Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २

श्रीकृष्ण : आपण स्वयं हे जाणता की त्यातील बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कला आपणाकडून प्रारब्धवश प्राप्त झाल्या.

श्रीराम : आपल्या वाग्चातुर्याबद्दल आपण ख्यात होतात , हे जाणून आहोत, पण आज प्रत्यय सुद्धा आला. तशी आपल्याला आपले चातुर्य हर एक क्षेत्रात दाखवण्याची संधी मिळाली. त्यावरही कडी म्हणजे आपण त्याचे सोनं केलंत.

श्रीकृष्ण : कदाचित हा काळाचा महिमा असेल. आपला काळ हा सत्ययुग संपून त्रेतायुग चालू झाल्याचा काळ. जडदेही मानवाच्या वासनारूपाचे पूर्ण प्रकटीकरण झालेच नव्हते. त्यामुळेच आपल्याला अति दुष्ट दानव पाहण्यास मिळाले. परंतु मानवी रुपात तश्या अभिव्यक्ती अपवादानेच आढळून आल्या असतील.

आमच्या युगात सर्व दानवी शक्ती मानवी रुपात प्रकट होऊन आल्या होत्या. त्यादेखील एकाच घरात. जस की सदाचारी वसुदेव आणि त्यांचा मेहुणा दुराचारी कंस. बर कंसाच्या घरात
पिता राजा उग्रसेन सुशील आणि सदवर्तनी. पण पुत्र कंस. सख्खे चुलत बंधू कौरव व पांडव, माझा आतेभाऊ शिशुपाल, रुक्मिणीचा बंधू रुक्मि, व पिताश्री राजा भीमक आणि सरते शेवटी महाभारत युद्धात प्रत्यक्ष पितामह भीष्म व त्या विरुद्ध त्यांचीच पतवंड असलेले पांडव हे एकमेकांविरुद्ध. म्हणजे एकूणच सतत परीक्षा. म्हणून या सर्वात हुशारीचा कस लागण अपेक्षितच होतं. म्हणूनच सतत चौकस पण बुद्धी स्थिर तरीही विचारचक्र सतत फिरत ठेवणं गरजेचं होतं. म्हणूनच ते जमवावं लागलं नव्हे जमवलं.

श्रीराम : त्यासाठी लागणारे सर्व डावपेच आखण्यात आणि शत्रूचे डाव ओळखून ते निष्प्रभ करण्याचं जे तंत्र आपण जन्माला घातलंत त्यालाच जन पुढे कृष्णनीती म्हणूनच संबोधू लागले.

श्रीकृष्ण : काळाची पावलं ओळखून आणि नितीशी तडजोडी न करता, पण डावपेचात्मक रचना योजून, त्याद्वारे दुष्ट व खल प्रवृत्तींचे निर्दालन म्हणजेच कृष्णनीती. बर ही नीती फक्त राजकारणातच उपयोगात आणावी अस काही नाही. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा व व्यवहारात सुद्धा याचा उपयोग होऊ शकेल. कसा तो ज्याने त्याने माझ्या चरित्राचा अभ्यास करून ठरवावं.

श्रीराम : हे सुयोग्य वदलात.

क्रमशः

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...