Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४२

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४२

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
   
रुक्मिणीच्या भाग्याची भाग्यरेखा रेखाटताना प्रारब्धाने कोणत्या कुंचल्याचा आधार घेतला असेल. हे दैव जाणते. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण यांच्याशी भाग्यरेखा जोडायची म्हणजे कित्येक जन्मांच्या पुण्यराशी एकत्र करून रुक्मिणीचे पुण्य गोठले असेल, त्या कपाळावरील भाग्य रेखेत, ते फक्त श्रीयदुनाथ जाणतात. त्या कपाळाचा कस्तुरी मळवट विधात्याने श्रीकृष्णाच्या प्रभेने भरला होता. 

पौर्णिमेच्या चंद्राच्या शुभ्र प्रभावळीने कपाळावरील मळवट तेज:पुंज दिसत होता. त्या माळवंटाखालील भुवया जणू इंद्रधनुष्याने तयार केल्या होत्या. त्यांचा वक्राकार जेंव्हा श्रीकृष्ण बघणार होता, त्यावेळी त्यांच्या वक्रतेने श्रीकृष्ण घायाळ होणार होता. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या पुण्याईने भरलेलं अखंड सौभाग्याचं अहेवपणाचं कुंकू तिच्या कपाळी विराजित झालं होतं.  तिचं मुख जणू चंद्र स्वये येऊन प्रभा देऊन गेला नभात, असा तेजःपुंज दिसत होता. नभांगणातील नक्षत्रे मोती होऊन तिच्या साडीवर विराजित झाले होती. तिच्या सौन्दर्याची आभा सर्वदूर जणू प्रकाशाबरोबर पसरली होती. 

सूर्यमालेतील नऊ ग्रह तिच्या गळ्यातील रत्नहारात सजून आपलीच शोभा वाढवीत होत्या. कृष्णाच्या दर्शनासाठी आतुरलेलं देखणेपण त्या दोन्ही डोळ्यात सामावलेलं होतं. कृष्ण सावळ्याचं दर्शन घेण्यासाठी कृष्णश्यामता ( नाथांचा शब्द आहे🙏) त्या डोळ्यातील बुबुळात आली होती. अर्थात तिचे डोळे कृष्णश्यामल रंगाचे होते. 

कृष्ण दर्शनार्थ नयनातील अंजन आतुर जाहले होते. तिचे नाक वसंतातील सुवासिक चाफ्याच्या कळीप्रमाणे होते. त्याखाली डाळिंबाच्या बियांप्रमाणे अधर, परंतु डाळिंबाच्या बियांचा रंग नश्वर होता, तर हा रंग अनश्वर होता. 

ओंकारातील श्रुतींप्रमाने सुशोभित दंतपंक्ती, ज्या चारी वेद श्रीमुखातून यावेत त्यासम शुभ्र होत्या. अधरांच्या तळी,  हनुवटी तिच्या चेहऱ्याच्या वर्णाप्रमाणे गौर आणि सुडौल होती. इथेही कृष्णवर्णी श्यामप्रभा गोंदली होती. त्या चेहऱ्यावरील सौन्दर्याची प्रभा सहस्त्र मदन देखु न शकेल अशीच होती. त्याचे तेज ओज फक्त आणि फक्त श्रीहरीच तोलू शकेल असे होते. बाकी कोणी जरी त्याजकडे पाहिलं तर त्वरित भस्मसात होईल असं तेज त्या सौन्दर्यात होतं. 

श्रीकृष्णाच्या नावाने एक अहेवतंतु रुक्मिणीने गळ्यात धारण केला होता, जो जनात दिसणार नाही अश्या पद्धतीने तिने कंठातील पदके हार माला यात खुबीने लपवला होता. या अमाप सौन्दर्याने लिप्त रुक्मिणी जणू फक्त आणि फक्त श्रीकृष्णाच्याच आलिंगनासाठी निर्मित होती, हे जाणून तिच्या दिव्य देहाची प्रभा चौबाजूला फाकली होती. ज्या तेजाच्या फक्त जाणिवेने हीन वृत्तीने पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे भस्म व्हावे. ते तेज हाती उचलून घेण्याची शक्ती त्रिखंडात मात्र श्रीकृष्णात होती. म्हणून आता रुक्मिणी देखील निश्चीन्त होती की कृष्ण ज्याअर्थी इथपर्यंत येऊन ठेपला आहे, त्या अर्थी आता तो येनकेनप्रकारेण उडी घालून मला येथून सुस्थितीत हरण करता होईल. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१२/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९




Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...