Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ५०

श्रीरुक्मिणी स्वयंवर ५०  (अर्धशतकी लेखांक आणि प्रसंग नववा सुरू) 

(कालच्या लेखावर प्रसंग आठवा समाप्त लिहायचे राहिले)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

दादांचे आणि गदाचे हे रणातील आलिंगन दृश्य आणि हास्य पाहून जरासंध रागाने खवळून त्वेषाने आपल्या सैन्याला ललकारी देत गरजला. त्याच्या गर्जनेने जरासंध सेनेतील रथी जरासंधासमीप येऊन प्रतिज्ञा करते झाले

" हे महावीर जरासंध आपण जराही चिंता करू नये. आम्ही धनुष्ये, खड्गे हाती विनाकारण बाळगली नाहीत. पराक्रम करत इतःपर आलोय.  म्हणूनच आपल्या समूख उभे राहण्याचे धैर्य मनात आले आहे. हे यादववीर ते काय करतील त्यांना अश्या काही पराक्रमाने पळवून लावू की, काही क्षणात येथून, नोवरी सोडून पळून जातील."

पराक्रमी यादव सेनेबद्दल हे अनुदार उद्गार ऐकून संतापून गद अति क्रोधाने पेटून आणि श्रीहलधर ज्वाला होऊन तर महारथी प्रबळ अग्निसम लाल होऊन शत्रूसेनेवर तुटून पडले.त्यांचा तो विलक्षण आवेश पाहून शत्रूचे सैनिक भांबावून गेले.  सर्व यादववीर हल अर्थात नांगर,  गदा घेऊन रणात गेले. हलधराने तर त्वेषाने शत्रुसैन्य कापून काढण्यास सुरवात केली.  हलधाराचा अर्थात बळभद्राचा आवेश पाहून जरासंध क्रोधाने त्याच्याकडे झेपावला.

पण त्याला वीर गदाने वाटेतच आपल्या अंगावर घेतले आणि त्यासमवेत द्वंद्व युद्ध आरंभ केले. ते देखून वीर दंतवक्र दात ओठ चावत त्वेषाने श्रीबलभद्र यांजकडे धावून येऊ लागला. परंतु त्याला प्रबळाने वाटेतच रोखून त्याला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. हे चारही वीर वीरासम एकमेकांशी युद्ध करते झाले. यांचे अतिदारूण युद्ध सुरू झाले.धनुष्याचे टणत्कार निनादू लागले. 

याचवेळी पौंड्रक रागाने श्रीबलभद्र यांच्याकडे झेपावला. त्याच्या रथाचा मार्ग, आपल्या रथाने कृतवर्मा अडवून पौंड्रकाला आव्हान देता झाला. त्याने सवेग प्रत्यंचा ओढून बाण सोडला. पहिल्या बाणात त्याने पौंड्रकाच्या रथाचा ध्वज आणि दुसऱ्याच बाणात पताका ध्वस्त करत धरेकडे पाडली. आपले ध्वज आणि पताका ध्वस्त झालेली पाहून पौंड्रक रागाने लाल झाला. त्यानेही वेगाने सहा बाणी अस्त्र चालवून वीर कृतवर्मा याला धनुष्यासह धरणीवर पाडला. 

कृतवर्मा वायूवेगे उत्तीष्ठ होऊन त्वरेने रथारुढ झाला. त्यानेही लगोलग , पौंड्रकास समय न देता सवेगे बाणांचा वर्षाव सुरू केला. पौंड्रक आणि कृतवर्मा यांचे घनघोर बाण द्वंद्व सुरू झाले. कृतवर्मा मग तीन बाण धनुष्यास जोडून वदला आता 
"प्राणहरण करतो पौंड्रका". इतके बोलून कृतवर्मा बाण सोडता जाहला. पहिल्या बाणाने सारथ्याचा भेद केला. तर उरलेले दोन्ही बाण पौंड्रकाचा छातीभेद करते झाली.पौंड्रक मूर्च्छित होऊन धरेवर कोसळला. त्याचे देहभान हरपत चालले.  

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

२१/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...