Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ४८

श्रीरुक्मिणी स्वयंवर ४८

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

मगधनरेश जरासंधाने घोषणाच केली की आता निर्णायक युद्ध. सर्व शस्त्रसज्ज सैन्य यादवांच्या विशाल सेनेपुढे येऊन उभे राहिले. शल्य, मगधनरेश, चेदिराज, रुक्मि आणि इतर अनेक वीर एका बाजूस आपापल्या विशालकाय सेनेसह आणि दुसरीकडे श्रीबलभद्र आणि श्रीकृष्ण आपल्या अति विशाल यादव सेनेसह एकमेकांसमोर ठाकले. आता तुंबळ युद्ध होणार याची काळालाही काळजी लागली.

मगधनरेश जरासंध आणि चेदिराज शिशुपाल कृष्णाला आवाहन करताना गरजले.

" अरे गवळ्याच्या पोरा, दूध दही लोणी चोरणारा चोरटा तू , आता ते चोरता चोरता आमच्या विवाहातल्या लेकीबाळी पण चोरायला लागलास.पण हे तुझे चोरीचे धंदे गोकुळात खपवून घेतले जात असतील. इथे क्षणमात्र खपवून घेतले जाणार नाहीत. स्वतःस फार वीर पराक्रमी आणि अवतारी पुरुष असल्याचे भासवतोस मग हे असे विवाहातून दुसऱ्यांची वागदत्त वधू पळवण कितपत तुझ्या अवतारकार्यात शोभतं. 

तुला अजूनही समय आहे.काही न बोलता रुक्मिणीस इथेच ठेवून निघून जा. आम्ही तुला मोठ्या मनाने क्षमा करून तुझा हा अपराध पोटात घेऊ. कितीही झालं तरी आम्ही तुझ्याहून श्रेष्ठ आहोत. आमच्यापुढे तुझा पाड लागणार नाही आणि तद्नंतर जी नाचक्की होईल, ती तरी वाचेल. तुझ्या किर्तीची झाकली मूठ तशीच राहील आणि आमचे कार्य , म्हणजे रुक्मिणीला नेण्याचे, तेही साध्य होईल."

कृष्णानेदेखील जरासंध आणि सेनेला ललकारी दिली

" अरे वीर म्हणवतोस स्वतःला आणि सतरा वेळा पराभूत करून पाठवले आहे आम्ही तुला. पाठ दाखवून पळालेला वीर तू , तुला युद्धाची गर्जना करताना लाज वाटली पाहिजे. मी रुक्मिणीला तिच्या संमतीने आणि अनुमतीनेच उचलून आणली आहे. तू काय माझी जिरवण्याची शेखी मिरवतोस." 

श्रीकृष्णाला जरासंधाने  बोललेल्या  बोलाने आणि श्रीकृष्णाच्या ललकारीने, उलट परिणाम झाला आणि आपल्या लाडक्या सेनानायकाविषयी हे अनुदार उद्गार ऐकून यादववीर क्रुद्ध झाले आणि समोरच्या सैन्यावर आवेशात तुटून पडले.  एका महाप्रचंड युद्धाला सुरवात झाली. दोन्हीकडून बाणांचा वर्षाव सुरू झाला. कार्मुक कार्मुकास भिडले, पायदळ पायदळाला भिडले, भालेकरी भालेकऱ्यांवर, अश्ववीर अश्ववीरांवर, गदाधारी गदाधारींवर, गज गजावर, माहूत माहुतावर अक्षरशः तुटून पडले.

प्रत्येक वीर आपापल्या बाजूसाठी त्वेषाने रणांगणी आवेशात आग ओकू लागला. खड्ग खड्गाला भिडले गदा गदेला आणि त्याचा खणखणाट घुमू लागला. वीरांचे आवेश, जखमींचे चित्कार, आक्रोश यांनी संपूर्ण रणभूमी त्राही झाली. प्रत्यक्ष वसुंधरा या घनघोर युद्धाने शहारली. कटारी, बरचे भाले यांनी अश्ववीरांवर अश्वावर प्रहार करून, भाल्यांनी हत्तीचे उदर फाडून हत्तीवरील वीरांना खाली पाडून देहदंड दिला जात होता. सर्वत्र रुधिर आणि मांसाचा चिखल झाला. 

हे सर्व पाहून रुक्मिणी धास्तावून गेली. ती विचार करू लागली की,  हे काय घडले, हे मी काय करून बसले. आज या युद्धात दिर आणि भाऊ एकमेकांवर तुटून पडलेत. जर यात धरणीवर उभय बाजूच्या नात्यांचेच रुधिर सांडले तर सासरचे मलाच बोल लावतील. मला संबोधून कृष्णाला म्हणतील की काय ही अवलक्षणी कुलनाशी स्त्री घरी आणलीस, जिने येता येताच इतका कुलनाश केला. इतके वीर मारले गेले हिच्यासाठी अश्या या कुलविनाशी स्त्रीला का ठेवून घ्यायचे. 

अश्याच  विचारमग्न अवस्थेत ती होती. 


ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१९/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...