Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १३

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १३

भगवंत स्वतः नामाचा महिमा स्वमुखे सांगत होते आणि भगवंत स्वतः श्रोता होऊन श्रवणभक्तीचा आनंद घेत होते.

श्रीकृष्ण : नामाचा महिमा सांगताना अनेक संत महंत यांनी पूर्ण आयुष्य सार्थकी लावलं. नाम जे आदी आणि अनंत आहे. उगमाला आणि शेवटाला जे समान असत ते नामच. म्हणजे जगाच्या उगमाआधी हे अस्तित्वात होत भगवंतांच्या नामातून आणि जगाच्या नव्हे ब्रह्मांडाच्या समाप्तीनंतर सुद्धा अनंत काळ नव्हे कालातीत असलेली एकमेव अशी गोष्ट असेल तर ती नाम आणि नामच.

भगवंतांना स्वतःहून प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे नाम आणि नामच. नामाची महती आज जितकी आहे तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त  ही कलियुगात आहे. कारण कलियुग जिथे ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करून श्रद्धेवर घाला घालण्याचं काम जिथे पदोपदी होईल. भल्या भल्यांची श्रद्धा सहजी दोलायमान होईल, खऱ्या भक्तीचा आणि भक्तांचा जिथे कस लागेल, अश्या वेळी फक्त हे नामच एक दोरी बनून श्रद्धेला, भक्तीला आणि भक्तांना भगवंताप्रत बांधून ठेवेल.

अनेक रुपात आणि अनेक फसव्या सोंगात अश्रद्धा नेहमीच श्रद्धेवर घाला घालत असेल. आधीच्या तीनही युगातसुद्धा हे प्रश्न, या समस्या होत्याच , परंतु कलियुगात जस भगवंत समोर आल्यावर  कदाचित भक्त सुद्धा विश्वास ठेवतील की नाही शंका आहे, जिथे खर आणि खोटं हे एकाच रुपात आणि रंगात समोर येऊन उभं राहू शकत, जिथे माणसांमधला सर्वात मोठा दुवा म्हणजे विश्वास, याला पदोपदी धक्का लागेल, भक्ती करणारे भक्त जिथे समोर न येता, अभक्त आणि दांभिकता उजळ माथ्याने वावरतील, जिथे नास्तिकता व अस्तिकता यांच्याही पलीकडे श्रद्धेबद्दल  घृणा निर्माण करण्याचा यत्न केला जाईल, जिथे सात्त्विकता कोपऱ्यात लाज चोरून उभी राहील आणि तामसता अनेक स्वरूपात जगात उत्पात करेल,

सत्याला जगात तोंड लपवायला जागा शोधावी लागेल आणि असत्य, निलाजरेपणे आपला नाच जगात दाखवेल, सत्य, सात्त्विकता,  धार्मिकता, सोज्वळपणा , सामंजस्य, सोशिकता, सामोपचार, सर्वगुणसंपन्नता हे हास्यास्पद विषय ठरतील, पतिव्रता हास्याचा आणि दुरव्यवहार, दुराचार, दंभ, दुष्टप्रवृत्ती, दोष याद्वारे व्यभिचारी भोगी, उपभोगी वृत्ती या व्यवहाराचं स्वरूप होऊन समोर नांदतील. श्रद्धेवर घाला घालण्याची एकही संधी सोडली जाणार नाही."

जणू कलियुगाचा सर्व पटच श्रीकृष्ण समोर उलगडून दाखवत होते आणि सर्व श्रोते अचंबित होऊन पहात होते.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...