Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४

आज कैलासावर स्वये श्रीनारायण आपल्या दोन भिन्न प्रकृती रुपात आणि त्या रूपातील आपल्या अर्धांगीसह आलेत म्हणजे नक्कीच काही प्रयोजन वा कोणत्यातरी कार्याचे नियोजन करून अथवा करण्यास आले असावेत असा कयास करूनच श्रीमहादेवानी पृच्छा केली

" आज कैलास पर्वती आपण मूळ स्वरूप त्यागून या रुपात प्रकट झालात काही प्रयोजन आहे का ? "

श्रीराम : आपल्या दर्शनाची वेडी आस आम्हाला आपल्याप्रती घेऊन आली. अनेक वर्षे झाली आपली फक्त ध्यानयोगातच भेट होते आहे, समाधीअवस्थेत. म्हणून विचार आला की प्रत्यक्ष रुपात आपले दर्शन घ्यावे. त्याच मिशाने आज उपस्थित झालो. येऊन पहातो तर काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण तेसुद्धा देवी रुक्मिणीसह समोर पहावयास मिळाले.  दर्शन तर झालेच पण काही सद्विचार ऐकण्याची भाग्य आणि योग जुळून आला.

श्रीकृष्ण : प्रभू आपण अगदी मनकवडे आहात, अर्थात आहातच म्हणा. भक्तांच्या मनातील भाव न वदता वा न कथता आपण जाणता. यात तसुभरदेखील मिथ्या वचन नाही. काय कैलासनाथ.

श्रीशंकर : अर्थात आम्ही पूर्ण सहमत आहोत. प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात भक्तवत्सल , भक्तप्रतिपालक , तारणहार. तशीच त्यांची किर्त आहे.  या ब्रिदाचे त्यांनी सदैव रक्षण केले आहे.  श्रीकृष्ण चरित्रातून महाविष्णूंनी दाखवून दिलं आहे की, जसा समोरचा मानव स्वरूप धरेल त्याच्याशी त्यानुसारच प्रतिक्रियात्मक वदावे, वा कृतीत व्हावे. पण करुणेचा आणि दयेचा सागर म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम.

श्रीकृष्ण : पूर्ण सत्य वदलात आपण श्रीमहादेव. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह वा पूर्वमत कोणत्याही शत्रूबद्दल न करून घेता. ती व्यक्ती वा उन्मत्त शक्ती समोर आल्यावर शक्यतो शस्त्रवापर न होता दयार्द्र बुद्धीने त्या शत्रूचा विनाश टाळावा याकडे प्रभूंचा कल असे.  अगदी प्रत्यक्ष पाखंडी, धूर्त व महाउदंड रावण देखील समोर आल्यावर आपण त्या रावणास शेवटची संधी देऊन म्हटले होते की, सीतेस सोडून दे आम्ही तुझे प्राण घेण्यास उत्सुक नाही. माझ्या जानकीस तू माझ्या स्वाधीन करून टाक आम्ही युद्ध न करता तुझा जीव तुला देऊन व मात्र जानकीस घेऊन येथून घेऊन प्रस्थान करते होतो.

श्रीशंकर : आम्हाला यात त्यांच्या अनेक गुणांचा बोध होतो.

श्रीकृष्ण : अर्थात ?

श्रीशंकर : एक जीवाच्या मूळ स्वरूपातील सद्गुणांवर पूर्ण विश्वास, ते सद्गुण कोणत्याही क्षणी प्रकट होऊ शकतात हा दुर्दम्य आशावाद, प्रत्येक जीवाला असलेल्या जगण्याच्या अधिकारावर श्रद्धा, त्याच्या शक्तीच्या असलेल्या आदमासा पेक्षा स्वतःच्या शक्ती व स्फूर्तीवर असलेला दृढ आत्मविश्वास अश्या अनेक गुणांचा समुच्चय यांनी भरलेलं आणि भरलेलं आयुष्य म्हणजे  प्रभू श्रीराम यांचं जीवन.

श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट नक्की न ठरवता करून दाखवली ती म्हणजे

क्रमशः 

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...