Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १७

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १७

परंतु .......

सर्व उपस्थित देवी देवता श्रीकृष्णांकडे प्रश्न, कुतूहल आणि उत्सुकता या भावाने बघत होते. एक क्षण थांबून श्रीकृष्ण पुढे वदले.

परंतु या सर्वात एकच साधन आहे जे कोणत्याही युगात ईश्वराला सत्व रुपात भक्तांच्या हृदयात असलेले स्थान जागृत करून देते. त्याआधारे अन्य साधनांचा आटापिटा न करता देखील त्याचा लाभ मिळवून देते.

ते म्हणजे बसल्या जागी ईश्वराचं स्मरण करून त्याच्या नामाचा घोष करणं. ते शक्य नसेल तर जमेल त्या वाणीने त्या ईश्वराच्या नामाचा पाठ करणं त्याच्या स्मरणाला जपणं , म्हणजेच जप करणं.  या साधनाचा महिमा अनंत काळापासून आहे.  अनेक भक्तांनी याच मार्गाचा अवलंब करून आत्मोद्धार तर केलाच पण याच नाममहात्म्याचा प्रसार व प्रचार करून जनोद्धारदेखील घडवून आणला.

काळाच्या सर्व कसोट्यांवर सिद्ध झालेल आणि भक्ती शुद्ध व सिद्ध करणार हे साधन म्हणजे ईश्वराचा प्राण आहे.  स्वतः ईश्वराला सर्वात प्रिय हे त्याचं नाम आहे. नाम अवतारकार्य सुरू असताना, त्याचप्रमाणे अवतार समाप्ती नन्तर देखील
ईश्वरी अंशाच अस्तित्व चिरंतन व चिरंजीव ठेवणार एकमेव साधन आहे.

निज स्थानापासून कित्येक योजने दूर असलेल्या ईश्वराचं अस्तित्व आपल्या सर्वात निकट म्हणजेच हृदयस्थानी स्थित करणार हे एकच सहजसाध्य  साधन आहे. हे अनेक जन्माचं पातक एकाच जन्मात पुसून टाकण्याचं सामर्थ्य ठेवत. नव्हे तर नित्य केलेले प्रामाणिक नामस्मरण ईश्वरास तसं करण्यास भाग पाडतं.

या नामाचा सार्थ उपयोग जगतातील प्राणीमात्रांनी करून घ्यावा म्हणून अनेक संत महंत यांनी देह चंदनासम झिजवला आणि आपल्यासह अनेकांचे कल्याण साधले. म्हणून एका अर्थी हे साध्य व साधन दोन्ही.  हे साधन नित्य , अविरत व दिर्घकाळ घेतल्यास एक सिद्ध साधक मंत्र होऊ शकते. इतके याच महात्म्य आहे.

या नाम साधनेने अनेक अप्राप्य गोष्टी प्राप्त होतात. हेच स्मरण निरपेक्ष बुद्धीने व भावाने घेतल्यास कर्मफलाचा नाश होऊन उद्धाराचा व आत्मोन्नतीचा मार्ग सुकर होतो. याचा लाभ मनुष्याने करून घेणे गरजेचं आहे.  नामाचे महात्म्य हे अनेक जन्म कथन केले तरी संपणार नाही असेच आहे.

सरतेशेवटी इतकंच सांगीन की कलियुगात ईश्वरप्राप्ती तसेच कर्मफलत्यागाचा सर्वात उत्तम व उन्नत मार्ग कोणता असेल , तर त्याच एकच उत्तर म्हणजे नामस्मरण करणे वा नाम घेणे. नाम घेताना नामात इतके तद्रूप व्हावे की घेणारा साधक, नाम म्हणजे साधन व ईश्वर म्हणजे साध्य हे एकरूप व्हावेत. हीच नामसाधनेची खरी कसोटी आहे.

भाग१८ अंतिम

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...