Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६० (प्रसंग अकरावा समाप्त) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

गदाने धनुष्यास बाण लावून जरासंधाच्या दिशेने सोडला. जरासंधाचे सुरक्षा कवच भेदून बाण त्याच्या मुकुटी आपटला आणि जरासंध धक्क्याने हादरला. तो स्वतःला यातून सावरणार तोच गदाने अजून एक बाण मारला, ज्याने जरासंधाच्या हातातील धनुष्य गळून खाली पडलं.  जरासंध अवचितपणे सावध झाला.

त्याच्या पोटात भीतीने गोळा आला आणि गाळण उडाली. त्याने आजूबाजूला पाहिले. मागे कोणीही नव्हते जे सहाय्यास येऊ शकेल. आता मात्र त्याच्या रणमद खाडकन उतरला. कारण श्रीबलीभद्राने त्याच्या सहाय्यार्थ आणलेले अनेक राजे व त्याचे सैन्य , मगधाचे अनेक वीर आणि बरेचसे सैन्य एकाहाती , गवत कापून काढावे तसे, कापून काढले होते. परिस्थिती आपल्या विपरीत आहे हे ध्यानात येताच जरासंध रथ उलटा वळवून त्वरेने पाय काढता झाला.

त्याला तसे पळताना बघून त्याचे सैनिक , त्याच्या सहाय्यार्थ आलेले राजे आणि त्यांचे सैनिक हे सर्व रणातून पळून जायला लागले. अगदी आलेले गज, अश्व , रथ हे सुद्धा सोडून पळाले. यादवांचा मोठा विजय झाला होता. उद्देश हितार्थ असल्यामुळे काळही आज श्रीकृष्णाच्या मदतीला धावून आला होता. पाळणारे अक्षरशः जीव मुठीत घेऊन, एकमेकांना ढकलत , पडत, धडपडत, जीव वाचवण्यासाठी, जीवाचं रान करून पळत होते. ते बघताना यादवांच्या गोटात मोठा हास्यकल्लोळ उठला. 

पाळणारे विचार करत होते की, कुठे रुक्मिणीच्या भावाच्या नादी लागलो, विवाहाचे आमंत्रण स्वीकारले, येथे आलो आणि यात अडकलो. वऱ्हाडी म्हणून आलो होतो, विवाह रद्द झाल्यापश्चात येथून निघून गेलो असतो , तर लाजलज्जा तरी वाचली असती, नाचक्की तरी नसती झाली. आता या यादवांच्या माध्यमातून सर्व जगतास ही वार्ता कळेल आणि जो तो आपल्याला विचारेल की, जो विवाह नोवरीस मान्यच नव्हता,  त्यात किमर्थम सहभागी झालात, काय म्हणून विवाह रद्द होण्यापश्चात तिथे थांबलात आणि नुसते थाबला नाहीत तर युद्धसुद्धा केलेत. तेदेखील यादवांशी.  

जाताजाता ते यादववीरांना पाया पडून जीव न घेण्याविषयी विनवत होते. म्हणत होते की, आधीच युद्धातून पळून गेलेल्या वीरांना जगात कोणी भीक देखील घालत नाही. त्यामुळे त्या लोकलज्जेचा धाक आहेच. पण त्यात तुम्ही मारले तर अजूनच ख्याती जाईल आणि या जगात तर सोडाच, पण परलोकातसुद्धा आम्हाला कोणी उभं करणार नाही. त्यातच आपण वीर आहात आणि वीरांना, पळून जाणाऱ्यास मारणे शोभत नाही. अर्थात यादव हे वीर असल्यामुळे आणि जगतजेते असल्याकारणाने असलं भ्याड कृत्य ते करणारच नव्हते. त्यामुळे त्यांनी पळणाऱ्याना यथा स्थित पळून जाऊ दिलं. 

इकडे यादवांच्या सैन्यात जल्लोष आणि जयजयकार सुरू झाला. जो तो श्रीबलीभद्र , श्रीकृष्ण यांसह यादवांच्या नावाने जयजयकार करू लागले. वीरांनी आणि सैनिकांनी आपापल्या कवचाच्या गाठी सोडून , अस्त्र शस्त्र जमा करून, आपले बस्तान व अश्व , रथ , गज आदींची जमवाजमव सुरू केली.  आपले बंधू बांधव आपल्या आणि आपल्या सासरच्या व समस्त यादवांच्या जीवावर उठलेले पाहून तिला आलेली खिन्नता, या रोमहर्षक विजयाने आणि सर्व राजेरजवाडे पळून गेल्याने, हर्षात परिवर्तित झाली. 

तिला यादवांच्या आणि ज्येष्ठ दिर बलरामदादा यांच्या बळाचा प्रत्यय आला. या सर्व अवचित पण अंती सुखकर झालेल्या युद्ध घटनेतील विजयाने रुक्मिणी हरखून गेली. ती देहभान विसरून यादववीर, श्रीबलरामदादा आणि अर्थातच यदुनाथ श्रीकृष्ण यांच्याकडे कौतुकाने पाहत होती. परंतु अजून रुक्मिचा मद आणि उन्माद बाकी होता. त्यामुळे आता पुढील भागात श्रीकृष्ण आणि रुक्मि यांच्या युद्धाची कथा वाचू. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथ महाराज यांच्या कृपेने अकरावा प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग बारावा 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०१/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...