Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८७ (विवाह सोहळा १५)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८७ (विवाहसोहळा १५)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    सावरलेल्या रुक्मिणीने कृष्णाला हळद लावण्याचे कार्य पूर्ण करताच ,सर्वांनी तिला नाव घेण्याचा आग्रह केला. रुक्मिणीने पत्नीधर्माला साजेसे नाव घेतले, जे ऐकून कृष्ण देवकीसह शुद्धमती आणि उपस्थित सर्व संतोष पावले. (कृष्णकृपेने हा उखाणा सुचला तो मांडत आहे, मूळ कथेत हा नाही याची नोंद असावी) रूप न देखता ऐकली नाममहती ज्याची तेंव्हापासूनच सर्वांगी झाले मी श्रीरंगाची भाग्य थोर की पुण्याई माझी सतजन्मांची  अर्धांगी झाले सर्वसाक्षीने त्या श्रीकृष्णांची सर्व मंडप हर्षाने वाहवा करू लागला. अर्थात यानंतर कृष्णाने रुक्मिणीला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार होता. परंतु सर्वजण त्याआधी, कृष्णाला आग्रह करू लागले की आता त्याने नाव घ्यावे. बऱ्याच आग्रहानंतर कृष्णाने रुक्मिणीकडे सुचक अर्थाने पाहिले, अर्थात तिच्या चेहऱ्यावर उत्कंठावर्धक  भाव पाहून कृष्णानेदेखील उखाणा घेतला. (हा उखाणासुद्ध...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८६ (विवाह सोहळा १४)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८६ (विवाहसोहळा १४)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    शुद्धमती देवकीच्या सदनी जाऊन हात जोडून वदली की, आपण कृष्णाची माय अर्थात वरमाय आपल्या सुनेचं मुखदर्शन घेण्यासाठी यावं, अशी मी आपल्याला विनंती करते. शुद्धमतीने देवकीला सुखासनी बैसवून विडा दिला आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने येण्याचं आमंत्रण केलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून देवकी त्वरेने लग्नमंडपी निघाली. छत्र चामरे आणि चवऱ्या ढाळत देवकीला शुद्धमतीने वाद्य गजरांच्या नादात लग्नमंडपात आणले.  कृष्णरुक्मिणी जोडा खूपच लोभस दिसत होता. ते पाहून, तिथे आलेल्या देवकीने दोघांची दृष्ट काढली. कृष्णाची दृष्ट काढल्यानंतर मीठमोहरी अग्निअर्पण करताना अग्नी ते घेण्यासाठी धावत वर आला.  कारण कृष्णाच्या मागे लागलेले वाईट काहीही त्वरेने जळून जावे आणि त्याचे श्रेय मला मिळावे या आनंदाने अग्नीने ते कार्य त्वरेने केले. त्यानंतर देवकीने रुक्मिणी व कृष्णाला मांडीवर  बसवून आरशात सूनमुख प...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८५ (विवाह सोहळा १३)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८५ (विवाहसोहळा १३)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    सर्वत्र हर्ष उल्हास आणि नृत्य गायन सुरू झाले.  कृष्णाने रुक्मिणीस वरले आणि अवघ्या जीवांचे जीव मोकळे झाले. मग करी कंकण बांधण्याचा विधी पार पडला. कंकणातील अर्धा धागा स्रीभाग लक्ष्मीस्वरूप आणि अर्धा धागा पुरुषभाग म्हणजे नारायणस्वरूप आहे हे पुरोहितांनी प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाना समजावून सांगितले. कृष्णाने ते मनोभावे ऐकून पुरोहितांना नमन केले. देवकीने रुक्मिणी साठी दिलेले पितांबर वस्त्र कृष्णाने रुक्मिणीस भेट केले. शुद्धमतीने कृष्णाला विविध वस्त्रे देऊन गौरविले.  मिळालेली नवीन वस्त्रे नेसून कृष्ण रुक्मिणी पुनः विवाहस्थानी आले. यानंतर लज्जाहोम अर्थात लाह्याहोम या विधीसाठी पुरोहितांनी कृष्णाला , रुक्मिणीला उचलून घेऊन,  बोहल्यावर होमहवनासाठी होमकुंड तयार आहे तेथवर, यावे असे सांगितले. या बरोबर सर्व नर विशेषतः नारी काही लज्जित झाल्या, काही हसू लागल्या, काही म्ह...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८४ (विवाह सोहळा १२)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८४ (विवाहसोहळा १२) (प्रसंग सोळावा सुरू)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    अंतरपाट धरून दोन्हीघरचे मामा उभे आहेत. एका बाजूला कृष्ण स्वतः येऊन उभा आहे. फुलांच्या , मोत्यांच्या मुंडावळ्या आणि रत्नजडित सुवर्णकाम केलेला फेटा घालून  वदन सावळा गोपाळा उभा वरण्या रुक्मिणी सकळ देव नरनारी हर्षे वाट पाहती श्री रुक्मिणी भाव अंतर्भाव जाहला हरी देखी अंतरपाटापार रुक्मिणी येई हळू हळू हरी हरखून हर्षापार रुक्मिणी नजर चरणी हरिचरण देखे हर्षोनी पाहे वाट घटिका जाय  वरे हरी हार घालोनी रुक्मिणी शांत आणि निश्चल भावाने अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला येऊन उभी राहिली. पुरोहितांनी सावधान म्हणायला सुरुवात केली. चोहीकडून अक्षतांचा वर्षाव सुरू झाला. हरी नजरेने रुक्मिणीरुप बघण्याचा प्रयत्न करत आहेत.जरिकाठी पैठणी घालून नखशिखांत अलंकार परिधान करून सुस्वरूप रुक्मिणी प्रत्यक्ष लक्ष्मीरुप दिसत होती.  सावधान म्हणत पुरोहितांनी मंगलाष्टक द्रुत लयीत...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८३ (विवाह सोहळा ११) (प्रसंग पंधरावा समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८३ (विवाहसोहळा ११) (प्रसंग पंधरावा समाप्त) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    सुंदर श्वेत वारुवर स्वार होऊन स्वये श्रीरंग, रंगण्या रुक्मिणी , रंगात निघाला, वरण्या भीमकीस  त्याचं काय वर्णन करावं. श्रीकृष्णाच्या वारुपुढे अभिमान , द्वेष, मत्सर , दंभ, क्रोध, काम, मद स्वतः लोटांगण घालून अंगावरून अश्व जाऊ देत आहेत. कारण त्यांचं जगणं हे त्यातच आहे. अष्टसिद्धी , चतुर्वेद ज्याचे दास आहेत ज्यांनी त्याच्यावर चवऱ्या ढाळल्या आहेत, त्यांच्यापुढे षड्रिपुंची काय बात. म्हणून त्यांना भय निर्माण झालं. अश्या तर्हेने सर्व नकारात्मक गोष्टी प्रत्यक्ष वारुपुढे लोटांगण घेऊन नष्ट झाल्यात. वाद्यांच्या गजरात वऱ्हाड विवाहस्थानी पोचलं आहे आणि श्रद्धा कीर्ती धृती आणि विरक्ती स्वागताला उभ्या आहेत. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून कृष्णनाथाचा वारू आत प्रवेश करता झाला. प्रत्यक्ष सुरवर सोहळा पाहण्यास उपस्थित झालेत. शुद्धमती आणि भीमक यांनी पुढे येऊन कृष्णा...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८२ (विवाह सोहळा १०)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८२ (विवाहसोहळा १०) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    आता लग्नविधी यथोचित सुरू झाले. प्रथम श्रीगणेश जे प्रत्यक्ष तिथे हजर होते, त्यांचे पाद्यपूजन स्वये वसुदेव भीमक आणि जगतपती कृष्णाने केलं. त्यास वस्त्रअलंकार देऊन गौरविण्यात आलं. या सन्मान आणि पूजेने प्रत्यक्ष श्रीगणराय संतुष्ट झाले आणि प्रसन्न होऊन निर्विघ्न कार्याची ग्वाही देते झाले. त्यानंतर कलश पूजन झाले.  तदपश्चात वसुदेव अर्थात श्वसुर यांनी भीमकीचं पूजन केलं. तिला वस्त्र व अलंकार दिला. रुक्मिणी अर्थातच ते घेऊन वस्त्र अलंकार परिधान करण्यास आत गेली. ती येईपर्यंत इकडे कृष्णाचं पूजन चरणांवर जलक्षीर अभिषेक करून राजाने केले. श्रीकृष्णाला श्रीफळार्पण केले. सासर कडून मिळालेलं वस्त्र आणि अलंकार परिधान करून रुक्मिणी आली आणि तिच्या स्वरूपाने पुनः कृष्णावर मोहिनी घातली, जी साऱ्यांनी कृष्णाच्या नजरेत पाहिली.  शुद्धमती कृष्णाला तेलवण  घेऊन आली. त्यासाठी खालील प्रकारचे ल...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८१ (विवाह सोहळा ९)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८१(विवाहसोहळा ९) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   सर्व वऱ्हाडी मंडळी जमू लागली., मुहूर्ताची घटिका समीप येत चालली तसा पुरोहितांनी गलबला सुरू केला. इकडे कृष्णाच्या स्थानावरून सर्व मंडळी कृष्ण,देवकी, वसुदेव, एका बाजूला दुसऱ्या बाजूला सुभद्रा रेवती आणि श्रीबलराम वऱ्हाड घेऊन विवाह मंडपाकडे निघाले.   वाद्यांचा गजर सुरू झाला. भेरी, तुतारी, सनई चौघडे, ढोल ताशे मंजिरे वाजू लागले. सर्वजण वाजत गाजत नाचत मंडपा कडे निघाले. भीमक स्वतः मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वांचं स्वागत करतात. सर्व मंडळी विवाहस्थानी जमा झाली. इकडे सौभाग्याची सर्व तयारी जसं हळद कुंकू धणे जिरे आणून ठेवलं आहे.  पुरोहितांनी मंत्रोच्चाराने विधींना सुरुवात केलेली आहे. सर्व मंडपाचं लक्ष आता केंद्रस्थान आहे. जिथे जगजेठी आणि त्यांची होणारी पत्नी यांच्या विवाहाचे धार्मिक कार्य संपन्न होणार आहे. नित्य होमहवन इत्यादी विधी पार पडल्यानंतर पुरोहित मुख्य विवाह विधींची तया...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८०(विवाह सोहळा ८)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८०(विवाहसोहळा ८) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   भोजनोत्तर सर्वांना विडे देऊन तृप्त करण्यात आले. कृष्णाच्या सवे भोजन केलेले यादव आत्मिक तृप्तीचा आनंद घेऊन निजसुखावर संतोष पावले. सर्व यादव त्यासोबत असलेले सर्व प्रजाजन,  आचार्यगण अन्य अतिथी कोणीही जेवताना बास वा पुरे हा शब्दप्रयोग केला नाही. कारण भोजन इतके स्वादिष्ट होते की प्रत्येक नवीन पदार्थ आधीच्या पदार्थांची चव विसरायला लावत होता. आधीच्या पदार्थाची तृप्ती पुढील पदार्थ पुसत असल्याकारणे प्रत्येकाला एक जिन्नस संपताना पुढील पदार्थाची इच्छा लागून रहात होती.  राजा भीमक आणि राणी शुद्धमती कृष्णाच्या समोर विनम्रपणे  कर जोडून उभे राहिले. अर्थात उष्टावण म्हणून कृष्णाने आपली मुद्रिका ठेवली आणि आपल्या पानात काही जिन्नस खाऊन उरवले रुक्मिणीसाठी. मुद्रिका पाहून शुद्धमती हर्षाने उल्हसित झाली. त्वरेने तिने ती मुद्रिका भीमकीकडे तिच्या हातात घालण्यासाठी पाठवून दिली. रुक्मिणीच्या स...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७९(विवाह सोहळा ७)(चौदावा भाग समाप्त)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७९ (विवाहसोहळा ७)(प्रसंग चोदावा समाप्त) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll या सर्व स्वादिष्ट पदार्थांचा स्वाद व आस्वाद घेताना वऱ्हाडी इतके मग्न , गुंग आणि दंग झाले की कळीकाळाचाही पाड राहिला नाही. स्वये श्रीकृष्ण इतक्या रुचकर आणि सर्वोत्तम भोजनाच्या तृप्तीचा आनंद घेण्यात हरवून गेले.जिथे ईश्वराची ही स्थिती तिथे सामान्यांची काय कथा.  या सर्व भोजनोत्तर सर्व भोजनांचा प्राण जिरेसाळ भात आणण्यात आला. वाढणाऱ्यांनी एक शीत देखील खाली न सांडता आणि एक खंड देखील न फोडता प्रत्येकाला खंडी खंडी भात वाढला. यावर पदार्थांची महाराणी अर्थात वरांन्न म्हणजेच ज्याला वरण म्हटलं जातं त्या वरान्नाचे वाडगेच्या वाडगे येऊ लागले.  या रुखवताच्या भोजनात लेह्य , पेय आणि चोश्य या सर्व प्रकारचे अन्नपदार्थ करण्यात आले होते. जे पदार्थ जिभेने चाटून पोटात  जातात त्याला लेह्य म्हणतात. जे घटा घटा पिऊन पोटात जातं त्याला पेय प्रकार म्हणतात आणि ज्यातील रस चोखून बाकीचा ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७७(विवाह सोहळा ५)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७७ (विवाहसोहळा ५) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll  आज श्रीनाथकृपेने कृष्ण रुक्मिणीच्या अद्वितीय विवाह सोहळ्यातील रुखवत पाहू आणि अनुभवूया. नाथांनी याची सुरवातच इतकी अद्भुत केली आहे. ते म्हणतात  " झळकती खावार्थाची ताटे , स्वानंदरसे भरली वाटे" मनातील भाव ज्यावेळी प्रत्यक्ष प्रकटुन, उलगडून, विस्ताराने  मांडला जातो आणि समोरचा त्यातील आनंदरसाचा स्वाद घेतो तेंव्हा तो झाला भावार्थ. त्याचप्रमाणे खाद्याचा आनंद त्या त्या पदार्थातील रस जाणून खाणे, त्यातील स्वादाचा आणि नवरसांचा आनंद म्हणजे खावार्थ. म्हणजेच फक्त खवय्ये नव्हेत तर त्यातून होणाऱ्या रसनिष्पत्तीचा आस्वाद घेऊन त्यानुसार त्याची गोडी चाखणारे म्हणजे खावार्थी.  कृष्ण, माता देवकी, पिता वसुदेव, पितामह उग्रसेन, दादा, वहिनी, भगिनी यांसह सर्वांना रुखवतापाशी घेऊन आल्यावर राजा आणि राणी यांनी त्यांना स्थानग्रहण करून रुखवताचं भोजन सुरू करण्याची विनंती केली. या सर्व मान्यवरांसह समस्...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७८(विवाह सोहळा ६)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७८ (विवाहसोहळा ६) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll या भोजनात वळवट अर्थात गव्हल्यांचेच इतके प्रकार होते. काही पोपळे म्हणजे सरळ, काही वर्तुळाकार , काही सुमनांच्या म्हणजेच विविध  फुलांच्या आकाराचे गव्हल्यांचे प्रकार वाढले जात होते. सूक्ष्म धाग्यासम असलेल्या अनेक रंगांच्या शेवयांच्या खिरींचे नानाविध प्रकार त्यात होते. इतक्या सुक्ष्माकार नाजूक शेवया ज्यांची कलाकुसर करून विविध आकार देऊन क्षीरसाखरी घोळलेल्या परंतु वाढतांना एकही तुकडा न पडता वा पाडता वाढता येत होत्या, इतक्या लवचिक होत्या. त्यांची चव इतकी मधुर होती की त्यातील रसास्वाद उत्तम खावार्थीच जाणू शकत होता.  प्रत्यक्ष श्रीहरी भोजन करणार हे माहीत असल्याकारणाने अत्यंत लाडात तयार करून वळलेले रसाळ पाकातील वा शर्करायुक्त विवेकाच्या तिळवीय म्हणजेच तिळाच्या बियांनी सजवलेले रसदार चवदार लाडू रांजणच्या रांजण संपत होते. त्याच्या मधुररसयुक्त स्वादाने प्रत्यक्ष श्रीहरी समाधिस्थ होऊन, लाडवाच...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७६ (विवाह सोहळा ४)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७६ (विवाहसोहळा ४) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll  राजा राणी यांसह सर्वांनी त्या चरणतीर्थाचे प्राशन केले. कृष्णपूजन करते समयी राजा भीमकांना सर्वत्र कृष्णरूपा चाच साक्षात्कार होत होता. कर जोडून हरखून आणि देहभान हरपून राजा कृष्णाकडे पहात आणि कृष्ण मंद स्मित करत राजांकडे पाहत आहे. या दृष्टादृष्ट खेळात अवघे विश्व विसरून आणि विरून गेल्याचाच भास राजांना झाला. कृष्ण पूजनानंतर सर्व आप्तमंडळींचं पूजन झालं.  तद्नंतर प्रचलित विधींप्रमाणे वरमाईने वराचे अर्थात श्रीकृष्णाचे मुख पाहण्याचा सोहळा पार पडला. त्या अद्भुत रूपाचं विलोभनीय दर्शन राणी शुद्धमतीला झालं.  शिरी मुकुट, कानी कुंडले, गळ्यात कौस्तुभमाळा वदनी तेज शतसुर्याचे, बाह्यरुप, अंतरी नाना कळा कटी पितांबर, रत्नमेखला, रूपमनोहर घनसावळा देखोनि, शुद्धमती, विसरली मती, अश्रू दोन्ही डोळा  वरमाई म्हणून पाहते तुज मी, श्रीरंगा कृष्णा गोपाळा अवघा जन्म सार्थ होय, स्वीकारी तू रुक्मिणीबाळा...

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७५ (विवाहसोहळा ३)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७५ (विवाहसोहळा ३) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll इकडे मंडपात, वऱ्हाडी निघाले , ते आता पोचतील या आणि अश्या प्रकारच्या वार्तांचा पूर आला.  वधू मातापिता आणि वधुकडील सर्व मंडळी या युगातील व युगायुगातील सर्वात पूजनीय वर अर्थात श्रीकृष्ण याचे वररूपातील सजलेले, नटलेले स्वरूप पाहण्यास अत्युत्सुक होते. जस जश्या वार्ता येत होत्या तस तशी स्वागत व पूजन व्यवस्था,  त्याची चाचपणी, आढावा, तालीम या सर्व गोष्टींना जोर चढला.  राजा भीमक आणि राणी शुद्धमती सोन्याचं तबक त्यात सुवर्ण निरांजन सोन्याच्या कोयरीत खास तयार केलेलं हळदकुंकू घेऊन सज्ज होऊन मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारा वर सावधान पावित्र्यात उभे होते. गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा यांसह सप्त नद्यांचे जल चरण धुण्यास्तव आणले होते.  सोबत राजपरिवारा तील इतर सदस्य त्यामागे मंत्रीगण व त्यांचे कुटुंबीय असे सर्वजण कृष्णाचं राजस रुप पाहायला उत्सुक होते. सर्वांची उत्सुकता शिगेल...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७४ (विवाहसोहळा २)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७४ (विवाहसोहळा २) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll कृष्ण स्वतः वऱ्हाड खोळंबलं होतं त्या ठिकाणी लगबगीने पोचला. सर्व प्रकार जाणल्यावर कृष्ण, ज्यांनी अशी बोचरी टीका केली होती त्यांना रागे भरून श्रीगणेशासमीप येऊन कर जोडून प्रणिपात करता झाला. श्रीगणेशाचं यथाविधी पूजन केल्यावर शर्करायुक्त मोदकांचा नैवेद्य त्यास अर्पण करून भावभक्तीने अर्चना करून म्हणाला " हे श्रीगणराज अवघ्या विश्वातील विघ्नांना लीलया भस्मित करणारा म्हणून तू विघ्नेश्वर , गिरिजेचा अंश म्हणून तू गिरिजात्मज , सकळ पापे उदरी धारिलीस म्हणून लंबोदर, शुर्पासम कर्ण म्हणून तू शूर्पकर्ण, भाळी चंद्र धारी म्हणून तू भालचंद्र, शिवशंकरांच्या अवघ्या गणांचा प्रमुख म्हणून तू गणेश, गणराय , गणराज व गणाधिपती , सर्व चिंता दूर सारणारा मणी देणारा म्हणून चिंतामणी, भक्तांना प्रसन्न होऊन सर्व सिद्धी देणारा तू सिद्धीदाता, साधकांना उदार हस्ते वर देणारा म्हणून तू वरदविनायक. तरीही या सर्व उपाधीतून मुक्त आणि न...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७३ (विवाह सोहळा १)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७३ (विवाहसोहळा १) llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll अद्भुत अश्या विवाह सोहळ्याला अपूर्व तयारीने, अभूतपूर्व जल्लोषात आणि राजस थाटामाटात सुरवात झाली. लग्नाची सर्व सामग्री घेऊन राणी शुद्धमती आणि रुक्मिणीस घेऊन राजा भीमक मंडपाकडे निघाले. नख शिखांत सोन्याच्या दागदागिन्यांनी सजलेली रुक्मिणी मुळातच लक्ष्मीस्वरूप असल्याकारणे तिच्या रूपाची , स्वरूपाची आणि तेजाची प्रभा आसमंतात पोहोचली होती. तिचे ते दिव्य आणि तेजस्वी स्वरूप पाहून आणि त्याच्या प्रभेने सूर्याला संकोच होत होता.  स्वर्गातील सर्व देव, यक्ष ,किन्नर, गंधर्व(जे गायन सादर करून या सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी आले होते)  अप्सरा (ज्या नृत्य सादर करून या पर्वाचा आनंद द्विगुणित करू इच्छित होत्या), अष्टवरूण , आदित्य हे सर्व या श्रीनारायण व देवी लक्ष्मी यांच्या श्रीकृष्ण रुक्मिणी रूपातील विवाहाचा आनंद घेण्यास्तव पोहोचते झाले होते. दशोदिशाना नगारे, वाजंत्री, सनई ,चौघडे झडत होते. काळ स्वये ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७२ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll  जसे संदेश आणि लखोटे द्वारकेस गेले तसेच सेवक व लखोटे कौंडिण्यपुराला पोहोचले आणि नगरीत एकच हर्ष झाला, जो गगनाला भेदून गेला. कारण रुक्मिणीचं कार्य म्हणजे प्रत्येकाच्या जणू घरचं कार्य होतं. त्यामुळे घरोघरी जाण्याची आणि मंगलकार्याची तयारी सुरू झाली. लगबग करून सर्वांनी प्रस्थानाच्या स्थळी येऊन अनेक मंत्री राजमान्य अतिथी आणि बरेचसे प्रजाजन मुळमाधव या ठिकाणी कृष्ण रुक्मिणीच्या विवाहासाठी प्रस्थान करते झाले.  विवाहाचे स्थळ जे मुळमाधव ग्राम होते त्याठिकाणी तर अभूतपूर्व उत्साह दिसत होता. यादवसैन्य आधीच तेथे असल्याकारणाने मोठा उत्सव आधीच सुरू झाला होता. राजा भीमकाने प्रत्यक्ष विश्वकर्म्याला पाचारण करून संपूर्ण मुळमाधव ग्रामी कृष्ण रुक्मिणीच्या विवाहासाठी भव्य मंडप व सजावट करण्याचं कार्य सुपूर्त केलं.  परंतु हे करताना मंडपाकार असलेले मोठमोठे वृक्ष याना कोणतीही बाधा येणार नाही, याची विशेष काळजी घेण्...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७१

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७१ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll श्रीबलरामाचे वचन ऐकून राजा भीमक संतोषले. कृतार्थ भावात दोन्ही बंधू आणि आपली आत्मजा रुक्मिणी हिच्या कडे कृतकृत्य चेहऱ्याने पाहून दोन्ही हात जोडून दोन्ही भावांना म्हणाले. " आपल्या या वचनांनी मी शांतचित्त जाहलो. रुक्मिणी म्हणाली ते सार्थ आहे. जिथे प्रत्यक्ष माधवचरण आहेत,  तेच परमधाम , परमतीर्थ आणि परमपावन क्षेत्र आहे. तेच पुण्यबीज आहे. तिथेच अर्थात या प्रभासक्षेत्रीच हे इच्छिलेले शुभकार्य संपन्न होवो हीच श्रीइच्छा आहे हे जाणून मागील सर्व हे याच परिणामाचा पूर्वभाग आहे वा होता हे ध्यानात घेऊन आता हे विहित कार्य सुसंपन्न करूया.  या हेतूने आपल्या दोन्ही बंधूंना , जे आता या स्थळी उपस्थित आहेत मी सस्नेह विनवू इच्छितो की ,  आपण देवकी वसुदेव यांसह समस्त द्वारकावासीयांना येथे आमंत्रित करावे. आम्ही देखील आमची सिद्धता त्वरेने करतो, जेणेकरून हे कार्य लवकरात लवकरच्या सुमुहुर्ती घडेल."  या नम्रतापू...

श्रीकृष्णाची एक्कावन्न नामाने उपासना

श्रीकृष्णाची उपासना एक्कावन्न नामाभिधानाने जय जय गोविंद जय जय माधव जय जय मुकुंद  जय मुरलीधर जय योगेश्वर जय जय परमानंद जय मधुसूदन जय जय कृष्णा जय जय राधेश्याम जय जय अच्युत जय गिरीधर जय जय घनश्याम  जय रुक्मिणीकांत जय द्वारकेश जय जययदुवीर जय जय केशव जय गोपाळा जय जय जगदीश्वर  जय जय श्रीनाथ जय हृषीकेश जय जय जगताधार जय जय शंखधर जय पद्मनाभ जय जय जगातोद्धार  जय जय कन्हैय्या जय यदुनंदन जय जय कमलाकांता जय जय अजन्मा जय अनिरुद्धा जय जय लक्ष्मीकांता जय जनार्दना जय जगन्नाथा जय जय कामसंतका  जय कंजलोचना जय अव्युक्ता जय जय सर्वपालका  जय जय कृष्णा जय नारायणा जय जय पुरुषोत्तमा जय श्रीकांता जय वैकुंठनाथा जय जय त्रिविक्रमा  जय जय वासुदेवा जय उपेंद्रा जय जय श्यामसुंदरा जय पद्महस्ता जय निरंजना जय जय आनंदसागरा जय प्रद्युम्ना जय अपराजिता जय जय जगदिशा इति नामाने भजती जे जे तयांचे विघ्न हरो सर्वेशा  ©® रचनाकार : प्रसन्न आठवले १३/०२/२०२० १९:४९

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७० llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll श्रीकृष्ण पुढे राजा भीमक यांना म्हणाला. " हे महाराज , आपल्या इच्छेचा मान आहेच. परंतु माझे दादासाहेब अर्थात बलरामदादा यांना आपण विचारणं इष्ट होईल. कारण सांप्रत काळी आणि या स्थळी तेच ज्येष्ठ आहेत. तद्वत त्यांच्या अनुमतीनेच आपल्याला पुढील गोष्टी ठरवता येतील."  श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून राजा भीमक सार्थ आणि यथार्थ भावाने संतोष पावले. अर्थात लगेच ते श्रीबलीभद्र यांच्याकडे वळून त्यांचे चरणस्पर्श करते झाले. त्यांच्या या आदरयुक्त सदभावाने हर्षभरीत झालेले दादा , त्यांना खांद्याला धरून उठवून, श्रीकृष्णाकडे वळून नर्म विनोदाने आणि स्मितवदन म्हणाले. " कान्हा सर्व इच्छिलेस तू, घडवलेस तूच आणि करवून घेतोस माझ्याकडून. तुझी ही तुझी चतुरता मला भावली. अर्थात राजन या त्याच्या इच्छेत आमचाही हर्ष आहे आणि तो हर्ष आम्हाला कान्हामुळेच प्राप्त होतो प्रत्येक वेळी. म्हणूनच कितीही खट्याळ असला तरी तो मला अनुज म्हणून अतिप्रिय आहे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६९

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६९ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll राजा भीमकाने शुद्धमतीला पाचारण करून आपल्या मनातील भाव कथन केला. "दोन विरुद्ध व्यक्तित्वे स्ववृत्तीने कर्मपदास पोचली. मन व्यथित आहे एकाने दुराभिमानाने आणि अपप्रवृत्तीने कृष्ण दूर सारला. तर रुक्मिणीने धर्मवृत्ती बाळगून अंतरात्म्याचा आवाज ऐकून परमपावन श्रीकृष्णाचं अर्धांगत्व प्राप्त करून घेतलं. प्रत्येक जीवाला असाच दोन मार्गांचा पर्याय भगवंत देतात. त्यातून कोणता मार्ग स्वीकारायचा व अंगीकारायचा हे तो तो जीव आपली मती, स्थिती आणि संचिती यानुसार करतो. इतकंच आपल्याला म्हणता येईल."  शुद्धमती यावर म्हणाली " सरतेशेवटी एकच म्हणता येईल की प्रत्येक जीव हा आपले प्रारब्ध घेऊनच येतो."  काही क्षण दोघेही शांत झाले. शुद्धमती राजा भीमकाला म्हणाली " बाकी काहीही आणि कसही झालं असुदे, परंतु लग्नकर्तव्य म्हणून कन्यादान आपण करायला हवं. त्यासाठी श्रीकृष्ण जिथे कुठे असतील तिथे जाऊन हे कार्य संपन्न करणं आपलं कर्तव्य आहे....

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६८ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll झाला प्रकार हा रुक्मिणीसाठी  अत्यंत क्लेशकारक आणि तिच्या हृदयाला पिळ देणारा आहे, हे जाणून श्रीहलधर अर्थात श्रीबलराम यांनी सर्वप्रथम रुक्मिला तात्काळ सोडून देण्याची आज्ञा केली. कृष्णाला क्रोध त्यागण्याची आज्ञावजा सूचना  करून ते रुक्मिणीकडे वळले. रुक्मिणीने त्यांना चरण स्पर्श करून नमन केले आणि आशिष घेतला. रुक्मिणीस उठावयास सांगून ज्येष्ठ भ्राता म्हणाले " हे रुक्मिणी जे घडले ते अत्यंत चुकीचे घडले. ज्या गोष्टी सहजपणे होऊ शकल्या असत्या त्या व्यर्थ कर्मकठीण करण्यात आल्या. मुळातच तुझे पिताश्री जर या लग्नास सहर्ष तयार होते आणि तू देखील यांस सिद्ध होतीस तर मग जे रुक्मिने केलं ते अनाठायी होतं.  अर्थात केल्या कर्माचा उचित दंड कान्हाने त्याला दिला आहेच. परंतु घडल्या प्रकाराने तू तुझं मन दुःखी करू नकोस. ज्या कर्माचा भोग रुक्मिने मागितला तोच त्याला प्राप्त झाला. या व्यतिरिक्त याचा कोणताही भाव मनात ठे...

चंद पंक्तीयां

चंद पंक्तीया  ये गिरी झुल्फे बस आँखो को ओझल कर रही है  लेकीन नजरोंसे वार तो होचुके दिलपे मेरे  नजरे एकबार मिलाकर दिलको सुकून तो दिजीए  सोचिये जनाब हालत दिलकी क्या है मेरे  इन काली घटासी जुल्फो मे नजरे न गुम करना ,  दिलं की बेसबरी हद से बढ रही है ऐ हसीना एक बार गर देख लो पलके उठाकर ऐ जानम,  बस कत्ल का इलजाम तो न लग जाये तुमपर खुद का वासता जो न देखो इक बार मुझको,  दिलं तो फुल सा सुखकर मूर्झा जायेगा गर इस कदर न करो कदर मेरे प्यार की ऐ हुस्ने यार,  चमन के फुल क्या खाक खिलेंगे कलसे ©® शायर : प्रसन्न आठवले ०९/०२/२०२० १८:१९

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३३ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   मनीची वेदना सांगू कुणाला कुणास दृढइच्छा मी सांगू कुणी असा आहे का जगती माझी व्यथा जाणे त्या सांगू कृष्ण कृष्ण मज पिसे लागले जळीस्थळी मज दिसे कृष्ण वदवून घेई नाम मुखी या  किती दुष्ट तो आहे कृष्ण जरी म्हणवतो जगतपती समजेना ही व्यथा कशी आणिक पत्रा धाडूनही जाणीव त्याला नाही कशी किती चिंतावे किती भजावे किती किती त्याला स्मरणे नामाच्या वाहून पखाली प्रारब्धी मज आहे झुरणे  हे श्रीकृष्णा किती विनवावे तुला. तुझ्यावाचून आता अन्न पाणी गोड लागत नाही. फक्त तुझ्या भेटीची आस लागली आहे. काय माझे पूर्वपुण्य कमी म्हणून मला कृष्णाने अव्हेरलं असेल का, की मी त्याच्या पात्रतेची नाही असाही विचार त्याने केला असेल का, मी तर वेडी एकटीच झुरत आहे त्याला स्मरत आहे. आता फक्त कृष्णाशिवाय कशावरही वासना उरली नाही आणि हा द्वारकेचा राणा काही येण्याची सुचिन्हे दिसत नाहीत.  हे विधात्या एकच मागणं आतापर्यंतच्या आयुष्यात ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३४ ( पाचवा प्रसंग समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   मूळ दीन चेहरा असलेला ब्राम्हण समोरून येताना रुक्मिणीने पाहिले. अर्थात कृष्ण रूपाचे दर्शन झालिया वर त्या चर्येचे पालटलेले स्वरूप रुक्मिणीच्या त्वरित ध्यानात आले. जिथे जीवाची शाश्वती राहात नाही , भक्त संकटात सापडतो आणि रक्षणासाठी कोणीही नसतं त्या वेळी देव स्वये धावून येतो. याच जाणिवेने ,  जसे मृत्यूपंथी गेलेल्या जीवाला अमृत मिळाल्यावर वा अवर्षणात मेघवर्षाव झाल्यावर किंवा दुष्काळात असलेल्याला मिष्ठांन्न भोजन प्राप्त मिळाल्यावर, वा मोहाच्या अंधारात विवेकाचा मणी हरवल्याच्या स्थितीत कृष्णआगमनसुखाचा दीप लावल्यावर, जी स्थिती होईल तद्वत अवस्था रुक्मिणीची , त्या द्विजाला पाहून झाली.  द्विजवर रुक्मिणीच्या समीप आला आणि वदता झाला.  " आता तुला भिण्याचे काहीही कारण उरले नाही. मी स्वतः अनंताच्या सोबत गरूडध्वज रथातून बसून येथे आगमन करता झालो आहे. त्यांनी तुला वरण्याचे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३५  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll   इकडे श्रीकृष्ण व बलराम यांची भेट झाली. अर्थातच कृष्ण काही न सांगता सवरता द्वारका सोडून , तेदेखील येथे विदर्भी जेथे सर्व शत्रूपक्ष एकत्रित आहेत , अश्या प्रदेशी एकटा निघून आला. काही सैन्यभार, काही संरक्षण, काही अंगरक्षक न घेता निघून आला या कारणे बलभद्र अर्थात बलरामदादा यांचा पारा चढला होता.  रथातून उतरून हलधर श्रीकृष्णाला गाठून त्यालाही रथातून उतरण्याची आज्ञा देऊन खाली घेऊन आले. कृष्णाने अर्थात पुढील प्रसंग ओळखला व त्याच हेतूने काही बोलणार इतक्यात दादाच क्रोधायमान होऊन कडाडले.  " माता यशोदा , माता देवकी आणि माता रोहिणी यांनी विश्वासाने तुझी जबाबदारी माझ्या शिरावर दिली आहे. हे जाणतोस ना कृष्णा."  कृष्ण काही बोलणार, परंतु त्याला अडवून दादा पुन्हा क्रोधातच वदले. " शत्रू बलाढ्य त्यात जरासंध, शिशुपाल, शाल्व आदी सर्व आपल्या मित्रांसह एकत्रित आणि सैन्यासह आहेत,  याचं काहीच भान ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६७ (प्रसंग द्वादश समाप्त)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll रुक्मिणीने कृष्णाचे चरण धरून त्याला गदगदा हलवून, विनवणीच्या व आर्जवाच्या स्वरात रुक्मिणी बोलली.  " हे यदुनाथ , सूर आणि असुर या दोहोंनाही तू दुर्धर आहेस , म्हणजेच असाध्य आहेस, योगीयांमध्ये योगेश्वर आहेस, विश्वाचा नियंता आहेस , वेदांनाही तुझा पार लागण महाकठीण आहे. तू समस्त जगताला व्यापून स्वये उरला आहेस, तूच निर्माता आणि तूच ध्वंसकर्ता आहेस. तू सर्वशक्तिमान आहेस, तूच जगदोद्धारकही आहेस. अश्या या तुझी हेटाळणी करून, तुझी निंदानालस्ती करून, पित्याच्या इच्छेला व वाचनांना न जुमानता तुला मारायला, तुझ्याशी युद्ध करायला आलेला हा माझा ज्येष्ठ भ्राता अहंबुद्धी , नक्कीच अपराधी आहे.  अश्या या अवगुणी आणि अवलक्षणी पुत्राला या रणात मारशील तर माझी माय, अर्थात माझी आई तत्क्षणी प्राण सोडेल, त्याने माझी हेटाळणी होईल आणि माझं माहेर कायमचं तुटेल. ज्या देहातून आणि ज्या मुखातून तुझी निंदा...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६६ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll कृष्णाने तोमर नष्ट केल्यानंतर रुक्मि शक्तीअस्त्र घेऊन आला. हातात शक्ती धरून कृष्णाला म्हणाला "आता यापुढे तुझा काय पाड लागतो ते दाखवच." कृष्णाने जे जे बाण मारले ते ते शक्ती अस्त्राने परास्त केले. मग कृष्णाने तिधारा अस्त्र लावून बाण मारला. ज्यामुळे बाणांचा पिसारा तयार झाला. ज्याच्या माऱ्याने रुक्मि जवळ जवळ बारा पावलं मागे उडाला आणि शक्तीअस्त्र त्याच्या हातून उडून आंबरात निघून गेलं, अर्थातच ते अस्त्रही प्रभावहीन झालं.  त्यानंतर कृष्णाने खवळून बाणांचा तिखट मारा सुरू केला आणि रुक्मिचे सैन्य कापायला सुरवात केली. त्याच्या बाणांच्या माऱ्याने रुक्मिचे अनेक वीर,  महावीर धरेला मिळाले. धक्क्यातून सावरलेला रुक्मि हे दृश्य पाहून अत्यंत क्रोधीत झाला. रागाने लाल होत त्याने खड्ग आणि वोडण अर्थात ढाल हाती घेऊन रणात प्रवेश केला. एका हातातील वोडण आणि खड्ग विद्युत वेगाने फिरवत पताकेसमान मिरवत खड्गधारी रुक्मि पुढे...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६५ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll रुक्मि पुढे वदतो आहे " अरे यादव कुळात जन्म घेऊन त्यांचाच नाश करण्यास आला आहेस. सर्व भोग भोगून स्वतःला योगी म्हणवतोस. तुझ्या कपटाची झाडणी करण्यास या रणांगणी मी सद्गुणी म्हणून आलो आहे. "  इतके बोलून रुक्मिने तीन बाण धनुष्यास लावून कृष्णाच्या रोखाने सोडला. श्रीहरीने सहा बाण धनुष्यास  लावून रुक्मिच्या दिशेने सोडले. तीन बाणांनी रुक्मिचे तीन बाण विंधले बाकीच्या तीन बाणांनी रुक्मिच्या हातातील धनुष्य मोडून काढले. मग श्रीकृष्णाने आठ बाण लावून सोडले त्यातील चार बाणांनी रुक्मिच्या रथाचे चारही घोडे छेदले आणि उरलेल्या चार बाणांनी सारथी धरणीवर पाडून ध्वजस्तंभ छेदला.  रुक्मिला क्रोध अनावर झाला हा प्राथमिक अपमान बघून. त्याने त्वरेने दुसरे धनुष्य उचलले आणि वेगाने पांच बाण लावून कृष्णाच्या दिशेने मारले. कृष्ण गाढा धनुर्धर होता. त्यानेही त्वरेने पांच बाण मारून रुक्मिचे पाच बाण मो...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६४ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll रथारुढ होत रुक्मिने सारथ्याला आज्ञा केली की,  " ज्या दिशेने हे येणारे सैनिक दिसत आहेत , ज्या दिशेने कृष्ण माझ्या बहिणीला घेऊन गेलाय , त्या दिशेला वायूवेगात रथ घेऊन चल" सारथ्याने "जशी आज्ञा" असं म्हणून रथाला गती दिली. रुक्मिने एकवार सर्व दिशेने पाहिलं. सगळीकडे सैन्याचा महापूर दिसत होता. अश्व गज पायदल सर्व शस्त्रसज्ज होते. आज्ञा मिळताच चालू लागले. चतुरंग सैन्य एक अक्षौहिणी होतं. व्यासांनी महाभारतात सैन्य अश्व गज यांची एक अक्षौहिणी म्हणजे किती याची निश्चित संख्या दिली आहे. ती पुढीलप्रमाणे. एक अक्षौहिणी म्हणजे दोन लक्ष अठरा सहस्त्र सातशे वीर. यात एकवीस सहस्त्र आठशे सत्तर रथ असतात , तितकेच गज हे चारही बाजूने घेरून मध्ये पायदल।असते. एक लक्ष नऊ सहस्त्र तीनशे पन्नास अश्व असतात. पासष्ट सहस्त्र सहाशे दहा पायदल या संख्येने असलेल्या सैन्यव्यवस्थेला  एक अक्षौहिणी म्हणतात असे महर्षी व्यास यांनी महाभारतात ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६३ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll     या सर्व परत निघालेल्या राजे रजवाडे यांना राजा भीमक आणि रुक्मि सामोरे गेले. राजा भीमकाने हात जोडून नम्रपणे म्हटले. " आपण सर्वांनी वऱ्हाडी म्हणून येणे करूनसुद्धा कोणत्याही अवताणाशिवाय माझी कन्या रुक्मिणी हिला कृष्णाकडून सोडवून आणण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल मी समस्त प्रजेतर्फे व राज्यातर्फे आपला कृपाभिलाशी आहे.  या उपकारांची फेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही.  आपल्याला या कार्यात येऊन, तद्नंतर  झालेल्या त्रासाबद्दल मी अत्यंत खजील आहे. आपण मला क्षमा करावी ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे."  जरासंध सर्वांच्या वतीने पुढे आला. त्याने राजा भीमकाचे हात हातात घेऊन त्यांना क्षमा न मागण्याची विनंती केली. "विदर्भ राज्याचा हितचिंतक म्हणून जे शक्य होतं तेच आम्ही केलं."  इतकं बोलून तो रुक्मिकडे वळला. रुक्मि रागाने लाल झाला होता. जरासंध आणि इतर सर्व राजांनी कर्तव्यकार्य म...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६२ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll            llश्रीएकनाथ महाराज कि जय ll    या सर्व विदारक दृश्यातून पुढे आला जरासंधाचा रथ. जरासंधाची अवस्था पाहून शिशुपाल अधिकच भयग्रस्त झाला. त्याच्याकडे पाहात जरासंधाने त्यास म्हटले. " हे शिशुपाल , हे जीवन एक सुखदुःखाचे चक्र आहे. यात सतत सुख वा सतत दुःख असत नाही. त्या सर्वसाक्षी ईश्वराने आपल्याला चौऱ्यांशी लक्ष बाहुल्यांच्या आधारे या ब्रह्मांडात फिरवून मोक्षाचा मार्ग अधिक खडतर केलाय. त्यातच सर्व ईश्वराधीन आहे. तुला काय मिळणार हे फक्त तोच जाणे.  त्यामुळे तो ईश्वर फक्त तटस्थ राहून जे ठरवतो तेच होते.  सर्व काही त्याच्या हाती असल्यामुळे आपण पराधीन आहोत. त्यामुळे काही गेल्याचे वा गमावल्याचे दुःख मानू नकोस. कसलाही खेद बाळगू नकोस. भीमकी मिळणे न मिळणे हे ईश्वरी इच्छेआधिन आहे. त्याच्या इच्छेनेच ती कृष्णास मिळाली. आज काळ त्याच्या पाठीशी आहे. हा काळ ज्याच्या पाठीशी उभा राहील, युद्धात तोच त्या त्या दिवसाचा राजा असतो. आज काळ कृष्ण ...