Skip to main content

नवरात्रात माळ चतुर्थ

नवरात्रात माळ चतुर्थ

आई अंबेच्या नावाने आज गोंधळ मांडला
कोल्हापूरची महालक्ष्मी आई  ये तू  गोंधळाला

दैत्य दैन्य ताप झाले
माणसाच्या रूपे आले
जगताच्या नाशा आले
आत्मयात प्रकट झाले
कोल्हासुर मारलास कली सर्वत्र माजला
आई अंबेच्या .....

आई जाग आता तूच
भवानी तलवार तूच
रणांगणी काली तूच
कात्यायनी रूपे तूच
आई शिवाई रुपात जागसी ग तू ब्रिदाला
आई अंबेच्या .....

तूच रेणुकामाता ग
माहुरचे भाग्य तू ग
तांदळा रुपात तू ग
भक्ती विडा घेसी तू ग
आई परशु परजता दैत्य कापे चळाचळा
आई अंबेच्या .....

सप्तशृंग गडावरी
आई वणी ग्रामांतरी
बहू हस्ते रक्षण करी
अग्निरूप धारण करी
अस्त्र शस्त्र सज्ज करी यावे जगत रक्षणाला
आई अंबेच्या .....

विंध्यवासींनी तू आई
तूच वज्रेश्वरी आई
जाग एकवीरा आई
मुंबादेवी रूप आई
महाराष्ट्राची माऊली तू दान इतुके दे  भक्ताला
आई अंबेच्या .....

प्रसन्न होसी भक्तकुळा
होसी चिंतामणी सकळा
आठवले लिही कवनाला
गोड मानून घे  शब्दाला
आई अंबेच्या .....

आई जाग जाग आता अंबे गोंधळ मांडला
स्वीकारीशी आई आता माझ्या चवथ्या माळेला

ll इति श्रीशक्तीरूपेण देवी स्तुती अर्पणमस्तू ll

© कवी : प्रसन्न आठवले
१३/१०/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...