एका वेगळ्या बंडखोर मांडणीची विरह कविता :
भय तुझ्या नसण्याचं नाही
तू दिलेल्या जखमांचं आहे
तुझं हृदयातील अस्तित्व
आज तरी मला शून्य आहे
कोणत्याच भावना आज
मला टोचत नाहीत हे नक्की
कारण तूझ्यामुळे लागलेली
ठेच काळजात रुतून आहे
ठरलंय उगाच अश्रू ढाळून
मनाला त्रास नाही देणार
समाजाच्या साशंक नजरात
मात्र तुझाच भास होत आहे
बाभळीच्या काट्याचा दोष
काहीच नाही या जगात
त्याचा जन्म झाला ज्यासाठी
फक्त तेवढंच तो करत आहे
आता उरायच रहायच
मागचं सार विसरून
कारण जगण्याची माझ्या
फक्त मलाच फिकीर आहे
© कवी : प्रसन्न आठवले
०१/१२/२०१८
१७::२२
Comments
Post a Comment