Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३६

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
  
रायासवे स्वयं श्रीकृष्ण रथारुढ होऊन कौंडिण्यपूर नगरात जायला निघाले. नगरात आतापर्यंत ही वार्ता सर्वदूर गेली की, श्रीहलधर आणि श्रीकृष्ण विवाहसमारंभानिमित्त दाखल झाले आहेत. इतकंच नव्हे तर नगरात प्रजाजनांच्या आग्रहाखातर व दर्शनासाठी श्रीहरी येत आहेत. मार्गात हजारोंच्या संख्येने,  मार्गाच्या दुतर्फा,  कृष्णदर्शनार्थ उपस्थित राहून प्रजाजन  कृष्ण नामाचा जयघोष करत होते. 

अनेकांनी पुष्पहार , पुष्पे इत्यादी देखील आणलं होतं. अर्थात विवाहाप्रीत्यर्थ सर्व तयारी यथोचित असल्यामुळे हार , तुरे, पुष्पे यांचा सुकाळ होता. कृष्ण सर्वांच्या प्रणीपाताचा, नमनाचा  व नमस्काराचा स्वीकार करत आणि सर्वांना आशिष देत मार्गस्थ चालला होता. विवाहविधी सुरू असून देखील तिकडची सर्व गर्दी ही कृष्णदर्शनार्थ लोटली होती. 

श्रीकृष्ण साक्षात मूर्तिमंत चैतन्य , समाधान, सात्त्विकता. 

निळासावळा देह , चर्येवर निर्गुण भाव
अंगी चंदन परिमळ घेई जगताचा ठाव
लोचन हृदयापार जे देती आत्मप्रचिती
घेई विश्व कवेत हृदयी सज्जन सुस्थिती

बहुत वर्णले वेद परी सापडेना ते तेज 
पितांबर सोहे देही शतसूर्याचे ओज 
अवघे ब्रह्मांड भरून वाहे ऐसी प्रभा
निलकांती ऐसी जणू भेदे निल नभा

कैवल्याची मूर्त स्वरूपात लीन सदा
भक्तवत्सल हे ब्रीद जे राखीयले सदा
अमृतप्राशन योग भेट त्या नेत्रांची होय
वर्णवेना किर्त ऐसी, कविराज नत होय

कैवल्याची मूर्ती, त्रिगुणांची प्रतीती आणि तरीही निर्गुण भाव असा तो निलवर्णी, अगणित रत्नांचे तेज सामावून घेणारे नेत्र समस्त जनांस हात उंचावून आशिष देत होते. जे जे मार्गस्थ होते आणि दर्शन प्राप्त करत होते ते ते मोक्षाचे अधिकारी होत होते. कारण साक्षात जगदीश्वराला पाहिल्यानंतर प्रत्यक्ष यमराजाची काय मात होती त्या जीवाला यमलोकी नेण्याची. 

दर्शनाचा लाभ असा की जो जे वांछीत होता ते ते प्राप्त करत होता. वृद्ध, अपंग , पीडित , दुःखी, कष्टी जीव जेंव्हा निष्ठापूर्वक नमस्कार करत होते, ते ते तेजोमय देहाची प्राप्ती करत होते. 

जैसी ज्याची वासना होय 
तैसे तैसे त्यास प्राप्त होय
दिसू लागे अंधांस नेत्राने
दिव्यत्व त्या, जे न्यून गात्राने 

अवीट गोडी ज्यांस नामाची
त्यांस तैसे दर्शनाची प्राप्ती
अखंड वाहता अमृतझरा 
हरी कल्पवृक्षाचा गाभारा 

काय काय द्यावे भक्तजनांस 
हरी देई तुझी ओंजळ उदास
देई शतजन्मांचे परिपुण्य 
बघता नुरे काही अवगुण्य 

अशी प्रभा झाकोळून गेली नगराला की सूर्य स्वये संकुचित झाला. साधू संत ज्याच्या दर्शनार्थ अखंड जन्म नामात घालवतात तो स्वये नगरातील प्रजाजनांना दर्शन देत देत त्यायोगे जनसामान्यांना आशिष देत आणि अमृतयोगाची प्राप्ती करून देत नगरातील विवाहक्षेत्री येऊन पोहोचता होत होता. परंतु दुतर्फा गर्दीमुळे रथ अगदी धीम्या गतीने मार्गस्थ होत होता. 


ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०४/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...