Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४७

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

श्रीकृष्णाने रुक्मिणीस हरण करून यादवांच्या गोटात नेले आणि इकडे अंबामंदिराजवळ हलकल्लोळ माजला. जणू गिधाडांच्या झुंडीत घुसून आपला भाग त्यांच्या डोळ्यादेखत वनकेसरीने न्यावी त्यासम स्थिती झाली. सखींच्या घोळक्यात सुरक्षित असलेली वागदत्त वधू कृष्णाने नजरे समोर नेली त्यामुळे त्या सख्या उद्विग्न अवस्थेत रुदन करत होत्या. इतकी दारुण स्थिती एका क्षणात त्या सर्वांची केली की एक क्षणापूर्वी याच ठिकाणी आनंदीआनंद नांदत होता हे सांगूनसुद्धा खरं वाटलं नसतं. सर्व रथी महारथी यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. 

मगधनरेश जरासंध क्रुद्ध होऊन रुक्मिवर अक्षरशः धावून गेला आणि म्हणाला 

" मोठा आला होतास ज्येष्ठ बंधू सर्व समर्थ म्हणवून घेत होतास स्वतःला. रक्षणासाठी सज्ज होतास. काय कारणे बंधू आणि रक्षणकर्ता म्हणवून घेतोस. लाज वाटली पाहिजे. तुझ्या डोळ्यादेखत तो यादवचोर तुझ्या बहिणीला वधुवेशात उचलून घेऊन गेला, तेही तुझ्या राज्यात. फुकाचा आहे तुझा डौल आणि आवेश" 

स्यंदने गरूडकेतूमंडिते कुंडिनेतशनयाधिरोपिता l केनचिन्नवतमालकांतिवछ्यामलेन पुरुषेण नियते ll 

गरूडमंडितध्वज ज्याचे निशाण , तोडर ज्याचे चरणी, मेखलेत वीज बांधलेली आणि त्याच विजेचा पितांबर ज्याने नेसलाय, पिवळा टिळक भाळी ज्याच्या, मुकुटधारी, कानी कुंडले, गळ्यात वनमाळा, अद्भुत , सुलोचन , सुंदर वदन , निळा सावळा वर्ण ज्याचा असा जो जगतपालक श्रीकृष्ण,  त्याने रुक्मिणी नेली. 

मगधनरेश अति क्रोध आणि उद्विग्नता या मिश्र भावात पुढे बोलले

" सर्व यश, कीर्ती, भाग्य त्या यादवांनी चोरून नेले. सर्व मागील यश, कुळांची कीर्ती, नाम मानसन्मान या सर्वाचा चोळामोळा करत त्याने आपल्या डोळ्यासमोर आपली लज्जा उचलून नेली. आता माघारी जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण काय तोंड घेऊन माघारी जायचं आणि काय सांगायचं. त्यामुळे आता घनघोर युद्ध करून रुक्मिणीस परत मिळवणे हे एकच कार्य उरते." 

इतकं बोलून त्याने अति क्रोधीत नजरेने समस्त लोकांकडे एकवार पाहिलं. रुक्मि शिशुपाल शल्य यांसह सर्वांना त्वरित युद्धाच्या योजनेसाठी जवळ येण्यास सांगून, सेनापतींना युद्धाची तयारी करण्यास सांगितलं. अश्वदलवीर आपापल्या अश्वांवर स्वार होऊ लागले, पाठीचे तिरकमठे , भाले, ढाली , हातातील खड्ग सर्व सज्ज करून तयार झाले. पायदल भाले, खड्ग, तिरकमठे घेऊन सज्ज झाले, गजदल आपल्या तयारीला लागले. वीर महावीर सर्वजण आपापली अस्त्र शस्त्र परजून सिद्ध झाले. 

मगधनरेश जरासंधाने घोषणाच केली की आता निर्णायक युद्ध.

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१८/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...