Skip to main content

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ५

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ५

देवर्षीच्या मिश्किल डोळ्यात एक कल्पना आली आणि ते डोळे अजून चमकले. त्या चमकलेल्या डोळ्यात एक चमकदार कल्पना जन्म घेती झाली. ते वळले आणि सुभद्रेला म्हणाले

नारद : देवी तुम्हाला जाणून घ्यायचय की,  यदुवीरांकडे कोण लक्ष देत का आणि देत असेलच तर कोण, बरोबर

सुभद्रा : हो अर्थातच.

नारद : मग आपण आता श्रीकृष्णांच्या सदनी जाऊन त्यांना प्रश्न करावा की, समस्त राण्यांपैकी, कोण त्यांच्यावर जास्त प्रेम करत, अस त्यांना वाटतं.

सुभद्रा : सुंदर  ही कल्पना अति उत्तम आहे. त्यामुळे कृष्णाच्या उत्तरावरून हे ठरवता येईल की, त्याची काळजी कोण जास्त घेतंय , हे त्याच्या मनात आहे.

नारद : परंतु हे सर्व जरा जपूनच कारण श्रीकृष्ण वाटतात त्याहीपेक्षा चतुर आणि चाणाक्ष आहेत.

सुभद्रा : नक्कीच ती काळजी मी घेईन.

नारद अंतर्धान पावतात आणि सुभद्रा श्रीकृष्णांच्या महालाकडे जायला निघते. कृष्ण आपले ज्येष्ठ बंधू बलरामदादा यांच्यासोबत राज्यातील घडामोडी , शत्रूंच्या हालचाली आणि राज्यकारभाराच्या इतर गोष्टी यावर चर्चा करत बसला आहे. तेवढ्यात तिथे सुभद्रा येते.

सुभद्रा : वा आज खूप मोठा योग जुळून आलाय. दोन्ही बंधू साक्षात एकत्र भेटले. हा मोठा शुभयोग दिसतोय.

दादा : अर्थात सुभद्रे तू खास आमच्यासाठी आली आहेस आणि आम्ही सुद्धा तुझ्याकरता सर्व कार्यक्रम बाजूला ठेवलेत. त्यामुळे एकत्र भेटणारच ना.

सुभद्रा : हो ते ही खरच आहे. तुमचं दोघांचाही माझ्यावर खूप
स्नेह आहे हे मी जाणून आहे. पण तरीही सर्वात जास्त स्नेह  कोण करत माझ्यावर, आपल्या लाडक्या भगिनीवर. ते तरी कळू देत.

कृष्ण : सुभद्रे हा काय प्रश्न झाला का, अर्थातच ज्येष्ठ भ्राता बलरामदादा यांचाच.

सुभद्रा : ते कसं काय

कृष्ण : तस नसत तर तुझ्या विवाहाला अंतिम मान्यता दादांनी दिली नसती. मी तर अज्ञानवश हे जाणत सुद्धा नव्हतो की आपल्या मनात अर्जुन आहे. आम्ही तर तुझा विवाह दुर्योधनाशी करण्याच्या दादांच्या प्रस्तावावर काम करत होतो. खर आहे ना दादा

बलराम : हो अर्थातच, कृष्ण म्हणतोय ते मिथ्या नाही.

कृष्ण : बघ दादांनीसुद्धा मान्य केलय की त्यांचं तुझ्यावर स्नेह अधिक आहे. तेंव्हा विनाकारण चुकीचे ग्रह मनात धरून, संशयाला जागा ठेवू नकोस. कारण संशय सर्वात मोठा शत्रू आहे मानवाचा. तो काळीज आणि मस्तिष्क दोन्ही पोखरून माणसाला खातो. तेंव्हा आता नसत्या शंका मनात असतील तर काढून टाक.

सुभद्रा : कृष्णा एक शंका अजून आहे मनात तेवढी जरा फिटली की मग मी साफ मनाने आनंद घ्यावयास मोकळी.

कृष्ण : अर्थात

सुभद्रा : अर्थात तुमच्या दोघांमध्ये बहुभार्या असलेलं कोणी असेल तर तो कृष्ण, त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं आहे, किंवा जिज्ञासा आहे की, कृष्णा तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम कोण करत आणि ततपश्चात हे सुद्धा सांग की तुझ प्रेम सर्वात अधिक कुणावर आहे.

बलराम : तुम्ही दोघे बसा गप्पा करत. मी निघतो , मला जरा शस्त्रागारात जाऊन नवीन आलेल्या शस्त्रांची पाहणी करायची आहे. तेंव्हा मला जाऊ दे .

कृष्ण मोठ्या नाईलाजनेच हो म्हणतो

ठीक आहे आपण निघत आहात तर या आमची अनुमती आहे.

बलरामदादा त्वरेने कक्षाबाहेर जाण्यासाठी रवाना होतात . इकडे सुभद्रा कृष्णकडे उत्कंठावर्धक भाव चेहऱ्यावर आणून मिश्किल नजरेने बघत आहे. कृष्ण वदतो

क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
१२/११/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...