रपंच हा माझा अभिमान अन् अहं हा मानीन शत्रू सदासर्वदा कल्पून तुज सखा मी सांगेन सर्व भाव देवा घडूदे नामस्मरण तुझेच इतुके करवून घे देवा मानून मज तुझा दास चरणी राहूदे मज देवा उन्ह पावसात राहूदे हात माथ्यावरी देवा स्मरणात तुझ्याच जगणे स्मरणात श्वास श्वास जावा  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा ©® कवी : प्रसन्न आठवले २९/०४/२०२३ 9049353809 9960762179

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा होऊ नको अवकृपा ठेव हात मस्तकी देवा राहो सदा श्रद्धा माझी तुझिया वरी दयाळा  मी दुःखी न करावे कोणा इतकेच दान दे मज देवा मन बुद्धी अन हा देह विवेकाने करो कर्म देवा तुज नित्य स्मरून करणे जमुदे, मज प्रपंच हा माझा अभिमान अन् अहं हा मानीन शत्रू सदासर्वदा कल्पून तुज सखा मी सांगेन सर्व भाव देवा घडूदे नामस्मरण तुझेच इतुके करवून घे देवा मानून मज तुझा दास चरणी राहूदे मज देवा उन्ह पावसात राहूदे हात माथ्यावरी देवा स्मरणात तुझ्याच जगणे स्मरणात श्वास श्वास जावा  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा ©® कवी : प्रसन्न आठवले २९/०४/२०२३ 9049353809 9960762179

अध्यात्म विराम १६९

अध्यात्म विराम १६९ नाम हे मुळात हळूहळू मनात झिरपत जातं. नाम हे ठिबक सिंचन या नैसर्गिक प्रकारातील आहे. ते सतत आणि शांत चित्ताने घेत गेल्यास, अत्यंत सावकाशपणे ते मनातील सर्व कप्प्यात प्रवेश करतं. त्याच्या परिणाम रूपाने, मनातील अनेक नकारात्मक, विकारी, वासनामय केंद्रे हळूहळू परावर्तित होऊन शांत होतात किंवा सकारा त्मक स्वरूपात बदलतात. मुळात नाम हे मनाला स्थिरता देतं, ज्यामुळे मनाला चिंतनाची सवय लागते. चिंतन हे प्रत्येक व्यक्तीला अत्यंत जरुरीचं आहे. चिंतन माणसाला विचार प्रवृत्त करतं. योग्य चिंतन माणसाला हळूहळू योग्यतेकडे नेते.  एकदा विचारांची सवय स्थिर मनाला लागली की, त्या मनाला चांगलं व वाईट, उत्तम व हीन, योग्य व अयोग्य, काम्य व आवश्यक, वासना व नैसर्गिक गरज या सर्वांचा विचार करायची सवय लावते. त्यायोगे माणूस, प्रत्येक इच्छा मनात उत्पन्न झाल्यावर, ती कृतीत उतरवण्या आधी,त्यावर चिंतन करतो.त्या वासनेची, इच्छेची आवश्यकता किती आहे, खरच आपली ओढ, आकर्षण हे सुयोग्य आहे की आता  याची आवश्यकता नाही. असे अनेक प्रकारचे चिंतनशील विचार मनामध्ये तेंव्हाच येऊ शकतात, ज्यावेळी मन असं चिंतन आणि असे विचा...

अध्यात्म विराम १६८

अध्यात्म विराम १६८ ज्याच्या सततच्या उच्चारणाने भवादी सारे ताप, दैन्य दूर होतं आणि प्राणी जन्मजन्माच्या बंधनातून विमुक्त होतो, त्या उच्चारणाला नाम म्हटल जातं. नाम हे मुळातच निर्गुण आणि निराकार आहे. ते अनादी आणि अनंत आहे. याच्या महतीसाठी आणि ती गाण्यासाठी, ती सांगण्यासाठी कित्येकांनी आपले जन्म वेचले आहेत. याच नामाच्या ध्यानात साक्षात श्रीशंकर निमग्न होऊन, समाधिस्थ स्थितीत हजारो वर्ष सहजी ध्यानात असतात. याचं नामाच्या सामर्थ्याने रावणाचे पापांचे पर्वत जळून, रावण देह समाप्ती पश्चात, वैकुंठाला गेला.  नामात निर्गुण तत्व असल्या कारणाने, नाम घेणाऱ्यांना, त्यांच्या वैचारिक, सांपत्तिक, चित्ताची शुद्धता या कसल्याही गुण अवगुणांना न पाहता, ते नाम उचित लाभ प्राप्त करून देते. नाम निर्गुण निराकार असल्याकारणाने निरपेक्ष असतं. त्यामुळे भावातीत असतं. घेणाऱ्याला त्याच्या देहाच्या, बुद्धीच्या, इंद्रियादी जडतत्वांच्या कोणत्याही मर्यादा वा बंधनं यांचं आवरण न पडता, नाम आपलं सर्व कार्य सुलभतेने पार पाडतं. नाम हे सर्वार्थाने परिपूर्ण तत्व असल्यामुळे, नाम घेणाऱ्याच्या सर्व अपूर्णता, ते नाम पूर्ण करून देतं. ...

अध्यात्म विराम १६७

अध्यात्म विराम १६७ सगुणात असलेली मर्यादा व बंधनं जी या ब्रम्हांडात मायेच्या अस्तित्वाने, सर्वांना लागू पडतात. त्यामुळे आपण सगुण रुपातील ईश्वराला पुजतो त्यावेळी, त्या रुपाला सुद्धा ती लागू पडतात व त्या असलेल्या मर्यादा आपण स्वीकारतो, असाच याचा तात्विक अर्थ काढता येईल.म्हणजे आपल्या भक्तीच,साधनेचं फळ आपल्याला त्याचं स्वरूपात मिळतं, ज्याप्रकारे ते सगुण रूप साकार झालेलं आहे आणि असतं. म्हणजेच त्या प्राप्तीला सुद्धा मर्यादा आणि बंधनं लागू पडतात. त्या बंधनाना मान्य करून आपण ते फलित स्वीकारलं, असांच अर्थ काढता येईल किंवा काढावा लागेल.  उदाहरणार्थ, प्रभू कृपेने, या भौतिक जगतातील, एखादी गोष्ट आपण कांक्षिली किंवा प्रार्थिली आणि आपल्या पुण्याईने ती यदाकदाचित प्राप्त झाली, तरीही ती चिरंतन असू शकत नाही. स्थल कालाच्या मर्यादा, येथील प्रत्येक गोष्टीसह त्याही गोष्टींना लागू होतात. याचं कारण ती प्राप्ती, त्या विशिष्ट स्थळ, काळ आणि व्यक्तिपरत्वे असते. म्हणजे देहाचं अस्तित्व संपलं की, त्या प्राप्त गोष्टी नाहीश्या होतात किंवा होऊ शकतात. तसं नसत तर अनेक भक्तांना ईश्वराने स्वतः प्रदान केलेलं ऐश्वर्य, चिर...

अध्यात्म विराम १६६

अध्यात्म विराम १६६ सगुण रुपातील ईश्वरी प्रतिमा ही व्यक्ती परत्वे भिन्न असते आणि असणार. यात दोन गोष्टी प्रामुख्याने म्हणता येईल. एक म्हणजे प्रत्येकाची आवड, ज्याच्या त्याच्या संचित, पुण्यफळ आणि कर्णगती यानुसार, जसे विचार कल्पना येतील, त्याप्रमाणे ठरतं किंवा ठरतं असावं,असच म्हणावं लागेल. दुसरं म्हणजे आपल्या मनाच्या कल्पना शक्तीला जे शक्य आहे,तेच आपल्याला सगुणात दिसू आणि प्राप्त होऊ शकतं. याचं कारण म्हणजे, कुणाला, श्रीकृष्ण रूप, कुणाला श्रीराम रूप किंवा कुणाला अन्य काही रुपातील, स्वरूप भावतं.रुपातील स्वरूप यासाठी म्हटलं की, बाह्यांगी भिन्न रुपात दिसणारं, प्रकट झालेला ईश्वर, अंतरंगी अनेक रुपात एकच आहे. किंबहुना, आपण कोणत्याही नामाने, रूपाने भजत, पुजत असलेला ईश्वर हा तत्वतः आणि मूलतः, एकच आहे.  हे सर्व खरतर अनेकदा अनेकांनी सांगितलं आहेच. पण मग आपण सगुण ईश्वराच्या रुपाला का पुजतो, हा एक प्रश्न निर्माण होतो. पण याचं उत्तर सुद्धा अनेक संतांनी आपल्या कार्यातून, भक्तीतून सांगून ठेवलेलं आहे. हा एकतर मायेचा प्रभाव आहे आणि देहाच्या मर्यादांच तत्व इथे लागू पडत.  फक्त आपल्यात आणि त्यांच्यात भ...

अध्यात्म विराम १६६

अध्यात्म विराम १६६ सगुण रुपातील ईश्वरी प्रतिमा ही व्यक्ती परत्वे भिन्न असते आणि असणार. यात दोन गोष्टी प्रामुख्याने म्हणता येईल. एक म्हणजे प्रत्येकाची आवड, ज्याच्या त्याच्या संचित, पुण्यफळ आणि कर्णगती यानुसार, जसे विचार कल्पना येतील, त्याप्रमाणे ठरतं किंवा ठरतं असावं,असच म्हणावं लागेल. दुसरं म्हणजे आपल्या मनाच्या कल्पना शक्तीला जे शक्य आहे,तेच आपल्याला सगुणात दिसू आणि प्राप्त होऊ शकतं. याचं कारण म्हणजे, कुणाला, श्रीकृष्ण रूप, कुणाला श्रीराम रूप किंवा कुणाला अन्य काही रुपातील, स्वरूप भावतं.रुपातील स्वरूप यासाठी म्हटलं की, बाह्यांगी भिन्न रुपात दिसणारं, प्रकट झालेला ईश्वर, अंतरंगी अनेक रुपात एकच आहे. किंबहुना, आपण कोणत्याही नामाने, रूपाने भजत, पुजत असलेला ईश्वर हा तत्वतः आणि मूलतः, एकच आहे.  हे सर्व खरतर अनेकदा अनेकांनी सांगितलं आहेच. पण मग आपण सगुण ईश्वराच्या रुपाला का पुजतो, हा एक प्रश्न निर्माण होतो. पण याचं उत्तर सुद्धा अनेक संतांनी आपल्या कार्यातून, भक्तीतून सांगून ठेवलेलं आहे. हा एकतर मायेचा प्रभाव आहे आणि देहाच्या मर्यादांच तत्व इथे लागू पडत.  फक्त आपल्यात आणि त्यांच्यात भ...

अध्यात्म विराम १६५

अध्यात्म विराम १६५  प्रपंच आणि परमार्थ यावरील आपलं चिंतन पुढे नेताना एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते, ती म्हणजे, विश्व निर्माता, संपूर्ण जगताचा प्रपंच करतो आहे आणि आपण अर्थात मानवाने,मी पणाचा प्रपंच सोडून आत्मतत्वाचा प्रपंच अर्थात परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वास्तवात या उलट आपण करतो. आपण आयुष्यभर देह म्हणजे मी हे गृहीत धरून, त्या भोवती सर्व काही बांधतो, रचतो किंवा निर्माण करतो. पण हे सर्व मायेच्या प्रभावाने घडतं. मायेच्या अधिपत्याखाली, जे समोर आहे, तेच सत्य मानायची सवय, समजायला लागल्यापासून आपल्याला लागते किंवा लावली जाते. आत्मतत्त्व हे एक चिरंतन सत्य आहे आणि तेच या विश्वाचा खरा आधार आहे. किंबहुना हे तत्वच, या संपूर्ण जगाचा मूलाधार आहे. याच तत्वाच्या शक्तीला, ऊर्जेला, गतीला आणि बलाला प्राप्त करण्यासाठी किंवा जागृत करण्यासाठी, निज तत्वाला बाजूला सारून, खरा मी ओळखण्याची आवश्यकता आहे. हेच अनेक संत, महंत, ज्ञानी, सत्पुरुष यांनी आपल्या जीवनातून जगाला सांगितलं आणि दाखवून दिलं आहे. यासाठी काही साधे सोपे नियम त्यांनी मानवाला घालून दिले आहेत. ज्यांचं पालन केल्यास, आत्महित साधलं ...

अध्यात्म विराम १६४

अध्यात्म विराम १६४   प्रापंचिक व पारमार्थिक असा भेद खरतर करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण, मुळात विधात्याने माणूस घडवताना आणि आत्मांश त्यात स्थपित करून, मनाची व्यवस्था करताना, हा प्राणी संसार, प्रपंच करेल किंवा प्रपंचातून हा परमार्थाकडे वळवावा लागेल अशी काही योजना डोक्यात ठेवली नसावी. पण मायेचा फेरा आणि त्यायोगे शत्रूंचा घेरा यामधे माणूस अनेक प्रकारचे प्रयोग, उद्योग, करणार. त्यामधे प्रपंच हा एक उद्योग असणार, याची पूर्ण कल्पना, विधात्याला होती. मुख्य म्हणजे प्रपंच हा फक्त विवाहादी करून, केलेला प्रपंच असा संकुचित अर्थ, इथे अभिप्रेत नाही.  तर मठादी व्याप वाढवून सन्यस्त माणूस सुद्धा अनेक व्याप ओढवून घेणार, हे विधाता जाणून होता. म्हणूनच अनेक प्रकारच्या व्यापात मग्न, मानवाला, त्या त्या क्षेत्रातून, व्यापातून सोयीस्कर व सुलभ अशी ईश्वरा समीप जाण्याची सोय व त्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा मिळत राहण्यासाठी, नवविधा भक्ती मार्ग योजून, त्या पैकी एकाचा तरी अवलंब करून, माणूस ईश्वराच्या वाटेवर काहीतरी प्रगती करू शकेल, हा त्यामागे उद्देश होता.  प्रपंच आणि परमार्थ याचा व्यापक अर्थ अस...

अध्यात्म विराम १६३

अध्यात्म विराम १६३    काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, मायेच्या, वासनेच्या, इच्छांच्या खेळाच्या आधीन राहून केलेल्या कर्मात, एक फल तात्पुरतं प्राप्त होतं किंवा चाखायला मिळतं. पण दुसरं फल हे या कर्माचा खरा परिणाम स्वरूप, नंतर प्राप्त होतं,ते आपलं खरं संचित असतं किंवा आहे.उदाहरणार्थ, जर आपण योग्य त्या वयामध्ये आपला आहार, विहार व व्यायाम यावर नीट लक्ष ठेवून कार्य केलं नाही,तर तात्पुरता आनंद, त्या वयात, सुख, चैन, खाण्यापिण्याची मौज इत्यादी रुपात आणि माध्यमातून, नक्कीच प्राप्त होईल. पण नंतरच्या वयात याचा परिणाम, मधुमेह, शारीरिक कमजोरी, अवयवांची शिथिलता, हालचालीत जाणवणारं वय आणि इतर अनेक व्याधी, हे खरं कर्मफल असेल. म्हणजेच बहुतेक प्रकारच्या तात्पुरता, क्षणिक आनंद आणि सुख देणाऱ्या क्षणांच्या मागे पुढे, अनेक भोग हे मुख्य कर्मफल रुपात येतात आणि ते आपणच लिहिलेले असतात,हे तर आता लक्षात आलं असेल.म्हणजे मायेच्या आधीन राहून,केलेल्या कर्मातून अंतिम भोग प्राप्त होतात याचाच दुसरा अर्थ असा की, मायेच्या आधीन राहून, कर्म करताना आज प्राप्त होणारे उपभोग, नंतरच्या कायम स्वरूपी किंवा दुःखात्मक, नकारात्मक भ...

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हाभाग २

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा भाग २ ©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले पाहिलं कडवं रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा   गीत : म पां भावे संगीत : अनिल अरुण स्वर : आशाताई विषयाला सुरुवात करण्याआधी, कालचा पहिल्या भाग पोस्ट केल्यानंतर, एक वाचक श्री बालमुकुंद पतकी, यांनी त्वरित लिहिलं की, त्यांच्याकडे, कविवर्य, खुद्द म पां भावे यांच्या हस्ताक्षरातील हेच गीत आहे आणि माझ्या विनंती नुसार,त्यांनी ते त्वरित मला पाठवलं.तेच गीत या लेखाच्या कमेंट मधे मी पोस्ट केलं आहे. आता पहिल्या कडव्याच विश्लेषण.   मुळात अश्या कल्पनेच्या प्रेमातील सागरात आकंठ बुडालेली आणि कल्पनेतील स्वप्न आणि वास्तवातील विरही दाहकता, या अपूर्णतेच्या सीमेवर असणारी, एखादी अल्लड प्रेयसी, त्या प्रकट करता न आलेल्या किंवा प्रकट होऊन अपूर्ण राहिलेल्या वा प्रकट करण्यास पुरेसं अवसान न मिळालेल्या, प्रेमाच्या पतंगाच्या अत्यंत नाजूक दोरीवर बसलेली असते.अर्थातच तिचं मन, आपल्या प्रेमाची, प्रियक...

अध्यात्म विराम १६२

अध्यात्म विराम १६२   आपली कर्मगती ही येणाऱ्या फलानुसर होते की आपल्या कर्मानुसार फलप्राप्ती घडते, हा एक प्रश्न आहे. जो एक गहन प्रश्न आहे. याचा जरा विचार करूया. आत्मा जेंव्हा अनंताकडून या ब्रम्हांडात येतो, त्यावेळी त्याला मायेच्या आधीन होऊनच गर्भवास घ्यावा लागतो. कारण माया ही सर्वथा गैर किंवा योग्य नसते. किंबहुना ती देह, बुद्धी व मन यांच्यात सर्व प्रकारच्या कामना, वासना, इच्छा जागृत करते. त्याला फलाषा म्हणता येईल. म्हणजे अमक्या प्रकारच्या फळाची इच्छा किंवा आशा निर्माण करून देणं, हे मायेचं काम. त्यानुसार प्रेरणा घेऊन, त्यासाठी अपेक्षित कर्म करणं, हे देह, बुद्धी व मन यांचं कार्य आहे.  मायेच्या सहाय्याने आधी मन उद्दिपित होतं. त्यातून निर्माण होणाऱ्या इच्छा या वासना व कामना यांमध्ये परिवर्तित होतात. जे फलप्राप्त करण्याची इच्छा, वासना मायेने जागृत केली असेल, त्याबद्दलच कर्म घडतं. अर्थात कर्मानुसार फलप्राप्ती हा एक भास असतो, जो क्षणिक सुख व दुःख यांचा लाभ वा हानी घडवून आणतो. पण अंततः जे फल प्राप्त होतं, ते मायेच्या आधीन राहून मानवाने केलेल्या कर्माची परिणती किंवा परिणाम असतो पण ते क...

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा गीत : म पां भावे संगीत : अनिल अरुण स्वर : आशाताई या गाण्याने खरतर मला खूप वर्षांपासून मोहिनी घातली आहे. यातील शब्दांची अवर्णनीय आर्तता, त्याला त्याचं समर्पक चालीत बांधलेलं, मराठीतील अत्यंत बुद्धिमान जोडी अनिल अरुण यांचं संगीत आणि गीताचे, विरह, कधीकाळी केलेली प्रीत आणि त्यायोगे आता आलेला विरही उन्हाळा आपल्या भाव विभोर करणाऱ्या स्वरात बांधणाऱ्या अद्भुत आशाताई. शब्दांची जादू इतकी मनोहारी आणि चित्त आकर्षित करणारी आणि मनाला बांधून ठेवणारी आहे की, अनेक वर्ष, किंबहुना हे विश्लेषण लिहीपर्यंत, हे गीत चि त्र्यं खानोलकर अर्थात आरती प्रभू यांचं आहे, असाच माझा समज होता. पण या विश्लेषणा  साठी माहिती घेताना कळलं की, हे कल्पनातीत शब्द म पां भावे यांचे आहेत. गीतातील विरह आणि त्यातील हळूवार शब्द हे एका विरही स्त्रीचे आहेत, याची जाणीव करून देतात. आयुष्यात एखाद्यावर अमाप प्रेम लुटावं आ...

काकांचा खेळ निराळा रे भाई, काकांचा खेळ निराळा !!

काकांचा खेळ निराळा रे भाई, काकांचा खेळ निराळा !!  काकांनी काहीही न करता मीडियाला हाताशी धरून, कंड्या पीकवून, अजित दादांचा सुरू असलेला खेळ संपवून, त्यांच्याकडे असलेल्या आणि जमा होत असलेल्या किंवा जमा होऊ शकणाऱ्या पाठिंब्याची वाताहत केली आहे. भाजपा समर्थक (कुंपणावरचे), शेणके, राऊत गँग,  कॉगी सह सर्वांना चार दिवस झुल्यावर झुलवून, दादांची उडती पतंग मस्तपैकी कापली आहे. आता दादांना जायचंय असेल तर, दोन पाच खास समर्थक घेऊन, बाहेर पडून, राजीनामा देऊन, पुन्हा निवडून यावं लागेल, किंवा 2024 पर्यंत थांबावं लागेल  यातून दुसरा एक निशाणा साधला तो म्हणजे ताईंच पक्षाध्यक्ष होण्याचं काम सुलभ करून दिलं. शेवटी एक लक्षात घ्या, ते देखील एक वडील आहेत आणि जे बाळासाहेबांनी केलं व करवून घेतलं, त्याप्रमाणे आपली राजकीय वारसदार म्हणून आपली कन्या ताईंची कायम स्वरूपी  सोय लावून दिली आहे.  अब देखो आगे कूछ दिनोमे, काका स्वतःच बाजूला होऊन, ताईना पक्षाध्यक्ष करतील आणि सर्व आमदार पदाधिकारी मुकाट्याने पाठिंबा देतील. दादांना एकतर, पाठींबा द्यावा लागेल किंवा दुसरा राज ठाकरे व्हावं लागेल. आपलं हे साध्य...

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा

गीत विश्लेषण : स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा स्वप्नातल्या कव्व्यांनो उमलू नकाच केव्हा गीत : म पां भावे संगीत : अनिल अरुण स्वर : आशाताई या गाण्याने खरतर मला खूप वर्षांपासून मोहिनी घातली आहे. यातील शब्दांची अवर्णनीय आर्तता, त्याला त्याचं समर्पक चालीत बांधलेलं, मराठीतील अत्यंत बुद्धिमान जोडी अनिल अरुण यांचं संगीत आणि गीताचे, विरह, कधीकाळी केलेली प्रीत आणि त्यायोगे आता आलेला विरही उन्हाळा आपल्या भाव विभोर करणाऱ्या स्वरात बांधणाऱ्या अद्भुत आशाताई. शब्दांची जादू इतकी मनोहारी आणि चित्त आकर्षित करणारी आणि मनाला बांधून ठेवणारी आहे की, अनेक वर्ष, किंबहुना हे विश्लेषण लिहीपर्यंत, हे गीत चि त्र्यं खानोलकर अर्थात आरती प्रभू यांचं आहे, असाच माझा समज होता. पण या विश्लेषणा  साठी माहिती घेताना कळलं की, हे कल्पनातीत शब्द म पां भावे यांचे आहेत. गीतातील विरह आणि त्यातील हळूवार शब्द हे एका विरही स्त्रीचे आहेत, याची जाणीव करून देतात. आयुष्यात एखाद्यावर अमाप प्रेम लुटावं आ...

अध्यात्म विराम १६१

अध्यात्म विराम १६१ भाग क्रमांक १६० वरून पुढे सुरू करूया. मधल्या एक आठवड्याच्या काळात मला बर नसल्यामुळे, लेखन तात्पुरतं बंद ठेवावं लागलं. तरी त्याबद्दल मी वाचकांचा ऋणी आहे. पण महाराज कृपेने ते पुन्हा सुरू करत आहोत.  मुळातच मानवाच्या ठायी आत्मा किंवा अंतरात्मा या रुपात आणि पुन्हा मन या स्वरूपात ईश्वर आहे. गीतेतील सूत्रानुसार मन आणि आत्मा या, ईश्वरी अधिष्ठान प्राप्त गोष्टी आहेत. पण देह व बुद्धी ह्या, या भुलोकी प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या अत्यंत जरुरीच्या आहेत. कारण या दोन गोष्टींशिवाय भुलोक ते परलोक किंवा वैकुठधाम हे अंतर मार्गक्रमण करणं अशक्य आहे. कारण आत्मा कोणत्याही पंचमहाभूतरूप साधनां शिवाय स्वतःच्या स्वतः काहीही करू शकत नाही. तशी ईश्वरी व्यवस्थाच आहे त्यामुळे मोक्ष, मुक्ती या गोष्टी प्राप्त करणं किंबहुना त्यासाठी विचार, साधन कर्म करणं हे देहाशिवाय अशक्य आहे.  पण आत्मा व मन देहात स्थापित झाला की, आत्मा व मन हे, जडदेहामुळे बुद्धी, माया व अनेक प्रकारच्या प्रापंचिक बंधनात अडकून मूळ उद्देशाला पूर्ण विसरून, या जगताचा एक भाग होऊन जातात. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म व मरण ...

अध्यात्म विराम १६०

अध्यात्म विराम १६०   वास्तविक पाहता कर्मगतीच्या फेऱ्यात फिरणारा आत्मा, आपल्या कर्मानुसार त्या त्या देहात जाऊन, कर्मभोग भोगून, पुन्हा पुढच्या देहासाठी निघतो.आता या प्रवासात त्याला, ईश्वरी वासनांची आवड, गोडी तेव्हाच लागू शकते, जर तशी ओढ त्याच्या अंतरातम्यात वसलेली असेल. म्हणजे जर त्याने कधीही आपल्या पूर्वआयुष्यात, अशा प्रकारची भक्ती अर्चना पूजन शरण स्मरण हे केलं असेल तर,त्याचा लाभ निश्चितपणे पुढील एखाद्या जन्मात त्याला प्राप्त होतो.आता हे कसं हे पाहूया. समजा एखाद्या इसमाने कोणते तरी पुण्य कर्म किंवा चांगलं काम केलं आहे आणि ते जाणणारा त्याला पुढील आयुष्यात कधीतरी भेटला तर, तो त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सांगू शकतो की, हा एक चांगला इसम आहे माणूस आहे असं समजा की काही कारणास्तव आपल्या कर्माच्या आधारावर, ती पहिली व्यक्ती कोणत्यातरी समस्येत अडकली आहे आणि त्याचवेळी, हा ओळखणारा इथून इसम तिथून जात आहे. तर तो इसम आजूबाजूच्या व्यक्तींना नक्की सांगू शकतो की, या माणसाला मी ओळखतो. हा खूप सज्जन गृहस्थ आहे. कदाचित परिस्थितीवश, तो आज चुकीचं वागत असेल. पण मी त्याला चांगला ओळखतो. त्यामुळे त्याला सो...

मुठ वळण्यातील व्यथा !!

मुठ वळण्यातील व्यथा !!  गेल्या काही दिवसात हा शब्द सारखा कानावर येतोय आणि त्यामुळे उगाचच काहीतरी वेगवेगळे अर्थ आणि गैरसमज निर्माण होतात. त्यात सुद्धा इंद्राच्या अस्त्राचा उपयोग करून अशी मूठ तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, हे कदाचित इंद्राला सुद्धा माहीत नसेल. पण देवेंद्राला मात्र माहित आहे आणि अनाथांचा नाथ असलेल्या एकनाथांनाही माहित आहे. आता अशी मूठ वळण्यात आणि ती अजेय अर्थात जिंकण्या योग्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. साधारण दोन एक आठवड्यापूर्वी सुद्धा अशीच एक मूठ वळण्यात आली तेव्हा ती आतूनच सैल करण्यात आली. आतून म्हणजे त्यातील बोटांपैकी एकाने नुसता हलका संदेश दिला त्याबरोबर, इकडची सेना चांदीच्या ओक वृक्षाच्या शीतल छायेत जाऊन आली. असो आता पुन्हा हा एक प्रयत्न बर का. ही मूठ तीन बोटांची, पाच बोटांची की काय, हे देखील हाताला अजून माहित नाहीये.  म्हणजे त्या मुठीत हाताचा सहभाग आहे की नाही की कसं, तेही अजून निश्चित नाही. हातावरच्या घड्याळाचं काही वेगळंच समीकरण चालू आहे आणि अशी मूठ वळली गेल्यानंतर, त्यात धरणार काय तर मशाल. त्यामुळे जोपर्यंत घड्याळ घातलेल्या हाताचा घट्ट ...

अध्यात्म विराम १५९

अध्यात्म विराम १५९ काल आपण वाचलेल्या कथेवर आधी चिंतन करूया आणि त्यानंतर विषय पुढे नेऊया. कालच्या कथेचा मुख्य गाभा होता की, नामाच्या क्षणिक उच्चाराने, त्या गृहस्थाला इतकी पुण्य प्राप्ती होते की, त्याची पापं शिल्लक असूनही, त्याच्या त्या पूण्यायीच्या जोरावर, त्या पुण्याचं मोल चुकेपर्यंत तो गृहस्थ कैलासावर राहील. यातील मुख्य गाभा म्हणजे, हरी नामाने प्राप्त होणारं पुण्य हे, अनेक पापांना बाजूस सारून, इहलोकातून स्वर्गलोकात घेऊन जातं. म्हणजे क्षणिक पुण्याचं जे मोल, माऊलींनी सांगितल आहे, त्याचा हा मतितार्थ आहे आता त्याचा गुह्यार्थ जाणून घेऊ, म्हणजे मुद्दा पूर्ण ध्यानात येईल.  काही क्षण किंवा एक क्षण जरी आपण देवाच्या दारी उभं राहिलो तरी त्यातून चारी मुक्ती साध्य होतात, असं माऊलींनी म्हटलंय. माऊली म्हणजे साक्षात श्रीकृष्ण अवतार. त्यामुळे त्यांचं वचन मिथ्या असूच शकत नाही. पण त्यांना यातून नक्की काय सुचवायचं आहे, याचा आता शोध घेऊया. मुळात देवाचं दार म्हणजे काय, हे पाहू. प्रत्येक हृदयात आत्मा आहे आणि त्यामधे ईश्वराचं अस्तित्व अंशरुपात आहे.या अंशाचा पूर्णावतार करण्याचं कार्य करण्यासाठी देहप्राप्त...

अध्यात्म विराम १५७

अध्यात्म विराम १५७   देहात येताना सोहम जाणणारा आत्मा देहात आल्या पश्चात कोहमच्या नादात जगात हरवून जातो. कधी या जन्मी केलेल्या कधी या जन्मात न केलेल्या कर्मांची फळं भोगता भोगता, संसाराच्या वाटेवर, आयुष्याच्या व वयाच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या अंकात प्रवेश करतो आणि पुढचं चित्र दिसायला लागतं आणि प्रपंचातून निवृत्त झालो म्हणून ईश्वराच्या वाटेवर लागतो. म्हणजे इथे देहाच्या, मनाच्या वासना, कामना शमल्यामुळे, ईश्वराच्या स्मरणाकडे वळतो अश्यातला अजिबात भाग नाही. पण आता देहाची साथ नसल्यामुळे, मनातील काही वासना व कामना आता शमतील याची शाश्वती नसल्याने, सर्व सामान्यतः ईश्वराच्या स्मरण मार्गाकडे वळतो. हे कटू वाटलं तरी निर्विवाद सत्य आहे. फार थोडे असतात, जे फार आधीपासून या मार्गाचा निदान विचार करतात आणि त्यात फार थोडे, प्रत्यक्ष ईश्वरी कर्म करतात. किंवा काही थोडेच असतात, जे खरच मनाने निवृत्त होऊन मग, या मार्गाकडे वळतात. यामध्ये ईश्वरी कृपेची प्रेरणा असतेच यात शंकाच नाही कारण जन्माला येताना ईश्वराने दिलेला टास्क लक्षात राहणं, हे असीम कृपेचं लक्षण आहे. अर्थात यासाठीची तयारी किंवा पार्श्वभूमी मागील काह...

अध्यात्म विराम १५८

अध्यात्म विराम १५८ ईश्वरी वासनांचं योग्यवेळी स्मरण व्हावं, हेच प्रत्येक जिवाचं परम कर्तव्य आणि त्याचा परम धर्म असला पाहिजे. आपलं कसं झालंय की, जत्रेत काही क्षणांसाठी जायचं ठरवून निघतो,काही क्षणात,जत्रेतील वातावरणा ला भुलतो आणि मग जत्रेतच हरवून गेलो. घरी कोणी वाट बघत आहे, हे पूर्ण विसरून गेलो. अशी परिस्थिती झाली आहे. यातसुद्धा काहीजण आहेत ज्यांना वेळेचं भान असतं आणि ते जत्रेत हरवून न जाता, योग्यवेळी स्वगृही जातात. त्यांना असे हरवलेले, मार्ग भ्रष्ट झालेले, मूळ आत्म स्व गमावलेले जन पाहून, खिन्नता, दुःख आणि औदासिन्य येतं.  कदाचित आपण ज्याप्रकारे वेळेत सावरलो, त्याप्रमाणे इतरांनी सावरून, आपल्या मूळ ईश्वराच्या मार्गाकडे जायला सुरुवात करावी आणि या जगाच्या जत्रेतील भूलभुलैयाला भुलून, मार्ग विसरू नये, यासाठी ते मार्ग दर्शन करतात, योग्य उपदेश देतात. अश्या लोकांना ईश्वरी मार्ग सापडलेला असतो. अशा सर्वांना भटकलेले जन पाहून, अपार दुःख आणि दया येते. म्हणून असेच संत महंत योग्य मार्गदर्शन करतात. त्यांच्यामधील अग्रणी असलेले संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी म्हटलंय, देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक...

अध्यात्म विराम १५६

अध्यात्म विराम १५६ वासनांचं विश्व हे मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं असतं. त्यातून जी वासना, कामना मनाच्या पृष्ठभागावर येईल, ती आपला हेतू साध्य करण्यासाठी, पूर्ण क्षमतेने, देह, काया, वाचा व बुद्धी या चारही साधनाना कार्याला लावते. साध्य करणे हे मनाचं ध्येय असत व त्यासाठी आपल्या हातात असलेल्या सर्व साधनांची आणि प्रयत्नांची परा काष्ठा करायला चारही साधनांचा मुक्त वापर मन करतं. यात मनाला प्राप्त होतं ते समाधान, आनंद. हे समाधान आणि आनंद अनेक प्रकारचे असतात किंवा असू शकतात. यामधे प्राप्त समाधान व आनंद हा वासनांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे.  म्हणजे वासना ही नैसर्गिक आणि नियंत्रित असेल, तर प्राप्त समाधान व आनंद हे संयत असतात आणि ते वासनांना शांत केल्यावर,  तृप्त होतात. ही संयत वासना भोगण्याची वृत्ती माणसाच्या कर्मगतीशी निगडित असते. म्हणजे उपभोगांची प्रवृत्ती जास्त असेल तर,त्याव्यक्तीच्या भविष्यात दुःख आणि भोग लिहिलेले आहेत, हे नक्की. कारण अती वासना व कामना या अंती दुःखाला आमंत्रण देतात, हे नक्की. म्हणजे मग आपण दुःख भोगलं की, आपणच विचार करतो की, मी काय पाप केलं होतं. जर संचितात कर्मफल गती खड...

अध्यात्म विराम १५६

अध्यात्म विराम १५६ वासनांचं विश्व हे मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं असतं. त्यातून जी वासना, कामना मनाच्या पृष्ठभागावर येईल, ती आपला हेतू साध्य करण्यासाठी, पूर्ण क्षमतेने, देह, काया, वाचा व बुद्धी या चारही साधनाना कार्याला लावते. साध्य करणे हे मनाचं ध्येय असत व त्यासाठी आपल्या हातात असलेल्या सर्व साधनांची आणि प्रयत्नांची परा काष्ठा करायला चारही साधनांचा मुक्त वापर मन करतं. यात मनाला प्राप्त होतं ते समाधान, आनंद. हे समाधान आणि आनंद अनेक प्रकारचे असतात किंवा असू शकतात. यामधे प्राप्त समाधान व आनंद हा वासनांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे.  म्हणजे वासना ही नैसर्गिक आणि नियंत्रित असेल, तर प्राप्त समाधान व आनंद हे संयत असतात आणि ते वासनांना शांत केल्यावर,  तृप्त होतात. ही संयत वासना भोगण्याची वृत्ती माणसाच्या कर्मगतीशी निगडित असते. म्हणजे उपभोगांची प्रवृत्ती जास्त असेल तर,त्याव्यक्तीच्या भविष्यात दुःख आणि भोग लिहिलेले आहेत, हे नक्की. कारण अती वासना व कामना या अंती दुःखाला आमंत्रण देतात, हे नक्की. म्हणजे मग आपण दुःख भोगलं की, आपणच विचार करतो की, मी काय पाप केलं होतं. जर संचितात कर्मफल गती खड...

अध्यात्म विराम १५७

अध्यात्म विराम १५७   देहात येताना सोहम जाणणारा आत्मा देहात आल्या पश्चात कोहमच्या नादात जगात हरवून जातो. कधी या जन्मी केलेल्या कधी या जन्मात न केलेल्या कर्मांची फळं भोगता भोगता, संसाराच्या वाटेवर, आयुष्याच्या व वयाच्या तिसऱ्या आणि महत्वाच्या अंकात प्रवेश करतो आणि पुढचं चित्र दिसायला लागतं आणि प्रपंचातून निवृत्त झालो म्हणून ईश्वराच्या वाटेवर लागतो. म्हणजे इथे देहाच्या, मनाच्या वासना, कामना शमल्यामुळे, ईश्वराच्या स्मरणाकडे वळतो अश्यातला अजिबात भाग नाही. पण आता देहाची साथ नसल्यामुळे, मनातील काही वासना व कामना आता शमतील याची शाश्वती नसल्याने, सर्व सामान्यतः ईश्वराच्या स्मरण मार्गाकडे वळतो. हे कटू वाटलं तरी निर्विवाद सत्य आहे. फार थोडे असतात, जे फार आधीपासून या मार्गाचा निदान विचार करतात आणि त्यात फार थोडे, प्रत्यक्ष ईश्वरी कर्म करतात. किंवा काही थोडेच असतात, जे खरच मनाने निवृत्त होऊन मग, या मार्गाकडे वळतात. यामध्ये ईश्वरी कृपेची प्रेरणा असतेच यात शंकाच नाही कारण जन्माला येताना ईश्वराने दिलेला टास्क लक्षात राहणं, हे असीम कृपेचं लक्षण आहे. अर्थात यासाठीची तयारी किंवा पार्श्वभूमी मागील काह...

अध्यात्म विराम १५६

अध्यात्म विराम १५६ वासनांचं विश्व हे मनाच्या खोल कप्प्यात दडलेलं असतं. त्यातून जी वासना, कामना मनाच्या पृष्ठभागावर येईल, ती आपला हेतू साध्य करण्यासाठी, पूर्ण क्षमतेने, देह, काया, वाचा व बुद्धी या चारही साधनाना कार्याला लावते. साध्य करणे हे मनाचं ध्येय असत व त्यासाठी आपल्या हातात असलेल्या सर्व साधनांची आणि प्रयत्नांची परा काष्ठा करायला चारही साधनांचा मुक्त वापर मन करतं. यात मनाला प्राप्त होतं ते समाधान, आनंद. हे समाधान आणि आनंद अनेक प्रकारचे असतात किंवा असू शकतात. यामधे प्राप्त समाधान व आनंद हा वासनांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे.  म्हणजे वासना ही नैसर्गिक आणि नियंत्रित असेल, तर प्राप्त समाधान व आनंद हे संयत असतात आणि ते वासनांना शांत केल्यावर,  तृप्त होतात. ही संयत वासना भोगण्याची वृत्ती माणसाच्या कर्मगतीशी निगडित असते. म्हणजे उपभोगांची प्रवृत्ती जास्त असेल तर,त्याव्यक्तीच्या भविष्यात दुःख आणि भोग लिहिलेले आहेत, हे नक्की. कारण अती वासना व कामना या अंती दुःखाला आमंत्रण देतात, हे नक्की. म्हणजे मग आपण दुःख भोगलं की, आपणच विचार करतो की, मी काय पाप केलं होतं. जर संचितात कर्मफल गती खड...

अध्यात्म विराम १५५

अध्यात्म विराम १५५ मृत्युसमयी ही उपरती येऊन आणि पस्तावून काहीही उपयोग नसतो. कारण जे घडायचं ते कर्म घडून गेलेलं असतं. नंतर फक्त मानसिक त्रास आणि मरणांती वेदना, इतकचं हाती उरतं. या सर्वांच्या मागे असते ती देहाची उच्च भावना आणि त्यापोटी घडणारी अनेकानेक कर्म. मुळातच आपण हे जाणतो की, फक्त देह असलेल्यांना कामना करून, त्या पूर्ण करून घेण्याची क्षमता आणि उपलब्धी ईश्वराने साध्य करून दिलेली आहे. एकदा देह सोडला की, आत्मतत्वाला मरणाच्या समयी आलेली जागृती, तीव्र होते. किंबहुना त्याच समयी आत्मा जागृत होतो. कारण आता त्याला हा देह सोडायची वेळ आलेली असते. गर्भात असताना जो सोहम जाणिवेत असतो,ज्ञात असतो तो जन्मापश्चात कोहम् मधे परिवर्तित होतो. हाच कोहम ते सोहम चा प्रवास म्हणजे पारमार्थिक जीवन आणि कोहम मधून कोहम मधेच व्यतीत झालेलं जीवन म्हणजे प्रपंच.हीच जागृती मृत्यू समयी, अनेकांना होते. अनेकांना यासाठी म्हटल की प्रापंचिक आयुष्यात कुठे तरी काही तरी प्रभू नामाचं कर्म, हातून थोडफार जरी झालं असेल, तरच ही जाणीव निदान मृत्यूच्या समयी जागृत होण्याची हरिकृपा घडून येते वा येऊ शकते. पण ज्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त व...

अध्यात्म विराम १५४

अध्यात्म विराम १५४ काल आपण खूप महत्वाचं चिंतन केलं.माझ्या आता पर्यंतच्या लेखनातील सर्वोत्कृष्ट चिंतन, कालच्या भागात घडलं. अर्थातच ही माझ्या सद्गुरूंची माझावर झालेली अनन्य कृपा आहे, हे निर्विवाद. आज त्याच विषयाला पुढे नेऊया. ऋण रुपात देहप्राप्ती ही संकल्पना खरतर पचनी पडणं पहिलं गरजेचं आहे.ते पटल्यावर,सनातन धर्मातील दहन विधीच्या शास्त्रोक्त, वैज्ञानिक आणि पारमार्थिक अश्या तीनही उद्देशांची पूर्तता, या एकाच विधीमध्ये साधण्याचा योग आणि कार्य आपल्या सनातन बुद्धिमान वैज्ञानिक ऋषींच्या बुद्धीची आपल्याला कल्पना येईल. आता या ऋणाची सुरुवात देहात येण्याची इच्छा व परि स्थिती जेंव्हा एकत्र येतात त्याक्षणी सुरू होते.  या ऋणात आत्मा बांधण्याआधी ईश्वर या आत्मतत्वाला काही कार्य करण्याची आज्ञा देऊनच पाठवतो.तुला काही काळासाठी मी निर्माण केलेलं हे घर,भाडेतत्वावर देताना, आपल्यात असा करार असेल की,तिथे गेल्यावर स्व पासून माझ्यापर्यंतचा प्रवास करून, हेच शुद्ध आत्मतत्त्व मला परत आणून द्यायचं. त्याबद्दल तुला मी वैकुंठ वास घडवून, तुझ्या पुण्यायीच्या परताव्या पर्यंत इथे निजानंदी रत राहण्याची व्यवस्था घडवून देई...

अध्यात्म विराम १५३

अध्यात्म विराम १५३ मनाची स्थिती ही प्रपंचात आणि परमार्थात कशी असावी, यावर आपण चिंतन करत आहोत. मुळातच या भूतलावर या देहात, आपण पाहुणे आहोत. म्हणजे हा देह आपला मालकीचा नाही. त्यामुळे आपण त्या त्या भावनेने प्रपंच आणि परमार्थ करावा. हा भेद कसा काय ध्यानात धरायचा, याचा आता विचार करूया. समजा आपण एखादी गोष्ट, वस्तू, वास्तू भाडं देऊन वापरायला घेतली किंवा आणली की, ती स्वतःची नाही, हे कायम ध्यानात ठेवतो. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना, काळजीपूर्वक वापर करतो. कारण काही नुकसान झाल्यास, मूळ मालक आपल्याला त्याची भरपाई करून मागेल. बरेचदा तसा करार सुद्धा करून घेतला जातो, जो साक्षांकित केला जातो.  ज्यामुळे त्या आधाराने, मालक आपल्यावर नुकसान भरपाईसाठी तक्रार व दावा सुद्धा दाखल करू शकतो. कारण त्यावर त्याचा मालकी हक्क असतो. आता देहाच्या बाबत विचार करायचा झाला तर, ती व्यवस्था देवाने निर्माण केली आहे. त्यामुळे त्याबाबत ईश्वरच आपल्याला मालकी सांगू शकतो. पण अशी ईश्वराने कधीही, देहावर, मालकी सांगितल्याची नोंद किंवा घटना नाही. म्हणून माणसाला त्याची किंमत किंवा भेद समजत नाही. आता हा देह निर्माण केला पंचम...