Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ८

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ८

त्याच वेळी पार्वतीमातेने प्रश्न केला.

माता पार्वती : एक प्रश्न विचारायची अनुमती असावी.

श्रीराम : आहे अनुमती , निःसंकोच पृच्छा करावी. आम्ही यथामती त्या शंकेचं समाधान करण्याचा यत्न करू.

माता : आपण चराचराचे निर्माते आपण मनात आणलं असतत तर आपल्या पत्नीचा त्याग थांबवू शकला असतात. त्यायोगे झालेला मनस्ताप जो अर्थातच उभयतांना जाहला तो टळू शकला असता.

भगवान श्रीशंकरांनी एकवार पार्वती देवींकडे व एकवार प्रभुंकडे पाहिलं. बहुदा शिवांना प्रश्न रुचला नसावा. पण प्रभूंच्या लोचनातील शीतलता पाहून श्रीरुद्र शांत झाले.

श्रीराम : आपली शंका रास्त आहे. महादेव व्यर्थ क्रोध नसावा. देवी आपण जाणता चराचराची निर्मिती करताना त्याच्या नियमित चलन वलनासाठी नीती आणि नियमांचे प्रयोजन केले आहे. यात अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत देखील कोणताही बदल न करण्याचा प्रघात आहे. याचं प्रयोजन याचसाठी की सर्व जीवाना नितिनियमात जगण्याची गरज लक्षात यावी.

याव्यतिरिक्त सर्व कर्मफलाशी बद्ध असल्यामुळे प्रत्येक कर्माचे जे काही फल मिळेल ते भोगून मगच प्राणी बंधनातून मुक्त होऊन मोक्षप्राप्तीकडे जाऊ शकेल. याच नियमानुसार भृगु ऋषींच्या शापामध्ये आम्ही श्रीविष्णुरूपात बद्ध झालो. पत्नीवियोग हा त्या शापामुळे प्रारब्ध झाला. आमच्या पूर्वपुण्याई स्वरूप त्या फलाचा भोग आम्हास इच्छित काळी घेण्याची मुभा होती."

भगवान श्रीशंकरांना या कथनावेळी श्रीराम या रूपात  प्रत्यक्ष श्रीनारायण प्रकट झाल्याचा आभास झाला. कारण त्यांच्या गळ्यातील नागाने श्रीशेषाला अर्थात नागांच्या राजाला प्रणाम केलेला त्यांना जाणवला. बाकी सर्वजण ऐकण्यात मग्न होते. पण शिवशंकर हे नित्य समाधी आणि जागृत अवस्था यात रत असल्यामुळे अंतरज्ञानाने त्यांनी जाणले. अर्थातच त्यांनी जगनियंत्याला सादर प्रणाम केला. याच क्षणी श्रीराम व श्रीकृष्ण यांनी शिवांकडे सूचक स्मित करत पाहिलं.

श्रीराम पुढं म्हणाले

श्रीराम : जरी ही मुभा होती, तरीही प्रत्येक गोष्टीचं गणित ठरलेलं असत. त्याच आधारे आमच्या या आधीच्या व नंतरच्या अवतारातील इप्सित कार्य हे देखील काळाने  ठरवून दिले होते. ते त्यानुसार होणे प्राप्त होते. आधीच्या अवतारांपैकी वामन  व श्रीपरशुराम यामध्ये कोणत्याही प्रकारचा लग्नकार्य भाग नसल्यामुळे उरलेल्या दोन अवतारात हा भृगु ऋषींच्या शापाचा भोग भोगून संपवणे गरजेचे होते.

श्रीकृष्ण या अवतारात सुखोपभोग हे लक्ष्मीदेवींच्या योगात लिहिले होते. त्याचप्रमाणे आमचे कार्य व कार्यक्षेत्र हे विस्तारलेले असल्यामुळे तिथे या शापाचा भोग तापदायक ठरला असता. मूळ कार्यात यामुळे जास्त अडथळे आले असते. त्या अवताराचे प्रयोजन असाध्य झाले असते. म्हणून नररूपात जन्म घेताना जर हा पत्नी विरहाचा शाप भोगून संपवायचाच असेल तर तो संपवायला एकमेव जन्म उरत होता तो म्हणजे रामजन्म.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...