Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५४

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
रणांगणी मध्यात उभे राहून विकट हास्य करत गवेषणाने यादववीरांना युद्धास आव्हानीत केले. त्याला तसे आव्हान देताना पाहून यादववीर सारण त्वरेने बाण घेऊन त्या दिशेने निघाला. वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बाणांनी घायाळ करत प्रसंगी यमसदनी धाडत, बाणांनी कित्येकांचे हात व पाय उडवत वेगात पुढे निघाला.

त्याला तसे येताना पाहून गवेषण देखील आवेशाने त्याच दिशेने पुढे निघाला. इकडे केशिकाने यादवसेनेचा ऱ्हास करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे श्रीहलधर आपली आयुधे हल आणि गदा यांच्या सहाय्याने शत्रुसैन्यावर तुटून पडला होता. बलीभद्राला रोखण्यासाठी अनेक वीर प्रयत्नांची शिकस्त करत होते. त्यासाठी धनुष्यबाण, तोमर (भाल्या सारखे एक शस्त्र , पण याचा दांडा लाकडी असतो, भाला पूर्णपणे लोखंडी असतो) , खड्ग,  गदा यांनी बलरामाची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत होते.

परंतु बलराम निष्णात योद्धा आणि चपलांगीं असल्यामुळे स्वतः पर्यंत एकही अस्त्र फिरकू देत नव्हता.  आपल्या  हल अर्थात नांगर या अस्त्राने सर्व वार चुकवत , अनेक वीर कापत पुढे निघाला. केशिकाने बलभद्राच्या पावित्र्याचा अंदाज घेत त्याला रोखण्यासाठी बाणांचा वर्षाव केला. बलराम सर्व बाण नांगराने अडवून हाताने दूर फेकत होता.  

एका बेसावध क्षणी उडी घेऊन बलरामाने केशिकावर नांगराने प्रहार करून हाडांचा चुरा केला. सर्वत्र अशुद्ध रुधिराचा वर्षाव झाला आणि केशिक मारला गेला. बलराम वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला नांगराने चुर्णीत होता. बाण तर हरळीसम उचलून फेकत होता. कित्येक मुंडकी चेंडूसम उडवत होता, कित्येक चित्कार त्याच्या नांगराच्या एका घावाने येत होते. जो जो वाटेत आला त्याचा चेंदामेंदा झालाच. त्याच्या नांगराचा ठावच लागत नव्हता. इतक्या गतीने त्याचा नांगर तो अष्टदिशांना फिरवत होता. 

त्याच्या या पावित्र्याचा धाक केशिकाच्या सैन्याने घेतला. केशिकासह त्याचे कित्येक सेनानायक धरतीला प्राप्त झाले. केशिकाचे सैन्य सैरावैरा पळू लागले. इकडे जरासंधाने बलरामाचे शौर्य पाहून अतिक्रोधे त्या दिशेने बाण मारून त्याला ललकारले. ते पाहून आधीच क्रोधीत बलराम त्याला आव्हान देता झाला." आज तुझा युद्धाचा सर्व ज्वर आणि मद उतरवूच तुला परत पाठवीन." इकडे गवेषण सुद्धा यादवसेना कापत कापत पुढे निघाला होता. यादवसेनेला उडवत आणि परास्त करत पुढे निघालेल्या गवेषणाला आणि आपल्या सैन्याची होत असलेली हानी पाहून बलराम रागाने लाल झाला.

गवेषणाला रोखण्यासाठी बलराम आता अस्त्र शस्त्र घेऊन रथातून उडी घालून खाली उतरून गवेषणाकडे निघाला. शेषांवतारी बलराम दातात वराहशक्ती , पाठीला कूर्मशक्ती आणि हाती अनंत शक्तींचे बळ घेऊन गवेषणाच्या दिशेने निघाला.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२५/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...