Skip to main content

गीतविश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ४

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ४
‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे।
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे।
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे।
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे।
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके
अश्या शुभ्र तुऱ्याची माळ घालून आलेल्या लाटा किती निर्मळ दिसत आहेत. पवित्र जलतत्व हे सृष्टीच्या पाच तत्वांपैकी एक प्रतीक पाडगावकर मांडतात. निळ्याशार लाटा असलेल्या सागराच्या रूपात.  रानात वनात वीना आधार वा मदत वाढलेली फुलं ही खर तर निष्पपतेचं प्रतीक आहे. अश्या फुलांचा सडा रोज सकाळ संध्याकाळ तितक्याच निष्पाप वाटेवर पडल्यामुळे मुळातली निरागसता अजून सात्विक झाली. कारण हिरवा रंग हा मांगल्य आणि पावित्र्य यांचं प्रतीक आहे.
अश्या या पवित्र वाटेवर तुझ्या सात्विकतेच तेज , ती प्रसन्नता तो सजलेला साज, सृष्टीचा मंगलमय शृंगार पाहण्यासाठी आणि त्यात तुझं प्रतिरूप पाहण्यासाठी मला यात्रेसाठी जाऊ दे. यात्रा म्हटलं की देवाशी एकरूप होण्याचीच क्रिया, त्यायोगे ज्याला भजतो ज्याला पूजतो त्याला समीप पाहण्यासाठी केलेला खटाटोप, आटापिटा, उठाठेव, अर्थात हा खटाटोप, ही उठाठेव ही प्रेमपूर्वक असते कारण ती निजानंदासाठी आणि आतल्या देवाला पुन्हा बाहेर पाहण्यासाठीच असते.
परमेश्वरी सृष्टीच सौन्दर्य वर्णन करताना पाडगावकर लेखणी ही अजून प्रफुल्लित होते. त्याला एक अलंकारिक साज चढतो.म्हणूनच पुढल्या कडव्यात त्याच वर्णन करताना ते उस्फूर्तपणे लिहून जातात. हे जगनिर्मात्या तुझी सृष्टी किती सुंदर आहे डौलदार आहे, त्याची नजाकत किती छान आहे.  ही सृष्टी तू इतकी सुंदर निर्माण केली आहेस की त्याच वर्णन मी कस काय करू. शब्द तोकडे आहेत. पण पाडगावकर लिहितात ते उपमेच्या माध्यमातून. ते म्हणतात की दारात  केशराचे मोर म्हणजेच तुरे डोलत आहेत आणि तेसुद्धा पहाटेच्या मंगलमय समयी.
हे निर्मळ निर्वेधपणे वाहणारे झरे तुझ्यातील सृष्टीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळेच ते वाहताना त्यांचा आवाज हा सतारीच्या स्वरांसारखा नादमय दिडदा दिडदा असा येतो. आपण नेहमी ऐकतो की कोणत्याही आनंदी प्रसंगात नेहमी सतारीचाच प्रयोग केला जातो तो आनंद व्यक्त करण्यासाठी. कदाचित सतारीहून अन्य प्रकारे  आनंद उच्चपणे आणि नेमका व्यक्त होईल असं वाटत नाही.  म्हणुन त्या झर्यात सुद्धा तुझंच प्रतिबिंब त्या झूळ  झूळ  रूपात दिसत आहे. अश्या या तू उधळून टाकलेल्या सृष्टीसौन्दर्याच्या अविरत बदलत्या व नित्य आनंद देणार्या सौन्दर्याच्या सोहळ्यात तूच प्रतिबिंबित आहेस. त्यामुळे त्याहून वेगळा तू नसावास , नाहीस. त्यातच तुला प्रतिकृतीरूप झालेल मला पाहू दे. 
 उत्तररात्रीची वेळ हि संपूर्ण दिवसभरातील वा चोवीस तासात सर्वात शांत वेळ. ज्यावेळी विचारांची प्रक्रिया हि बर्याच प्रमाणात म्हणजे बहुतांशी स्थिर वा स्थित होत आलेली असते. अश्या निरव शांत उत्तर रात्रीच्या वेळी तारे सुद्धा मंदपणे प्रकाशमान व्हायला सुरवात झालेली असते. आकाशतत्वाच्या या भावात आणि वेळी तुझ्या अस्तित्वा्चा प्रत्यय जास्त स्पष्टपणे जाणवतो. हे जग खर तर तुझ्या अस्तित्वानेच भारलेल आणि व्यापलेल आहे. अश्या शान्तवेळि वाहणारा मंद वारा  तुझ्या अस्तित्वाच्या प्रेमाचा गन्ध घेऊन , भारलेला होऊनच येतो आहे. त्या प्रेमाने अश्या अद्भुत रम्य समयी मन प्रसन्न असल्यामुळे तुझ्या प्रचितिचा प्रत्यय हा सर्व दिशानी येत आहे, जाणवतो आहे. म्हणुनच पंचमहाभुतातील पाचवे तत्व म्हणजे वारा, हा देखिल तुझेच गीत गात आहे. सर्वत्र तुझ्याच प्रेमाचि अनुभुती येत आहे.
अश्या या सुन्दर समयीचा आनंद हा अलौकिक असतो. हा आनंद अनेकानी आपआपल्या अनुभुतिनुसार व्यक्त केला आहे.  संतश्रेष्ठ तुकोबाराय आपल्या एका अभंगात याच आनंदाच वर्णन करतात कि
आनंदाचे डोही आनंद तरंग ।।
आनंदची अंग आनंदची अंग ।।
आनंदाचे .......
अश्या अद्भुत रम्य आनंदाच्या बरसातीचं जणू चांदणं पडलंय. चांदणं पुन्हा शीतलतेच प्रतीक, म्हणजे हा आनंद सात्विक आहे , कारण तो परम ईश्वराच्या अस्तित्वाचं आहे. ज्यात फक्त सत्व हा एकच गुण प्रतीत होत आहे, किंवा प्रत्ययीत होत आहे. संतांनी देखील अद्भुत भक्तीची कामना करताना ह्याच अलौकिक आनंदाचं गुणवर्णन केलंय , जे इथे पाडगावकर करत आहेत. 
ll जय सर्वसाक्षी सर्वभूतेशु  जगदीश्वर ll
क्रमशः
© संकलन व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...