Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३

श्रीकृष्ण :  परंतु आपल्यामध्ये काही साम्य स्थळं सुद्धा आहेत.

श्रीराम : अर्थात

श्रीकृष्ण : आपण दोघांनीही  एका स्त्री खल प्रवृत्तीला संपवलय. जस आपण त्राटीका आणि आम्ही पुतना, आम्ही कर्णाला तो युद्ध थांबवून  रथातून खाली उतरला असताना वधावयास लावले आणि आपण मित्रकर्तव्यास्तव वालीवध केलात. दोन्हीमध्ये उद्देश एकच खल प्रवृत्ती नष्ट करणे आणि जर ती त्या व्यक्तींबरोबर संपणार असेल व त्यासाठी कोणत्या ही  मार्गाचा वापर गरजेचा असेल तर तो न्यायानीतिसंमत आहे. उद्देश मात्र खल नव्हे तर खलप्रवृत्ती नष्ट होण गरजेच आहे.

श्रीराम : आम्ही समर्थन करो वा न करो परंतु जे घडावं हे नियतीविहित होतं ते फक्त घडवण्याचं कार्य करण्याचं स्वातंत्र्य मानवी देहात असतं. हे अर्थात आमचं जीवनाबद्दलच तत्वज्ञान आणि श्रद्धा.

श्रीकृष्ण : अर्थातच म्हणूनच मानवी जन्मात मुख्य कर्म हे सज्जन रक्षण आणि खल निर्दालन हेच असावं विशेषतः तुम्ही सत्ताधारी असताना. पण सर्वसामान्य जीवास मात्र निज कर्तव्य आणि या देही आल्याचं सार्थ कर्म कृतीत आणून मिळालेला जन्म संचित कमी करून पुण्यसंचय करावं, ज्यायोगे ह्या पुढील जन्म एकतर मिळू नये वा मिळाल्यास तो संचित संपवून प्रारब्धाचे भोग कमी होऊन भक्तियोग , ज्ञानयोग, कर्मयोग यातील एकतरी योग साध्य होईल हे साधावं.

श्रीराम : याचसाठी हे ज्ञान आपण गीतरुपात अर्जुनाच्या माध्यमातून जगापुढे मांडलत.

श्रीकृष्ण : आपण तेच भोगरूपात कर्तव्य करत मानवाने कसे जगावं हे आदर्शवत दाखवून दिलंत. याचसाठी आपण धन्य आहात.

श्रीराम : अर्थात जिथे आदर्श उपयोगात येत  नाहीत तिथे आदर्शाच अवडंबर न करता जगाच्या कल्याणास्तव काही गोष्टी स्वतः घडवणं वा घडवून घेणं किती गरजेचं आहे, विशेषतः ज्यावेळी आदर्श पायदळी तुडवले जात असतात तिथे ते पायदळी तुडवणाऱ्याना क्षमा न करता दंडीत कस करावं हे आपण दाखवून दिलंत. यासाठी आपण कालौघात श्रेष्ठच आहात.

रुक्मिणी : आपण आम्हास मात्र एक श्रोता म्हणून आणले आहे की काही इतर उद्देशाने आणले आहे.

हसून श्रीकृष्ण म्हणाले

श्रीकृष्ण : श्रीराम याबाबत आपण भाग्यवान आहात, एकच पत्नी आणि तीदेखील फक्त होकार व नकार यास्तव. आमच्याकडे आठ आणि त्याही हक्काबाबत जागरूक असणाऱ्या.

यावर चारही जण मोकळेपणाने हसतात. इतक्यात भगवान शंकर हे पार्वती सह येऊन उपस्थित राहिले.  त्यांनी सर्वांना आत येऊन स्थानग्रहण करण्यास सांगितले. त्याकारणे सर्वजण आतल्या मार्गाकडे निघून गेले.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...