Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ७

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ७

प्रभू शांत आणि संयत वाणीने बोलत आहेत आणि चक्रधर व चंद्रमौळी आपल्या भार्ये सह, कौतुकाने प्रभुवचन मंत्रमुग्ध होऊन  ऐकत आहेत.  प्रभूंच्या या संयत स्वरूपात भगवान शंकरांना शेषशायी श्रीमहाविष्णूंच प्रकटीकरण दिसत आहे. नव्हे दिसतं. प्रत्यक्ष श्रीहरी म्हणजे साक्षात विश्वाच्या स्वरूपाचा आविष्कार. म्हटलं तर मूर्त म्हटलं तर अमूर्त चिंतन. कारण याच चिंतनातून स्वयं श्रीब्रम्हा आणि श्रीशंकर हे साकार झाले.  कैलासनाथ ज्या ज्या काळात ध्यान धरून  समाधी अवस्थेत जातात त्या त्या वेळी त्यांना पूर्ण समाधान फक्त क्षीरसागराच्या प्रदक्षिणेतच मिळत.

हे एक विस्मयकारक पण तितकंच विलोभनीय नातं आहे , दोघांच्यात , अर्थातच श्रीमहादेव आणि श्रीमहाविष्णू यांच्यात.  दोघेही एकमेकांना मानतात पण आणि मान देखील देतात. म्हणूनच श्रीविष्णूंच्या प्रत्येक कार्यात आपला सहभाग असावा , नव्हे हीच श्रीहरींची सेवा आहे आणि ती करणं हे आपलं कर्तव्यच नाही तर धर्म आहे , अशी धारणा ठेवून श्रीशंकर कायम वागतात. ही एकरूपता आणि एकतानता इतकी अद्वितीय आहे की, संकल्प हरींच्या मनात उत्पन्न झालाच तर हर त्याचे तरंग होऊन जातात. त्यामुळे त्या संकल्पाची पूर्तता नक्कीच एकत्रित होत असे. अवतार दोघांपैकी कोणीही घेवो.

हरिहर हे जगाच्या उत्पत्तीच्या संकल्पाआधी आणि जग विरून गेल्यावर देखील त्याच एकरूपतेने होते, आहेत आणि असतील. म्हणून ज्या क्षणी महाविष्णूंनी श्रीराम जन्माचा संकल्प सोडला, त्याच क्षणी रुद्रानी महारुद्र श्रीहनुमान होण्याचा संकल्प सोडला. श्रीहनुमंत रुपात श्रीशंकरांनी फक्त अंशरूपात येऊन प्रभूंच्या अमर्याद सेवेचा परमोच्च आनंद प्राप्त केलाच, पण त्याच बरोबर गुरू शिष्य, सखा, बंधू या सर्व नात्यांचा आनंद देखील घेतला.  

अश्या या श्रीहनुमंत आणि श्रीराम या जोडीतील अभिन्नता आणि भिन्नत्व हे दाखवून देणं अशक्य होतं.  दुःख श्रीरामांना झालं तर अश्रू श्रीहनुमंताच्या लोचनी येतात आणि आनंद श्रीहनुमंताला झाला तर हर्ष प्रभूंच्या मुखावर प्रकट होतो. हेच ते हरिहराचं अलौकिक अजोड नातं. म्हणूनच जे कालातीत होतं आणि राहिलं. म्हणूनच हनुमंताला चिरंजीवत्व म्हणजेच श्रीरामांना देखील निर्गुण स्वरूपात प्राप्त झालंय.

म्हणूनच आज त्याच श्रीराम रुपात श्रीहरींना पाहून श्रीमहादेव मधला काळ विसरून, फक्त  प्रभूंच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला अमूल्य मोती समजून त्या प्रत्येक शब्दाला कानावाटे हृदयाच्या आतल्या कप्प्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते  या अद्वितीय दृश्याला श्रीहरींच्याच दुसऱ्या रूपातील श्रीकृष्ण त्रयस्थपणे पाहून त्याचा आनंद घेण्यात मग्न होते.

त्याच वेळी पार्वतीमातेने प्रश्न केला.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...