Skip to main content

लहानपण समृद्ध केलेल्या व्यक्ती वा गोष्टी

लहानपण समृद्ध केलेल्या व्यक्ती वा गोष्टी

आमचं लहानपण हे आजच्या तुलनेत कमालीचं समृद्ध होतं , म्हणण्यापेक्षा आहे. कारण त्याचा सुगंध आजसुद्धा मनाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नता देतो, विशेषतः निराशेच्या काळात वा क्षणात.  बालपण समृद्ध करणाऱ्या काही गोष्टी माझ्या आठवणीनुसार देत आहे. तुमच्या आठवणीतील काही यात निसटलं असेल तर यात जोडून घ्या. बघा काय काय आठवतंय आणि अंतर्मन शुद्ध होतंय ते.

१. भरपूर मोकळी जागा, जागोजागी मैदान वा पटांगण सदृश जागा. यामुळे प्रचंड आणि मनसोक्त खेळलो. त्यामुळे आजही  तब्येत बिनाऔषध बरीच टिकून आहे. त्याच रहस्य हेच असावं. खेळांचा पुरेसा म्हणजे मन भरस्तोवर आनंद घेतलेली पिढी आमची. तेही मैदानी. मैदानी खेळ क्रिकेट, हुतुतू, डब्बा ऐसपैस, लगोरी, चोरपोलिस इत्यादी. पण त्याच जोडीला विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी बाहेर जायला सक्त बंदी, म्हणून बैठे खेळ जसे की पत्ते, कॅरम, भेंड्या, गप्पाटप्पा, इत्यादी. आणि हे सर्व भांडून पण अबोला न धरता. त्यामुळे मन साफ होत असे. अढी राहात नसे, हे महत्वाच.

२. शाळेतील त्या काळातले संस्कारी आणि निस्वार्थी शिक्षक. कदाचित यांचं योगदान हे काळाच्या पुढे आणि मोजमाप न करता येण्याजोग आहे. पालक निर्धास्त असत आमच्या शाळेत जाण्याने. शिक्षकांबद्दल आदर, विश्वास, होता. यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. नक्की लिहीन लवकरच.,

३. आई बाबांचे नातेवाईक व बाबांचे मित्र, ज्यांच्याकडे रीतसर व नियमित जाणं येणं होत असे. त्यामुळे संबंध ठेवणं म्हणजे काय हे अजूनसुद्धा लक्षात आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला आता कोणाकडे जायचं याबद्दल कुतूहल असायचं.

४. चोथा महत्वाचा सहभाग होता, फार कमी वेळ असणारं आणि फक्त आणि फक्त दर्जेदार कार्यक्रम देणारं दूरदर्शन. मला आठवत असलेले काही कार्यक्रम गजरा, प्रतिभा आणि प्रतिमा (ज्यात अनेक नामवंत साहित्यिक , कलाकार येत असत त्यांचं आज महत्व जास्त जाणवतय), फुल खिले है गुलशन गुलशन, किलबिल , चित्रहार, छायागीत, संताकुकडी, आवो मारी साथे, खेलखिलौने, चार्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी, here is lucy (यात कळत काही नव्हतं पण थोडाच वेळ दूरदर्शन असल्यामुळे जे येईल ते बघायचं),

मराठी बातम्या  त्यांच्या खास title music सकट, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, प्रदीप भिडे, अनंत भावे, हिंदी समाचार सुषमा सेठ, इंग्लिश न्यूज लुकू सन्याल (भरपूर डार्क लिपस्टिक) , डॉली ठाकूर ( हिला आम्ही भूत म्हणायचो, कारण हेअर style तशीच असायची), एक मराठी आणि एक हिंदी सिनेमा दर आठवड्याला, लतादीदी, आशाताई, भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, आशा खाडिलकर, रामदास कदम, शरद जांभेकर, प्रभाकर कारेकर, गजाननबुवा जोशी, अल्लारखा, जाकीर हुसेन, संतुरवादक शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, यांसारखे अनेक कलाकार प्रत्यक्ष गाताना वा वादन सादर करताना दूरदर्शन आणि गणेशोत्सव इत्यादी मध्ये पाहिलेत,

वसंतराव देशपांडे यांच संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक याची देही याची डोळा दूरदर्शनवर १९७७ दिवाळी पहिला दिवस म्हणजेच नरकचतुर्थीला वा लक्ष्मीपूजन या दिवशी सकाळी ६ वाजता( कदाचित दिवाळी पहाटचा तो प्रथम टप्पा वा सुरवात म्हणता येईल) , पुढील वर्षी १९७८ ला दिवाळी पहाट अजित कडकडे यांचं संगीत संशयकल्लोळ, तिसऱ्या वर्षी १९७९ ला पुन्हा दिवाळीत संगीत शारदा. सलग तीन वर्षे पाहिलंय).  तुझे आहे तुजपाशी, वस्त्रहरण (मच्छीन्द्र कांबळी) इत्यादी अनेक नाटकं.

लिहिण्यासारखं खूप आहे पण हे चार पैलू हे प्रातिनिधिक असतील. अजून यात अनेक राहिले असतील तर आपण ऍड करा कंमेंट मध्ये.

आमंच लहानपण समृद्ध करणाऱ्या या व अश्या इतर अनेक गोष्टींना मला यानिमित्ताने सलाम करायचाय.

© लेखन : प्रसन्न आठवले
२६/११/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...