Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५५

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५५

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

गवेषणाला रोखण्यासाठी बलराम आता अस्त्र शस्त्र घेऊन रथातून उडी घालून खाली उतरून गवेषणाकडे निघाला. शेषांवतारी बलराम दातात वराहशक्ती , पाठीला कूर्मशक्ती आणि हाती अनंत शक्तींचे बळ घेऊन गवेषणाच्या दिशेने निघाला. हातात हल अर्थात नांगर गदा आणि मुसळ घेऊन शेषाचा अवतार गवेषणाकडे निघाला.

गवेषणाने बलरामाला येताना पाहिले आणि बाणांची वृष्टी सुरू केली. बलरामाने त्याच्या सर्व अस्त्रांना नांगराने उडवून आपल्यापर्यंत येऊच दिले नाही. वाटेत बलरामाला अडवण्या साठी अनेक राजांनी गजदल मध्ये घातलं. येणाऱ्या प्रत्येक हत्तीला मुसळीच्या प्रहारासरशी गंदस्थळ फोडून, पायाला नांगराने ओढून , वा गदेच्या प्रखर आघाताने जागच्या जागी मृत्यूसदनी धाडत बलीभद्र निघाला

गवेषणाच्या रथसमीप येताच नांगरदात रथ चाकाखाली घालून पूर्ण रथ , बलरामानाने उलटा केला. सारथी एका दिशेला आणि गवेषण एका दिशेला धरतीवर  पडले. गवेषण इतक्या जोरात तोंडावर आपटला कि, त्याचे काही दात अक्षरश: उखडून आले, इतका बलरामाचा आवेश जोशपूर्ण होता. पडताच गवेषण सर्व बळ एकवटून पळू लागला. ते पाहून बलरामाने त्याला सवेगे  गाठत पाठून जोरात लत्ता प्रहार केला आणि गवेषण गटांगळ्या खात पुन्हा आपटला आणि यावेळी प्रहार असा वज्राघाती होता कि, अशुद्ध रुधिराची वांती होऊन गवेषण बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. बलराम त्याच्या  समीप पोचणार इतक्यात गवेषणाच्या सैनिकांनी चपळाई करत त्याला रथात घालून पळ काढला. 

यानंतर बलरामाचा आवेश आणि आवेग इतका तीव्र झाला कि, वाटेत येणाऱ्या प्रत्येक अश्वविराला अश्वावरून पाडून, अश्व हाताने अडवून पाडत वा आपल्या हाताने त्याला आकाशात भिरकावत शेषावतारी बलराम अजेय पुढे निघाला.  पाया खाली आलेले पायी चिरडले जात होते. वाटेत येणारे नांगराने , मुसळीने वा गदेने मारले जात होते. बलराम एखाद्या वादळा प्रमाणे , विजेप्रमाणे, नागाप्रमाणे पुढे पुढे निघाला, एका झंझावाताप्रमाणे निघाला. हत्तींना एकएका  मुष्टीने गंडस्थळ फोडून जमिनीवर पाडत येईल त्याचे मुसळीने चूर्ण करत शेष पुढे पुढे संहार करत चालला होता. 

सात्विक वक्रदंत यांचेही तुंबळ युद्ध जुंपले होते. तिकडे जरासंधाला हलधराने आपली गदा मारून त्याला निःशस्त्र केले. त्यांचे तिकडे द्वंद्व सुरु जाहले. जरासंधाचे  पारडे झुकत चाललेले पाहून शाल्व राजा मध्ये पडण्यासाठी धावत निघाला आणि त्याने बलरामाला आव्हान दिले. ते पाहून अक्रुराने त्याला वाटेत गाठून त्याच्याशी युद्ध आरंभ केले. त्याला अक्रूर म्हणाला कि, "अरे पळतोस कुठे थांब एका जागी स्थिर मी तुझाच माग शोधत होतो." त्याला रागाने  अडवत बलराम त्याला वदला "अरे त्याने मला पाचारण केले आहे तेंव्हा वर्हाडी म्हणून त्याचे समाधान करणे माझे कर्तव्य आहे. तू दुसऱ्या सावजाला शोध."

बलरामाला अश्या तऱ्हेने  एकाच वेळी अनेक बाजूनी घेरून चहू बाजूनी आणि अनेक बाहूंनी बाणांची वृष्टी अनेक शत्रू वीरांनी सुरु केली. पण बलभद्र  खरा वीर. आपल्या  मुसळीने सर्व बाणांना परतवून सर्वाशी एकाच वेळी युद्ध करत होता. इतक्या बाणातून एकही बाण बलरामापर्यंत पोचत देखील नव्हता. त्या बाण वर्षावातही  वेगाने पुढे जात बलरामाने मुसळीने शाल्वाचा रथ मकरेसम  म्हणजे पार चेपून चेचून टाकला. शाल्वाने वेगात रथाखाली उडी घातली. अन्यथा तिथेच वीरगतीला प्राप्त झाला असता. त्याचा रथ बलरामाने रागाने उचलून भूवर आपटला. त्या खाली कित्येक सैनिक चेपले व मारले गेले.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२६/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...